शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

कोजागरी : उपवास, पूजन व जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 23:37 IST

कोजागरी किंवा शरद पौर्णिमा ही अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा. शरद ऋतूमध्ये पौर्णिमा येत असल्याने तिला शरद पौर्णिमाही म्हणतात. या ...

कोजागरी किंवा शरद पौर्णिमा ही अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा. शरद ऋतूमध्ये पौर्णिमा येत असल्याने तिला शरद पौर्णिमाही म्हणतात. या दिवशी साक्षात लक्ष्मी पृथ्वीतलावर उतरते आणि मध्यरात्री को जागरती... असे विचारत असते. ती पाहते की कोण कोण जागा आहे म्हणजे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे. वामन पुराणात दीपदान जागर असे म्हटले आहे या दिवशी बळीराजाची देखील पूजा करतात. या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. तसेच रात्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते. उपवास, पूजन व जागरण या तिन्ही गोष्टी या व्रतात समाविष्ट आहेत. पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी आप्तेष्टांना दिले जाते. चंद्राला आटवलेल्या दूधाचा नैवेद्य दाखवतात. ब्रह्म पुराणात या व्रताची कथा थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडून स्वच्छता करून घरे सुशोभित करावी, गृहदाराजवळ अग्नि प्रज्वलित करून त्याची पूजा करावी पृथ्वीची पूजा करून त्याला दूध खिरीचा नैवैद्य दाखवावा यादिवशी आटवलेल्या दुधात केशर पिस्ता, बदाम, वेलदोडे, जायफळ, साखर घालून लक्ष्मीदेवीला नैवद्य अर्पण करतात. दुधामध्ये मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडतात. मग ते दूध प्राशन करतात. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. दमा किंवा अस्थमा यासारख्या आजारांसाठी हे औषध खिरी मध्ये मिसळून कोजागिरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवले जातात. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो, असे मानले जाते इतर राज्यांमध्ये सुद्धा हा उत्सव साजरा केला जातो. श्रीलक्ष्मीची सेवा करण्याचा हा एक उत्तम योग आहे. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. जसे वित्त लक्ष्मी, गुणलक्ष्मी लक्ष्मी, भाग्य लक्ष्मी... अशी सर्वच प्रकारची लक्ष्मी ही जागृत माणसाला मिळते. देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे, कृपाळू आहे, सर्वांचे हित करणारी आहे म्हणून या पौर्णिमेला जास्त महत्व आहे. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्र्रसुुद्धा पृथ्वीवर फिरत असतो व तोसुद्धा विचारत असतो कोण कोण जागा आहे.केवळ कोजागिरीलाच नाही तर सदैव माणसाने जागे राहणे आपल्या हितासाठी ते आवश्यक आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात... माणसाने सदैव प्रयत्नशील राहावे व उत्तम आयुष्य जगावे यासाठीच कदाचित अशा उत्सवांची योजना केलेली असावी. यामुळे मनुष्याला जीवन जगण्याची संजीवनी मिळत असते.- भाऊराव महाराज पाटील, मुक्ताईनगर

टॅग्स :Jalgaonजळगाव