शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

हरताळे परिसरात खरीप बुडाला, रब्बीची आशा मावळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 01:23 IST

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे परिसरात परतीच्या पावसाने दिलेला धोका आणि सिंचनाची सुविधा नसल्याने खरीप हंगाम बुडाला असून रब्बीचीही आशा मावळली आहे.

ठळक मुद्देसिंचनाची सुविधा करण्याची मागणीभारनियमनाचे भूतही शेतकºयांच्या मानगुटीवर

लोकमत न्यूज नेटवर्कहरताळे, ता.मुक्ताईनगर : यंदाही परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने निराशा हाती आली आहे. खरीप बुडाला तरी रब्बीची आशा होती. परंतु, रब्बी पिकासाठी आवश्यक असणारा परतीचा पाऊस झाला नाही. त्यात हरताळे परिसरात सिंचनाचीही सोय उपलब्ध नसल्यामुळे आता खरिपाबरोबर रब्बीचीही आशा मावळली आहे.बहुतांश पिके पावसावर अवलंबून होते. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कापूस, ज्वारी, मका कडधान्य आदी पिकांची पेरणी केली होती. सुरवातीला पावसाने चांगली हजेरी दिली. पाऊस दमदार नसला तरी हलक्या सरी जोरात होत्या. परंतु सर्वच पिके फुलोरा येण्याच्या वेळीच खरिपाची हानी झाली. दमदार पावसाअभावी शेतकºयांना पिकास वाचविणे शक्य झाले नाही.खरीपाच्या पिकाचे नुकसान झाले असले तरी शेतकरी रब्बी पिकावर अवलंबून असतात. त्यासाठी परतीच्या पावसाची प्रतिक्षाच राहिली. सप्टेंबर, आॅक्टोबर संपुर्ण कोरडा गेला. विहिरी, नदी, नाले कोरडे राहिले. विहिरी बोअरवेलची पाणी पातळी वाढली नाही. त्यामुळे रब्बीच्या गहू, हरभरा, मका या प्रमुख पिकांच्या लागवडीसाठी मुहूर्त शेतकºयांना अद्याप गाठता आला नाहीं .किंबहूना पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता ही पिके घ्यावीत की नाही असा प्रश्न उपस्थित झाला. दुसरीकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने शेकडो हेक्टर शेती रब्बी हंगामापासून वंचितच आहे कारण जमिनीत ओलावा नाही. 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प