शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गांभीर्याच्या अभावामुळे वाढला मृत्यूदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 23:46 IST

प्रशासकीय, वैद्यकीय पातळीवर समन्वयाचा अभाव, वैद्यकीय महाविद्यालयातील बेपर्वाई, भोंगळ कारभाराचे वाभाडे, दारु, वाळूच्या फेऱ्यात अडकलेल्या लोकप्रतिनिधींचे सूचक मौन

मिलिंद कुलकर्णीकविता, कापूस, केळी आणि सोन्यासाठी प्रसिध्द असलेल्या जळगावची चर्चा कोरोना संसर्गजन्य आजाराच्या मृत्यूदरात घेतलेल्या आघाडीने व्हावी, यापेक्षा दैवदुर्विलास तो कोणता? खेदाची बाब म्हणजे, परिस्थिती हाताबाहेर जात असतानाही प्रशासकीय व वैद्यकीय अधिकारी, मंत्री, लोकप्रतिनिधी यांनी तातडीने कठोर उपाय योजले नाहीत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जळगावात येऊन कान टोचल्यावर सगळे कामाला लागले, मग हेच महिन्याआधी केले असते तर १०० हून अधिक नागरिकांचे प्राण वाचले असते. कोरोनासारख्या जागतिक आपत्तीशी मुकाबला करताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या लोकशाहीच्या दोन स्तंभांनी हातात हात घालून, समन्वय राखून काम करताना दिसायला हवे होते. पण तसे दिसले नाही. टाळी दोन्ही हाताने वाजते. आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत लोप्रतिनिधींनी प्रशासकीय अधिकाऱ्यांविषयी तक्रारी केल्या. त्यात तथ्य आढळल्याने बहुदा मंत्र्यांना सांगावे लागले की, लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. मात्र, काही लोकप्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळात काय कामे करीत होती, हे मंत्र्यांना माहित आहे का? कुटुंबिय, नातलग, बगलबच्चे हे दारु, वाळूच्या अवैध व्यवसायात गुंतली होती. कारवाई होऊ नये, म्हणून प्रशासनाला विनंती, दबाव असे मार्ग अवलंबून झाले. मग अधिकाºयांनी फोन घेणे बंद केल्याची तक्रार कोणत्या तोंडाने केली जात आहे. प्रशासनाने कठोर भूमिका ठेवली असती, तर अनेक गोष्टींना आळा बसला असता. बाधित आणि संशयित रुग्णांचे अंत्यसंस्कार हा विषयदेखील गंभीर झाला. मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करताना वैद्यकीय प्रशासनाने कोणत्याही ठोस नियमावलीचे पालन केले नाही. काही ठिकाणी प्रशासकीय अधिकाºयांंनी कानाडोळा केला. त्याचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागत आहे. दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाविषयी वस्तुस्थिती कोरोनाच्या निमित्ताने समोर आली. २५३ पदे असताना प्रत्यक्षात ११९ वैद्यकीय अधिकारी तेथे कार्यरत आहेत. त्यातील ज्येष्ठ, अनुभवी अधिकाºयांनी रुग्ण तपासणीपेक्षा प्रशासकीय कामात स्वत:ला गुंतवून घेतल्याचा आरोप झाला. आॅक्सिजन सिलिंडर, व्हेंटीलेटरच्या तुटवड्याचे चित्र विदारक होते. ही स्थिती असताना लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठित उद्योजक, व्यावसायिक यांना विश्वासात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने मदत घेतली असती तर निश्चित मार्ग निघाला असता. आयएमए आणि ज्येष्ठ, अनुभवी खाजगी डॉक्टरांनी यापूर्वीच उपाययोजना सुचविल्या असत्या. याची आवश्यकता यासाठी की, ५० टक्के रुग्ण हे दाखल झाल्यावर २४ तासात दगावले आहेत. हे वेदनादायक आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसार काम होताना दिसत नाही. महाविद्यालयात रुजू न होणाºया वैद्यकीय अधिकाºयांवर अद्याप कार्यवाही नाही, अहवाल २४ तासात मिळत नाही, रिक्त पदांसाठी अद्याप हालचाली सुरु झाल्या नाही. आता पाठपुरावा कोण करणार हा प्रश्न आहे. सत्ताधारी पक्षाच्या मंडळींकडून अधिक अपेक्षा आहेत. पण तेदेखील मंत्री आल्यावरच घराबाहेर पडताना दिसतात.जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने हजाराचा टप्पा ओलांडला असून मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या सव्वाशेच्या घरात आहे. प्रशासकीय व वैद्यकीय व्यवस्थापनाच्या गलथान कारभाराने हा विस्फोट झाला.जळगावची परिस्थिती हाताबाहेर जातअसल्याचे पाहून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना धाव घ्यावी लागली. दिवसभर जळगाव आणि भुसावळात बैठका घेऊन त्यांनी प्रशासकीय व वैद्यकीय अधिकाºयांना जबाबदारीची जाणीव करुन दिली. त्यांनी सुचविलेल्या उपाययोजनांबाबत समाधानकारक प्रगती दिसून येत नाही. त्यामुळे जळगावकरांवर टांगती तलवार कायम आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव