शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
6
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
7
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
8
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
9
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
10
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
11
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
12
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
13
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
14
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
15
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
16
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
17
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
19
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
20
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

ममुराबाद परिसरात खरीपाची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 21:59 IST

ममुराबाद, ता. जळगाव : परिसरात परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन आणि कापूस पिकाची अतिशय वाईट अवस्था ...

ममुराबाद, ता. जळगाव : परिसरात परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन आणि कापूस पिकाची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. पावसात भिजलेल्या कापसासह धान्याला जागेवरच कोंब फुटले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या पदरी केवळ निराशा पडली आहे.सततच्या पावसामुळे पूर्वहंगामी उन्हाळी कपाशीचे नुकसान झाल्याने दसरा झाल्यानंतर घरात कापूस आल्यानंतर दिवाळी साजरी करणा?्या शेतकऱ्यांसमोर यंदा अंधार पसरला आहे. पावसामुळे जमिनीलगतच्या कैºया तसेच बोंड कुजल्यानंतर वरचा बहार तरी उत्पन्न देईल, अशी आशा शेतकरी बाळगून होते. प्रत्यक्षात सतत पाऊस सुरू राहिल्याने वरील फांद्याना लागलेल्या कापसाच्या बोंडांमधील सरकीलाही कोंब फुटले आहेत.बियाणे, खते, फवारणी तसेच मशागतीसाठी अतोनात खर्च करूनसुद्धा घरात एक बोंड न आल्याने कापूस उत्पादकांना डोक्याला हात लावावा लागला आहे. अशाच प्रकारे उडीद व मूग ही पिके शेतात सडल्यानंतर सोयाबीन, ज्वारी, बाजरी आणि मका ही पिके तरी वाचतील, असे शेतकºयांना वाटले होते. मात्र, पावसाने शेतकºयांच्या उरल्या सुरल्या आशेवरही पाणी पाडले आहे. तसे पाहिले तर परिपक्व झालेल्या सर्व पिकांची पंधरा दिवसांपूर्वीच काढणी करायला पाहिजे होती. परंतु, पाऊस एकसारखा सुरुच असल्याने शेतक?्यांना नाईलाज झाला असून, डोळ्यादेखत मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या हंगामाची राखरांगोळी होताना पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.काही शेतकºयांनी दसरा झाल्यानंतर पावसाची उघडीप मिळताच ज्वारी तसेच सोयाबीची कापणी करण्याची घाई केली होती. मात्र, त्यांना कापलेले पीक उचलण्याची सवडही पावसाने दिलेली नसून, जमिनीवर पडलेले धान्य जागेवरच उगवले आहे. शासनाने ओल्या दुष्काळाची स्थिती लक्षात घेता नुकसानीचे पंचनामे करण्यात वेळ घालविण्यापेक्षा नुकसानग्रस्तांना सरसकट मदत देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव