शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

शहरातील २० किमीच्या रस्त्यांच्या हस्तांतरणाचा ‘पोरखेळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:20 IST

अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची एकीकडे वाट लागली असताना दुसरीकडे शहरातील मुख्य ...

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांची एकीकडे वाट लागली असताना दुसरीकडे शहरातील मुख्य रस्त्यांच्या हद्दीवरून मनपा व बांधकाम विभागाकडून टोलवा-टोलवी सुरू आहे. मुख्य भागातून जाणाऱ्या २० किमीचे रस्ते मनपाकडून बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याचा शासन निर्णय ४ मे २०१७ रोजी झाला आहे. मात्र, मनपाने अजूनही हे रस्ते बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केले नसल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे, तर मनपा प्रशासन याबाबत अभ्यास सुरू असल्याचे उत्तर देत आहे. मनपा व पीडब्ल्यूडी प्रशासनाच्या पोरखेळात मात्र जळगाकर भरडले जात आहेत.

महापालिकेने ३१ मार्च २०१७ च्या महासभेत शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील रस्ते बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. या ठरावानुसार राज्य शासनानेदेखील निर्णय घेऊन हे रस्ते महापालिकेकडून बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात येत असल्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चार वर्षे होऊनदेखील हे रस्ते नेमके मनपाच्या मालकीचे की बांधकाम विभागाचे याचा तिढा अजूनही सुटलेला नाही.

शासन निर्णयानुसार जर रस्ता पीडब्ल्यूडीकडे तर मनपाकडून दुरुस्ती का ?

शासन निर्णयानुसार हे रस्ते जर बांधकाम विभागाकडे वर्ग झाले असतील तर चार वर्षांपासून महापालिकेकडून या रस्त्यांवर डागडुजी करून लाखोंची उधळपट्टी का करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच जर शासन निर्णय झाल्यानंतरही महापालिकेने हे रस्ते बांधकाम विभागाकडे वर्ग केले नसतील तर मग हस्तांतरित न करण्याचे नेमके कारण काय? याबाबत मनपा प्रशासनाकडून कोणतीही माहिती दिली जात नाही.

बांधकाम विभागाने मनपाकडे पत्रव्यवहार, मनपाकडून मात्र उत्तर नाही

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका मुख्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शासन निर्णय जरी झाला असला तरी मनपाने हे रस्ते बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केलेले नाहीत. बांधकाम विभागाने हे रस्ते हस्तांतरित करण्याआधी या रस्त्यावरील अतिक्रमण काढून देण्याबाबत मनपाकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र, मनपाने यावर कोणतेही उत्तर बांधकाम विभागाला दिलेले नाही. यासह याबाबत संयुक्तिक बैठक घेण्याबाबतदेखील पत्रव्यवहार करण्यात आला; मात्र मनपाने याकडेही दुर्लक्ष केल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.

२० किमीच्या या रस्त्यांचा समावेश

१. शिवाजीनगर-लाकूड पेठ-कानळदा नाका - ३ किमी

२. अजिंठा चौक - टॉवर चौक - शनिपेठ - ममुराबाद रस्ता - ५.५० किमी

३. निमखेडी-दूध फेडरेशन-टॉवर चौक-आसोदाकडे जाणारा रस्ता - ६.५० किमी

४. टॉवर चौक- स्वातंत्र्य चौक - जिल्हाधिकारी कार्यालय -लांडोरखोरी - ३.२२ किमी

५. टॉवर चौक- शिवाजीनगर-लाकूड पेठ - ०.८० किमी

कोट..

महापालिकेचे रस्ते बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबतचा शासन निर्णय झाला आहे. तसेच याबाबत झालेल्या पूर्ण प्रक्रियेची माहिती घेतली जाण्याचे काम सुरू आहे. याबाबत संपूर्ण माहिती घेऊनच या निर्णयाबाबत सांगता येईल. या निर्णयाबाबत अभ्यास सुरू आहे.

- सतीश कुलकर्णी, मनपा आयुक्त