शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

सामान्य जनता आणि मातीशी घट्ट नातं जपताहेत किशोर पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 15:44 IST

कष्ट,जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्याच बळावर सायकलीवर भाजी विकणारा भाजी विक्रेता ते एक यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार किशोर पाटील यांनी केलेला प्रवास खरोखर विस्मयकारक आहे!

ठळक मुद्देभाजी विक्रेता ते एक यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार किशोर पाटील यांचा विस्मयकारक प्रवासशेतकरी व जनतेसाठी स्वत:च्याच शासनाविरोधात अनेकदा आंदोलने

पाचोरा ( महेश कौंडिण्य)शांत, संयमी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी तितकंच आक्रमक होणारं व्यक्तिमत्व अर्थात आमदार किशोर पाटील! कष्ट,जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्याच बळावर सायकलीवर भाजी विकणारा भाजी विक्रेता ते एक यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार किशोर पाटील यांनी केलेला प्रवास खरोखर विस्मयकारक आहे!किशोर पाटील यांचे काका व माजी आमदार आर.ओ. पाटील यांनी उद्योग क्षेत्रातून राजकारणात यशस्वी प्रवेश केला. बाळासाहेब ठाकरे यांची अफाट सभा पाचोरा शहराने अनुभवली तीसुद्धा आर. ओ .पाटील यांच्या प्रचारासाठी. आणि तिथूनच आर.ओ. पाटील यांच्या या यशासोबतच त्यांचा वसा जोपासणारा एक सक्षम युवक घडायला सुरुवात झाली होती.किशोर पाटील यांनी पोलिस कॉन्स्टेबलपदाचा राजीनामा देवून राजकारणात प्रवेश केला. २००१ मध्ये ते पाचोरा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. शिवसेनेने त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा दिली. माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारे किशोर आप्पा सामान्यातल्या सामान्य म्हणूनच वावरत असतात.एकीकडे आर. ओ. पाटील यांच्या कामातील व्यग्रता, शांतपणा,सखोल नियोजन, शिस्तबद्ध दैनंदिनी, त्यातील कमालीचे सातत्य, विरोधकांनी कितीही आरोप-प्रत्यारोप केले तरी ते पेलण्याची धीरोदात्त वृत्ती, मुत्सद्दीपणा आणि दूरदृष्टी यासारख्या गुणांचा अनुभव किशोर पाटील यांच्या बोलणे आणि वागण्यातून येत असतो.जनतेशी थेट संपर्क ही त्यांची सगळ्यात मोठी जमेची बाजू ठरली. जेव्हा आर.ओ.पाटील यांनी आमदार म्हणून निवडणूक लढवायची नाही असं ठरवलं तेव्हा त्यांना किशोर अप्पांसारखं कुशल आणि यशस्वी नेतृत्व खुणावत होतं! सन २०१४ मध्ये किशोर आप्पा आमदार म्हणून निवडून आले.आर .ओ. पाटील यांच्याकडून मिळालेला वसा जोपासत त्यांनी सामान्य जनतेशी आणि मातीशी असलेलं आपलं नातं कधीच तोडलं नाही. त्यांनी प्रत्येक संधीचं सोनं केलं. नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार असोत की मग जिल्हा बँकेचे संचालक,उपाध्यक्ष किंवा जिल्हा दूध संघाचे संचालक असोत, आपल्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी सामान्य जनतेचाच विचार बाळगला. शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हितासाठी किशोर पाटील यांनी स्वत:च्याच शासनाविरोधात कधी रास्ता रोको केला तर कधी भडगाव येथील १३२ केव्ही सबस्टेशनसाठी शासनाविरोधात अधिवेशनाच्या काळात उपोषण सुरू केले. आर.ओ.पाटील यांच्याकडून घेतलेला वसा किशोर आप्पा यांनी समर्थपणे पेललेला आहे. 

टॅग्स :Politicsराजकारण