शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

पीकविमा कंपनी व कृषिविभागाचा भुलभुलैया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST

केऱ्हाळे,ता. रावेर : नुकसान भरपाईस पात्र केळी उत्पादक लाभार्थी शेतकऱ्यांना पैसे देण्यास असमर्थ ठरलेल्या पीकविमा कंपनीने आता कृषी विभागाला ...

केऱ्हाळे,ता. रावेर : नुकसान भरपाईस पात्र केळी उत्पादक लाभार्थी शेतकऱ्यांना पैसे देण्यास असमर्थ ठरलेल्या पीकविमा कंपनीने आता कृषी विभागाला पुढे करून अयशस्वी ठरल्याचे खापर बँकांवर फोडून आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या प्रशासकीय यंत्रणेच्या खेळात शेतकऱ्यांचे काटेलोचन होत आहे. याची जाणीव ठेवणे गरजेचे झाले आहे. असंख्य शेतकरी अद्यापही वाऱ्यावर असून रकम मिळण्यासाठी लाहीलाही झालेल्या शेतकऱ्यांना नऊ महिने उलटून देखील वाटच पहावी लागत आहे.

सन २०१९/२० च्या केळी पीकविमा घेणाऱ्या कंपनीकडून भरपाई मिळवून देण्यासंदर्भात सर्व संबंधित असलेल्या विभागाने आटोकाट प्रयत्न केले असता देखील या विषयाला अद्यापही पूर्णविराम मिळत नसल्याने यामध्ये खरा ‘खलनायक’ कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तर कमाल व किमान तापमानाच्या

भरपाईची रक्कम कशी वर्ग झाली

वादळी नुकसानीची रक्कम मिळण्याबाबत बँका विलंब करीत आहेत असा आरोप कृषी विभाग व विमा कंपनी करत असेल तर ते धादांत खोटे असल्याचे उघड होत आहे . कारण कमाल व किमान तापमानाच्या नुकसान भरपाई पोटी मिळणारी रक्कम न चुकता सर्व शेतकऱ्यांना बिना दिक्कत याच बँकांकडून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती तेव्हा बँका बरोबर होती का? जर एखाद दुसऱ्या बँकेची अडचण असल्यास बाकी सर्व बँकांना जबाबदार धरण्यामागचे कारण काय? असा प्रश्न विचारला जात आहे.

विमा संरक्षण घेते वेळी विमा कंपनी बँकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची खात्यासंदर्भात इत्यंभूत माहीत घेत असते . त्यामुळे खाते नंबर चुकीचे असल्याचे कारण पुढे करून दिशाभूल करणे याठिकाणी योग्य ठरणार नाही.

केऱ्हाळे येथील बँकेत अजूनही कंपनीकडून संपर्क नाही

याबाबत केऱ्हाळे येथील युनियन बँक प्रबंधकास विचारले असता आता पर्यंत सन २०१९/२० च्या पीकविमा कंपनी कडून खाते नंबर अथवा शेतकरी संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती तथा पत्रव्यवहारद्वारे करण्यात आलेला नाही.