शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

एका वर्षात शहराचा चेहरा-मोहरा बदलवण्याची भाषा केवळ भूलथापा - सुरेशदादा जैन यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 13:17 IST

विरोधकांच्या आडमुठेपणामुळेच विकास थांबला

ठळक मुद्देअडचणी येत राहतील मात्र, आमचा संघर्ष कायम राहीलजामनेरला २०० कोटी तर जळगावला केवळ २० कोटी

जळगाव : शहराच्या विकासाला २००१ पासून शाप लागला आहे. तसेच गेल्या चार वर्षांपासून ज्यांची राज्य व केंद्रात सत्ता आहे. त्यांच्याक डून शहराच्या विकासात अडथळा आणला जात आहे. तरी मात्र, माझे मित्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून एका वर्षातच शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचे आश्वासन दिले जात आहे. एका वर्षात शहराचा विकासाचे आश्वासन केवळ भूलथापा असून, वर्षभरात शहराचा विकास केवळ अलीबाबाची जादू असून अशी आश्वासने देण्यात विरोधक ‘माहिर’ असल्याचा घणाघात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी बुधवारी रात्री यश लॉन येथे झालेल्या सभेत विरोधकांवर केला.या सभेत सुरेशदादा जैन यांनी जोरदार फटकेबाजी केली. सभेत होममिनीस्टर फेम भावजी आदेश बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार किशोर पाटील, माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, बाजार समिती सभापती लक्ष्मण पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या इंदिराताई पाटील, महानंदा पाटील यांच्यासह प्रभाग ८ मधील शिवसेनेचे सर्व उमेदवार उपस्थित होते.आम्हाला २०० कोटी द्या, आम्ही विकास करुन दाखवतोगिरीश महाजन यांच्याकडून भाजपाला सत्ता मिळाल्यास शहराचा विकासासाठी २०० कोटी रुपये देवू असे आमीष जळगावकरांना दिले जात आहे. शहराच्या विकासासाठी २०० कोटी रुपये द्यायचेच असतील तर त्यासाठी सत्तेची काय गरज आहे ?, मनपात आमची सत्ता आहे. आमच्याकडे २०० रुपये कोटी द्या आम्हीही शहराचा विकास करुन दाखवतो असे आव्हान सुरेशदादा जैन यांनी दिले.अडचणी येत राहतील मात्र, आमचा संघर्ष कायम राहीलशहराच्या विकासात अडचणी येत राहतील, विरोधकांकडून विकासकामांना अडवणूक होत राहील. मात्र, मी जळगावकरांशी बांधील आहे. जळगाव माझी भूमी आहे, आणि त्या भूमीच्या विकास करण्याची जबाबदारी देखील माझीच आहे.विकासामध्ये कितीही अडथळा आणला तरी आमचा संघर्ष कायम राहणार आहे. सर्व अडचणींवर मात करून जळगावकरांचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील. २४ तास जळगावकरांच्या सेवेसाठी मी कटीबध्द असल्याचेही सुरेशदादा जैन यांनी सांगितले.लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला अन् शाप लागला...सध्या महानगरपालिकेची जी आर्थिक स्थिती आहे. त्यापेक्षा कठीण परिस्थिती १९८५ मध्ये शहराच्या तत्कालीन नगरपालिकेची होती. त्यावेळी जळगावकरांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला शहराच्या विकासासाठी संधी दिली. जळगावकरांनी दिलेल्या आशिर्वादानंतर शहराचा विकास १९८५ ते २००१ पर्यंत नियमित झाला. मात्र, २००१ मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, शहराच्या विकासाला शाप लागल्याचे सुरेशदादा जैन म्हणाले.जळगावच्या विकासाला लागलेला शाप आजपर्यंत कायम असून , गेल्या चार वर्षात ज्यांची सत्ता राज्यात व केंद्रात आहे. त्यांनी केवळ शहराचा विकास रोखण्यासाठीच प्रयत्न केला असल्याचा आरोप सुरेशदादा यांनी केला. २५ कोटीच्या निधी केवळ त्यांच्याच आडमुठेपणामुळेच अखर्चित असून मनपाच्या विकासाला अडथळा आणण्याचे काम सध्या सुरु असल्याचा आरोपही सुरेशदादा यांनी केला.जामनेरला २०० कोटी तर जळगावला केवळ २० कोटीजर सत्ता आली तर आम्ही शहराचा विकास करु अशी भूमिका जर का मुख्यमंत्र्यांची असेल तर ती संविधानाच्या विरोधात आहे. कारण मुख्यमंत्री जेव्हा आपल्या पदाची शपथ घेतात तेव्हा कोणत्याही शहराला सापत्न वागणूक देणार नाही असे म्हणतात. मात्र, निधीचा विचार करताना जामनेरला २०० कोटी तर जळगावला केवळ २० कोटी.., असा दुजाभाव सध्या केला जात असल्याचेही सुरेशदादा जैन म्हणाले.शिवसेनेच्या शिवशक्ती विरोधात धनशक्ती - आदेश बांदेकरआदेश बांदेकर म्हणाले, जळगावची मनपा निवडणूक ही ऐतिहासीक असून या ठिकाणी शिवसेनेची शिवशक्ती विरोधात धनशक्ती उभी ठाकली आहे. मात्र, इतिहासात जर का डोकावून पाहिले तर शिवशक्ती विरोधात कोणत्याही धनशक्तीचा विजय झालेला नाही. मात्र, या निवडणुकीत कोणीही गाफील न राहता शिवसेनेच्या शिवशक्तीच्या पाठीशी भक्कम उभे राहण्याचे आवाहन बांदेकर यांनी केले. २७ जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस असून ३ आॅगस्ट रोजी जळगाव मनपावर भगवा ध्वज फडकवून त्यांना वाढदिवसाची भेट द्या असे आवाहनही बांदेकर यांनी केले.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव