शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

कोजागरी : उपवास, पूजन व जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 23:37 IST

कोजागरी किंवा शरद पौर्णिमा ही अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा. शरद ऋतूमध्ये पौर्णिमा येत असल्याने तिला शरद पौर्णिमाही म्हणतात. या ...

कोजागरी किंवा शरद पौर्णिमा ही अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा. शरद ऋतूमध्ये पौर्णिमा येत असल्याने तिला शरद पौर्णिमाही म्हणतात. या दिवशी साक्षात लक्ष्मी पृथ्वीतलावर उतरते आणि मध्यरात्री को जागरती... असे विचारत असते. ती पाहते की कोण कोण जागा आहे म्हणजे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे. वामन पुराणात दीपदान जागर असे म्हटले आहे या दिवशी बळीराजाची देखील पूजा करतात. या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. तसेच रात्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते. उपवास, पूजन व जागरण या तिन्ही गोष्टी या व्रतात समाविष्ट आहेत. पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी आप्तेष्टांना दिले जाते. चंद्राला आटवलेल्या दूधाचा नैवेद्य दाखवतात. ब्रह्म पुराणात या व्रताची कथा थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडून स्वच्छता करून घरे सुशोभित करावी, गृहदाराजवळ अग्नि प्रज्वलित करून त्याची पूजा करावी पृथ्वीची पूजा करून त्याला दूध खिरीचा नैवैद्य दाखवावा यादिवशी आटवलेल्या दुधात केशर पिस्ता, बदाम, वेलदोडे, जायफळ, साखर घालून लक्ष्मीदेवीला नैवद्य अर्पण करतात. दुधामध्ये मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडतात. मग ते दूध प्राशन करतात. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. दमा किंवा अस्थमा यासारख्या आजारांसाठी हे औषध खिरी मध्ये मिसळून कोजागिरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवले जातात. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो, असे मानले जाते इतर राज्यांमध्ये सुद्धा हा उत्सव साजरा केला जातो. श्रीलक्ष्मीची सेवा करण्याचा हा एक उत्तम योग आहे. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. जसे वित्त लक्ष्मी, गुणलक्ष्मी लक्ष्मी, भाग्य लक्ष्मी... अशी सर्वच प्रकारची लक्ष्मी ही जागृत माणसाला मिळते. देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे, कृपाळू आहे, सर्वांचे हित करणारी आहे म्हणून या पौर्णिमेला जास्त महत्व आहे. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्र्रसुुद्धा पृथ्वीवर फिरत असतो व तोसुद्धा विचारत असतो कोण कोण जागा आहे.केवळ कोजागिरीलाच नाही तर सदैव माणसाने जागे राहणे आपल्या हितासाठी ते आवश्यक आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात... माणसाने सदैव प्रयत्नशील राहावे व उत्तम आयुष्य जगावे यासाठीच कदाचित अशा उत्सवांची योजना केलेली असावी. यामुळे मनुष्याला जीवन जगण्याची संजीवनी मिळत असते.- भाऊराव महाराज पाटील, मुक्ताईनगर

टॅग्स :Jalgaonजळगाव