शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
2
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
3
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
4
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
5
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
6
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
7
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
8
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
9
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
10
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
11
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
12
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
13
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
14
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
15
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
16
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
17
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
18
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
19
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
20
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणातील सर्वदूर अमृतधारांनी खरीप हंगामाला संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:22 IST

जळगाव : तब्बल एक महिन्याचा खंड, पुष्य, आश्लेषा ही हमीच्या पावसाची नक्षत्रे कोरडी गेली. श्रावणाच्या सुरुवातीलाच बसू ...

जळगाव : तब्बल एक महिन्याचा खंड, पुष्य, आश्लेषा ही हमीच्या पावसाची नक्षत्रे कोरडी गेली. श्रावणाच्या सुरुवातीलाच बसू लागलेला उन्हाचा तडाखा यामुळे ऐन फुलोरा ते पक्वतेच्या अवस्थेत खरिपातील सर्वच पिके माना टाकत करपू लागली होती. मंगळवारी मघा नक्षत्र लागले अन् त्याच रात्रीपासून रिमझिम श्रावणसरी बरसल्या. खरीप हंगाम वाया जाता जाता वाचला खरा; पण सरासरी उत्पादनात घट येणार असल्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत.

या पावसाचा प्रामुख्याने कपाशी पिकालाच अधिक लाभ होणार आहे. मका, बाजरी या पिकांना जो बसावयाचा तो फटका बसलाच आहे. काही क्षेत्रावरील उडीद, मूग, सोयाबीनमध्ये फुलगळ झाली आहे. आता काही क्षेत्रावर या पिकात शेंगा पक्वतेकडे आहेत. पावसाचे वातावरण राहिल्यास यात नुकसान संभवते. पूर्वहंगामी कापसात पक्व कैऱ्यासडची धास्ती आहेच.

चाळीसगावला भिजपावसाने पिकांना बूस्टर

चाळीसगावः गत तीन आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे मंगळवारी कमबॅक झाले. बुधवारीही संततधार कायम होती. भिजपावसामुळे ८६ हजार हेक्टरवरील पिकांना बूस्टर डोस मिळाला आहे. मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. मंगळवारी पाऊस आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

चौकट

पाणी टंचाईचे सावट

पावसाचे कमबॅक झाले असले तरी, मध्यम प्रकल्प कोरडेठाक असून दमदार व वाहून निघणाऱ्या पावसाची प्रतीक्षा आहे. विहिरींची जलपातळी खालावल्याने बागायती पिकांना देखील दमदार पावसाची गरज आहे. गत वर्षापेक्षा यंदा पावसाची सरासरी कमी असून, अशीच स्थिती राहिल्यास पाणीबाणी निर्माण होऊ शकते. गिरणा धरणात ४० तर मन्याडमध्ये २५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. तालुक्यातील १४ मध्य जल प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आहे.

अमळनेर : एकाच दिवसात

सरासरी ७० मिमी पाऊस !

तब्बल दीड महिन्यानंतर अमळनेर तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. २४ तासात सरासरी ७० मिमी पाऊस पडला आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच दिवसा काळ्याकुट्ट ढगांनी अंधारलेले वातावरण होते व ढग गडगडल्याचा आवाज कानी पडला. दुसऱ्या दिवशी देखील दिवसभर पाऊस सुरू होता.

हंगामावर परिणाम होणार

रावेर : बुधवारी रात्री व गुरुवारी पूर्वरात्री तथा पहाटेसुद्धा दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. आज मितीस खरिपाच्या हंगामाला नवसंजीवनी लाभली असली तरी, तब्बल महिनाभरापासून पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने फल व फूलधारणेच्या अवस्थेत असलेल्या खरिपाच्या हंगामाला असह्य ताण बसला असून, खरिपाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होऊन आजच्या पावसाची नवसंजीवनी मिळाली असली तरी उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नदी, नाले, तलाव कोरडेच

खेडगाव ता. भडगाव : या खरिपात सुरुवातीला मे-जून महिन्यात कुठे-कुठे पाऊस झाला. सर्वत्र तो एकसारखा बरसला नाही. हंगाम एकसमान नाही. यानंतर जूनमध्ये प्रथम खंड पडला. पुन्हा जुलैच्या सुरुवातीला पुनर्वसू नक्षत्रात पावसाचे पुनरागमन होत हंगामाचे पुनर्वसन झाले. हा पाऊसही सर्वदूर नव्हता. १५, १८ जुलैपर्यंत तो आज इथे, उद्या तिथे असा झाला. पुन्हा एक महिन्याच्या खंडानंतर तो काल-परवा बरसता झाला.

या पावसाळ्यात श्रावण सरींच्या रूपात प्रथमच सर्वदूर व सार्वत्रिक पाऊस बरसला हे येथे विशेष होय. अजूनही गिरणा नदी व इतरही नदी-नाले, तलाव कोरडे असल्याने एक-दोन जोरदार पावसाची आवश्यकता आहे.

एकूणच काहीसा तारक, काहीसा मारक असा मघा नक्षत्रातील पाऊस राहणार आहे.

फोटो: कधी नव्हे ते ऐन श्रावणात नदी-नाल्यांची वाहती धार, गिरणा नदीतील पाण्याचे डोह हे असे आटले आहेत. आता श्रावण सरी मुसळधार बरसण्याची गरज आहे.

भिजपावसाने

जमीन झाली रेलचेल

आडगाव/वाघडू, ता. चाळीसगाव : रात्रभर व बुधवार दुपारपासून भिजपावसाने जमीन रेलचेल झाली, त्यामुळे गेल्या एक-दीड महिन्यापासून पावसाविना व्याकूळ झालेल्या कपाशी व मका पिकाला एकप्रकारे बूस्टर डोस मिळाला. भिजपाऊस पडत असल्याने शेताबाहेर पाणी निघाले नाही. दडक्या पावसाची शेतकरी वाट पाहत आहेत.

आशा पल्लवित उडीद, मूग दाणा भराईवर

बोदवड : मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने शेतकरी राजाचा जीव भांड्यात पडला आहे. हातात असलेला घास हिरावण्याची शक्यता असताना ऐनवेळी पावसाने धीर देत दिलासा दिला.

गेल्या काही दिवसांपासून ऊन खात असलेला मका या पाण्याने तगला तसेच कपाशीही तरारली तर दाणे भराईवर आलेला उडीद व मूग काहीअंशी मार खाण्याची स्थिती आहे. परंतु, पावसाने इतर पिके मात्र वाचणार आहेत. बोदवड परिमंडळमध्ये ३८, नाडगाव २५, करंजी २६ असा एकूण ५९ मिमी पाऊस झाला.

पारोळ्यात दिवसभर रिपरिप

पारोळा : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली. बुधवारी संततधार पावसाने रात्रीपासून संपूर्ण दिवसभर सुरू होता. दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही. या रिपरिप पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील बोरी, म्हसवे, भोकरबारी, इंदासी, कंकराज, या धरणातील पाणी पातळी काहीअंशी वाढल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.