शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

खान्देशी खाद्य संस्कृती सातासमुद्रापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 17:48 IST

कुठलेली कार्य म्हटले म्हणजे जेवणावळ ही आलीच. आपल्याकडे एक पद्धती रूढू आहे ती म्हणजे कोणत्याही कार्यक्रम आला की पंगत ठरलेली. म्हणतात ना ‘मरण दारी की तोरण दारी’ पंगती या बसतातच. आणि या पंगतींना मेनू ठरलेला. हा मेनू विभागनिहाय बदलतो.

चंद्रशेखर जोशीकुठलेली कार्य म्हटले म्हणजे जेवणावळ ही आलीच. आपल्याकडे एक पद्धती रूढू आहे ती म्हणजे कोणत्याही कार्यक्रम आला की पंगत ठरलेली. म्हणतात ना ‘मरण दारी की तोरण दारी’ पंगती या बसतातच. आणि या पंगतींना मेनू ठरलेला. हा मेनू विभागनिहाय बदलतो. काही भागात वरण, पोळी वांग्याची भाजी असते, काही भागात बट्टी व घोटलेल्या वांग्याची भाजी असते विभागनिहाय खाद्य संस्कृती ही बदलते. मात्र बहुतांश भागात एक भाजी ठरलेली ती म्हणजे वांग्याची भाजी. खान्देशी वांगे हे राज्यात प्रसिद्ध आहेत. जळगाव जिल्ह्यातील व्यक्ती पुण्या-मुंबईकडे जायला निघाली की ज्यांच्याकडे जाणार त्या व्यक्तीचा एक निरोप हमखास असतो तो म्हणजे येतांना भरताची वांगी घेऊन आणि हिवाळा असला की मेहरूणची बोरेही ठरलेली. खान्देशी भरताची गोडी काही औरच असल्याचे सर्वत्र बोलले जाते. त्यामुळेच विविध संस्थांतर्फे आयोजित केली जाणारे संमेलने होतात त्यावेळी भरीत हा मेनू ठरलेला असतो. अगदी देशभरातून आलेल्या व्यक्ती भरतावर ताव मारतात. बोटे चोखीत या खाद्याची स्तुुती करतात. भरताचे हे खाद्य आता केवळ जळगाव जिल्ह्यापर्यंत मर्यादीत राहीले नाही तर त्याच्या चवेची चर्चा ही जगभरात पोहोचणार आहे. याला निमित्त ठरले ते शहरातील मराठी प्रतिष्ठान. खान्देशी वाग्यांचे भरीत जगप्रसिद्ध करण्यासाठी महाराष्ट्राच प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जळगावातील सागर पार्क मैदानावर २५०० किलो भरीत बनविण्याचा विश्वविक्रम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी सतत सहा तास परिश्रम करून तीन हजार किलो भरीत बनविण्याचा विक्रम केला आहे. या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक्स आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड व लिमका बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. ‘लार्जेस्ट मेकींग आॅफ एगप्लांट’ या नावाने या रेकॉर्डची नोंद दोन्ही संस्थांमध्ये होणार आहे. यासाठी मराठी प्रतिष्ठानचे प्रमुख विजय वाणी, अ‍ॅड. जमिल देशपांडे यांनी गेल्या काही काळात अविरत परिश्रम घेतले. या निमित्ताने जळगावच्या भरीताची चर्चा आता जागतिक पातळीवर झाली आहे. खान्देशातील खाद्य संस्कृतीच्या शिरोपेचात एक मानाचा तुरा यानिमित्ताने रोवला गेला आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, मराठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन जळगावकरांच्या सहकार्याने हा उपक्रम अतिशय यशस्वी करून दाखविला. हजारो जळगावकर या क्षणाचे साक्षीदार झाले व बहुतांश नागरिकांनी भरताची चव चाखत. तयार करण्याच्या पारंपरीक पद्धतीला दाद दिली.

 

टॅग्स :Jalgaonजळगावfoodअन्न