शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अंत्ययात्रेसाठी जमलेल्या आदिवासी महिलांवर काळाचा घाला, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 23:30 IST

मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जमलेल्या महिलांवरच काळाने घाला घातला. ही घटना वरगव्हाण येथे २९ रोजी घडली.

ठळक मुद्देवरगव्हाणची घटना : भिंत कोसळल्याने सहा महिला जखमी, दुर्दैवी घटनेने शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्क

बिबिडगाव, ता. चोपडा : मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जमलेल्या महिलांवरच काळाने घाला घातला. ओट्यावर बसलेल्या असताना भिंत कोसळून एक आदिवासी महिला ठार तर सहा महिला जखमी झाल्याची घटना वरगव्हाण येथे २९ रोजी घडली.

पुरूष मंडळी प्रेत घेऊन स्मशानभूमीत गेले होते. समाज प्रथेप्रमाणे सर्व महिला गावहाळ जवळ हातपाय धुण्यासाठी गेल्या असताना शेजारीच असलेल्या एका बांधकामाच्या ओट्यावर काही महिला बसल्या. क्रूर काळाने या गरीब आदिवासी महिलांवर आपला डाव साधत ओट्यासह भिंत कोसळली. व एक महिला जागीच ठार झाली तर तब्बल सहा महिला जखमी झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी वरगव्हान येथे संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली.

चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथे रामा रतन पावरा यांची  सून उषाबाई विजय पावरा यांचे निधन झाले होते. त्यामुळे नातेवाईक व आप्तेष्ट अंत्यसंस्कारासाठी जमलेले होते. मयत महिलेचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी पुरूष मंडळी घेऊन गेले होते. इकडे सर्व महिला समाज प्रथेप्रमाणे संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास गावहाळवर गेल्या व काही महीला शेजारीच बांधकाम सुरु असलेल्या भिकन दमड्या पावरा यांच्या ओट्यावर बसल्या होत्या. त्यावेळी अचानक ओट्यासह घराची भिंत पडली व क्षणात होत्याचे नव्हते झाले. यात गावातीलच जेलीबाई परशुराम बारेला ही अपंग महिला जागीच ठार झाली तर त्यांच्यासोबत लालबाई मारसिंग पावरा, कुसुमबाई नरसिंग पावरा, कालुबाई प्रताप बारेला, बाकलीबाई भाईदास पावरा, जसुबाई शेवा पावरा, सायकाबाई भायला पावरा या गंभीर जखमी झाल्या.

घटना घडली तेव्हा सर्व पुरुष अंत्ययात्रेत गेले होते. यावेळी गावाचे सरपंच भूषण पाटील यांनी स्वतःच्या गाडीत जखमींना टाकत धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले तेथे एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. आरोग्य सेविका भिकूबाई बोदडे व भारती सोनवणे यांनी उपचार करत जखमींना अधिक उपचारासाठी जळगावी रवाना केले.

याठिकाणी पं. स.चे उपसभापती सुर्यकांत खैरनार यांनी भेट दिली तर घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अनिल गावित, गटविकास अधिकारी बी. एस. कोसोदे, तलाठी सरोवर तडवी यांनी भेट दिली तर अडावद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांनीही आपले सहकारी पाठवत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रवाना केले.

पती - पत्नीचा आधीच अपंगत्वाशी संघर्ष

पती आणि पत्नीचा अपंगत्वाशी संघर्ष करतच संसार सुरु होता. त्यांना तिन्ही मुलीच.. आणि आता क्रुर काळाने पत्नीलाही हिरावले. असा दुर्दैवी व ह्रदय पिळवटून टाकणारा हा प्रसंग हा या घटनेतील मयत जेलीबाईचे पती परशुराम नागराज पावरा यांच्यावर आलाय. पत्नी अपंग असुनही काम करायच्या, स्वतः ही अपंग असतांना गुो चारून आपल्या संसाराचा शगाडा चालवून तिन्ही मुलींचे शिक्षण करण्यासाठी धडपड सुरू होती. त्यातही आता क्रुर काळाने घात करुन पत्नीलाही कायमचं हिरावून नेल्याने हळहळ व्यक्त होत असून किमान शासनाने तरी या दुर्दैवी परशुराम यांच्या या संकटात आर्थिक फुंकरचा मलम लावावा अशी मागणी होत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडाDeathमृत्यू