शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

कोजागरी : उपवास, पूजन व जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 23:37 IST

कोजागरी किंवा शरद पौर्णिमा ही अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा. शरद ऋतूमध्ये पौर्णिमा येत असल्याने तिला शरद पौर्णिमाही म्हणतात. या ...

कोजागरी किंवा शरद पौर्णिमा ही अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा. शरद ऋतूमध्ये पौर्णिमा येत असल्याने तिला शरद पौर्णिमाही म्हणतात. या दिवशी साक्षात लक्ष्मी पृथ्वीतलावर उतरते आणि मध्यरात्री को जागरती... असे विचारत असते. ती पाहते की कोण कोण जागा आहे म्हणजे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे. वामन पुराणात दीपदान जागर असे म्हटले आहे या दिवशी बळीराजाची देखील पूजा करतात. या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. तसेच रात्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते. उपवास, पूजन व जागरण या तिन्ही गोष्टी या व्रतात समाविष्ट आहेत. पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी आप्तेष्टांना दिले जाते. चंद्राला आटवलेल्या दूधाचा नैवेद्य दाखवतात. ब्रह्म पुराणात या व्रताची कथा थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडून स्वच्छता करून घरे सुशोभित करावी, गृहदाराजवळ अग्नि प्रज्वलित करून त्याची पूजा करावी पृथ्वीची पूजा करून त्याला दूध खिरीचा नैवैद्य दाखवावा यादिवशी आटवलेल्या दुधात केशर पिस्ता, बदाम, वेलदोडे, जायफळ, साखर घालून लक्ष्मीदेवीला नैवद्य अर्पण करतात. दुधामध्ये मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडतात. मग ते दूध प्राशन करतात. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. दमा किंवा अस्थमा यासारख्या आजारांसाठी हे औषध खिरी मध्ये मिसळून कोजागिरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवले जातात. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो, असे मानले जाते इतर राज्यांमध्ये सुद्धा हा उत्सव साजरा केला जातो. श्रीलक्ष्मीची सेवा करण्याचा हा एक उत्तम योग आहे. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. जसे वित्त लक्ष्मी, गुणलक्ष्मी लक्ष्मी, भाग्य लक्ष्मी... अशी सर्वच प्रकारची लक्ष्मी ही जागृत माणसाला मिळते. देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे, कृपाळू आहे, सर्वांचे हित करणारी आहे म्हणून या पौर्णिमेला जास्त महत्व आहे. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्र्रसुुद्धा पृथ्वीवर फिरत असतो व तोसुद्धा विचारत असतो कोण कोण जागा आहे.केवळ कोजागिरीलाच नाही तर सदैव माणसाने जागे राहणे आपल्या हितासाठी ते आवश्यक आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात... माणसाने सदैव प्रयत्नशील राहावे व उत्तम आयुष्य जगावे यासाठीच कदाचित अशा उत्सवांची योजना केलेली असावी. यामुळे मनुष्याला जीवन जगण्याची संजीवनी मिळत असते.- भाऊराव महाराज पाटील, मुक्ताईनगर

टॅग्स :Jalgaonजळगाव