शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

हरताळे परिसरात खरीप बुडाला, रब्बीची आशा मावळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 01:23 IST

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे परिसरात परतीच्या पावसाने दिलेला धोका आणि सिंचनाची सुविधा नसल्याने खरीप हंगाम बुडाला असून रब्बीचीही आशा मावळली आहे.

ठळक मुद्देसिंचनाची सुविधा करण्याची मागणीभारनियमनाचे भूतही शेतकºयांच्या मानगुटीवर

लोकमत न्यूज नेटवर्कहरताळे, ता.मुक्ताईनगर : यंदाही परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने निराशा हाती आली आहे. खरीप बुडाला तरी रब्बीची आशा होती. परंतु, रब्बी पिकासाठी आवश्यक असणारा परतीचा पाऊस झाला नाही. त्यात हरताळे परिसरात सिंचनाचीही सोय उपलब्ध नसल्यामुळे आता खरिपाबरोबर रब्बीचीही आशा मावळली आहे.बहुतांश पिके पावसावर अवलंबून होते. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कापूस, ज्वारी, मका कडधान्य आदी पिकांची पेरणी केली होती. सुरवातीला पावसाने चांगली हजेरी दिली. पाऊस दमदार नसला तरी हलक्या सरी जोरात होत्या. परंतु सर्वच पिके फुलोरा येण्याच्या वेळीच खरिपाची हानी झाली. दमदार पावसाअभावी शेतकºयांना पिकास वाचविणे शक्य झाले नाही.खरीपाच्या पिकाचे नुकसान झाले असले तरी शेतकरी रब्बी पिकावर अवलंबून असतात. त्यासाठी परतीच्या पावसाची प्रतिक्षाच राहिली. सप्टेंबर, आॅक्टोबर संपुर्ण कोरडा गेला. विहिरी, नदी, नाले कोरडे राहिले. विहिरी बोअरवेलची पाणी पातळी वाढली नाही. त्यामुळे रब्बीच्या गहू, हरभरा, मका या प्रमुख पिकांच्या लागवडीसाठी मुहूर्त शेतकºयांना अद्याप गाठता आला नाहीं .किंबहूना पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता ही पिके घ्यावीत की नाही असा प्रश्न उपस्थित झाला. दुसरीकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने शेकडो हेक्टर शेती रब्बी हंगामापासून वंचितच आहे कारण जमिनीत ओलावा नाही. 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प