शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

पारोळा बाजार समितीत शेत माल खरेदीसाठी उपाययोजनांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 19:03 IST

बोटावर मोजण्याएवढे व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही व्यापाºयांना उधारीने माल विकावा लागत आहे.

ठळक मुद्देसचिवांच्या आडमुठ्या धोरणाला सर्वच त्रस्तबोटावर मोजण्याएवढे व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत आहे.

रावसाहेब भोसलेपारोळा, जि.जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देश लॉकडाऊन आहे. पण जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य खरेदी-विक्रीसाठी सूट देण्यात आली. पण पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत सचिवांच्या आडमुठ्या धोरणामुळे आजूबाजूला सर्व ठिकाणी कृउबाचे मार्केट सुरू झाली. पण पारोळा येथे अद्यापपर्यंत कृउबा माल खरेदी विक्री बंद आहे. बोटावर मोजण्याएवढे व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही व्यापाºयांना उधारीने माल विकावा लागत आहे.प्रत्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन पाहिले असता कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय बंद होते. काही व्यापाºयांनी शेतकºयांचे गहू, बाजरी धान्य खरेदी केले होते. १७०० रुपयांचा भाव शेतकºयांना गव्हासाठी मिळाला होता. यात काही शेतकºयांना विचारणा केली असता त्यांनी घरात कापूस पडून आहे. आलेल्या अन्नधान्य गहू, बाजरी, दादर ठेवण्यासाठी जागा नाही. शेतातून थेट मार्केटला विक्रीसाठी आणले. यात काही व्यापाºयांनी उधारीवर माल खरेदी केला, तर काहींनी ट्रॅक्टर भाडे व उचल म्हणून थोडे फार पैसे दिले. नाईलाजाने उधार धान्य विक्री करावे लागल्याचे बोलून दाखविले.यावेळी काही व्यापाºयांनी सचिव रमेश चौधरी यांनी शेतकºयांचा माल खरेदीसाठी लॉकडाऊनचे कारण पुढे करीत मार्केट बंद ठेवले आहे. सचिवांच्या तोंडी सूचनेने आम्ही काही व्यापाºयांनी शेतकºयांचा गहू, ज्वारी, बाजरी खरेदी केले आहे. पण हा खरेदी केलेला माल विक्रीसाठी आम्ही गुजराथला पाठवितो. व्यापारी म्हणून आम्ही माल खरेदी केला आहे, असे परवाना पत्र सचिवांकडे मागणी आम्ही व्यापाºयांनी केली. त्यांनी ते पत्र देण्यास नकार दिला. तहसीलदारांना परवाना पत्र मागणी केली. पण त्यांनीही सचिवांना तसे पत्र देण्याचा अधिकार देण्यात आले असल्याचे सांगितले. पण सचिव चौधरी हे व्यापाºयांना विनाकारण त्रास देत आहेत. अनेक वेळा परवाना पत्र मागूनसुद्धा त्यांनी पत्र दिले नाही. आमच्या मालाने भरलेल्या गाड्या दोन दिवस पडून होत्या. शेवटी अमळनेर तहसिलदारांंनी आम्हाला परवाना पत्र दिले. मग आमच्या माल भरलेल्या गाड्या विक्रीसाठी गुजराथ गेल्या असल्याचे एका व्यापाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली .त्यानंतर एक मापडी भेटला. त्यांनीही सचिव रमेश चौधरी यांनी शेतकºयांच्या आलेल्या मालाचे माप न करण्याच्या सूचना दिल्या आहेत म्हणून रिकाम्या हाताने बसलो आहे, तर व्यापाºयांनी शेतकºयांकडून विक्रीसाठी आलेले धान्य मोजणी व तोलाई व भरण्यासाठी फक्त दोनच हमाल मदत करतील, अशी सूचना सचिव यांनी दिली आहे.या वेळी हमालांनी आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कसे तरी हमाली करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. शेतकºयाचे एखादे ट्रॅक्टर आले, की दोनच हमाल संपूर्ण माल कसा मोजतील आणि भरतील? सचिव चौधरी यांच्या आडमुठ्या धोरणाला आम्ही कंटाळलो असल्याच्या भावना हमाल वर्गाने बोलून दाखविल्या .याबाबत सचिव रमेश चौधरी यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, मार्केट चालू करावे का याबाबत तहसिलदारांना पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत, अशी माहिती दिली.तहसीलदार अनिल गवांदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सचिवांना नियमानुसार खरेदी सुरू करा. जास्त गर्दी होणार नाही, शेतकºयांचे हाल होणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. आता या लपाछपीत शेतकºयांचा माल खरेदीसाठी कृउबा मार्केट केव्हा सुरू होते, याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

टॅग्स :MarketबाजारParolaपारोळा