शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

जनजागृतीसाठी व्याख्यानापेक्षा कीर्तन प्रभावी - हभप श्यामसुंदर सोन्नर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 21:13 IST

समाजाला एकत्र आणण्याचे काम संतांनी केले

ठळक मुद्देप्रेम सुख घेई प्रेम सुख देईकर्मकांडात अडकलेल्या समाजास एकत्र आणण्याचे काम

जळगाव : शेतकरी आत्महत्या, स्त्री भ्रुणहत्या या सारख्या विषयांमध्ये व्याख्यानांपेक्षा कीर्तनातून मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली. ‘स्त्री जन्म म्हणोनी न व्हावे उदास’ जनाबार्इंच्या ओवीतून होणारी जनजागृती मोठी परिणामकारक ठरत आल्याची माहिती हभप श्यामसुंदर सोन्नर यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या मुलाखतीत दिली.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृती विवेक व्याख्यानमालेसाठी ते जळगावात आले असता, त्यांच्याशी संवाद साधला.हभप सोन्नर म्हणाले, वारकरी संप्रदायास ७०० वर्षांची परंपरा आहे. संत नामदेव, संत चोखामेळा यांच्या सारख्या अनेक संतांनी एक चळवळ उभी केली. समाजमन अस्वस्थ असते त्यावेळी चळवळीची निर्मिती होते. भारतावर अनेक परकियांनी आक्रमण केले. बादशाही, निजामशाही, इंग्रज अशा अनेक सत्ता वेगवेगळ्या प्रांतात होत्या. या काळात अस्वस्थ समाजास एकत्र आणण्याचे काम संतांनी केले. दुबळ्यांवर कोणीही राज्य करू शकते. हे दुबळेपण कोणी दूर केले असेल तर ते वारकरी संप्रदायातील संतांनी. संत नामदेव यांनी अशा काळात जाती धर्माची बंधणे तोडून, कर्मकांडात अडकलेल्या समाजास एकत्र आणण्याचे काम केले.वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाज घडविण्याची चळवळ ही संत ज्ञानेश्वरांनी सुरू केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचा विडा उचलला त्या काळापर्यंत संत तुकाराम महाराज यांनी २१ अभंगांच्या माध्यमातून समाज मन घडविले. १८ पगड जातींना एकत्र आणले.प्रेम सुख घेई प्रेम सुख देईवारकरी संप्रदायापुढील अडचणींबाबत बोलताना हभप सोन्नर महाराज म्हणाले, अडचणी असल्या तरी वारकरी पंढरीच्या वाटेला निघतो त्यावेळी त्याने मनात एक निश्चय केला असतो. ‘प्रेम सुख देई प्रेम सुख घेई’ येणाऱ्या अडचणींवर मात करत तो पुढे जात असतो. पंढरपुुरात दिंडी येते त्यावेळी ज्या सुधारणा होतात त्या अगोदरच पूर्ण केल्या जाणे आवश्यक आहे. वेळेवर कामे होत असल्याने वाकºयांना त्रास होतो. पूर्वी फार सुविधा नसत मात्र आता आरोग्यासह विविध सुविधा दिल्या जातात.

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव