शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

खान्देशातील जिनिंग उद्योगाला ५० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 17:18 IST

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये खान्देशातील तिघा जिल्ह्यात दिडशेवर असलेल्या जिनिंंग उद्योग बंद असल्याने कोट्यवधींचा व्यवहार ठप्प झाला आहे.

ठळक मुद्देजिनिंग बंद पण सीसी व कर्जाचे व्याज सुरूचकर्मचाऱ्यांचा पगार देणे आवश्यकखान्देशात दीड लाख गठाण पडून, भाव घटलेखान्देशातील आठ हजार मजूर गेले गावी

शरदकुमार बन्सीधरणगाव, जि.जळगाव : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये खान्देशातील तिघा जिल्ह्यात दिडशेवर असलेल्या जिनिंंग उद्योग बंद असल्याने कोट्यवधींचा व्यवहार ठप्प झाला आहे. या लॉकडाऊन काळात जिनिंंग उद्योग बंद असला तरी सीसीवरील व्याज, कर्जावरील व्याज, कर्मचाऱ्यांंचे पगार तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गठाणच्या भावात झालेली घसरण यामुळे खान्देशातील जिनिंग उद्योगाला ५० कोटीचा फटका बसला आहे. कोरोनाने या सिजनमध्ये मोठा फटका दिल्याने उद्योजक चिंताग्रस्त झाले आहे.कापूस उत्पादन वाढले, पण कोरोनामुळे घातया वर्षी खान्देशात कापूस उत्पादन चांगले होते. त्यामुळे जिनींग उद्योगाची भरभराट होती. खान्देशातून दरवर्षी १८ ते २० लाखावर गाठ तयार होतात. या वर्षी २२ लाख गठाण तयार तयार होईल असा अंदाज होता. मात्र कोरोना लॉकडाऊन मुळे एक महिन्याची आवक कमी होऊन कमी माल खरेदी होणार असल्याने १५/१६ लाख गाठी तयार होतील, असा अंंदाज उद्योजकांनी व्यक्त केला आहे.भाव घटल्याने फटका, दीड लाख गाठी पडूनकोरोना महामारीमुळे कापसाच्या गाठींचे भाव घटले आहेत, ज्या देशात गाठींची निर्यात होते त्या चीन, इंडोनेशिया, बांगलादेश, व्हियतनाममध्ये कोरोनाने थैमान घातल्याने यावर्षी कापसाच्या गाठीचे भाव वाढण्याची शक्यता कमीच आहे. आजच्या घडीला खान्देशातील जिनिंंगांमध्ये अदमासे दीड लाख गाठी पडून असल्याचे उद्योजकांचा अंदाज आहे. भाव कमी झाल्याचा प्रत्येक जिनर्सला याचा फटका बसला आहे.जिनिंंग उद्योग बंद तरी खर्च सुरुचलॉकडाऊनमुळे जिनिंंग उद्योग बंद असले तरी नियमित कर्मचारी पगार, वीज बील, कर्जावरील व्याज, सीसीवरील व्याज आदी खर्च सुरुच असल्याने जिनिंंग उद्योजक चिंताग्रस्त आहेत.आठ हजार कामगार गावाकडेखान्देशातील जिनिंंग उद्योगात अदमासे आठ हजार आदिवासी, पावरा व इतर मजूर काम करीत असून लॉकडाऊनमुळे हे मजूर आपापल्या गावाकडे निघून गेले असल्याने लॉकडाऊन उघडल्यावर हे मजूर केव्हा परत जिनिंगमध्ये कामाला येतील, याचीही चिंता उद्योजकांना इ.कारण मजूर आल्याशिवाय जिनींग मध्ये काम आवरणे अशक्यच असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.कोरोना महामारीमुळे झालेले लॉकडाऊन हे आपण सर्वांचा जीव वाचविण्यासाठी महत्वाचे आहे. मात्र लॉकडाऊनमुळे इतर उद्योगाप्रमाणे जिनींग उद्योगाला फटका बसला आहे. खान्देशात कोट्यवधीचा व्यवहार ठप्प झाला आहे. तसेच वीज बील, इतर कर्मचारी पगार, कर्जाचे, सीसीचे व्याज तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गठाणच्या भावात झालेल्या घसरणीमुळे खान्देशातील जिनिंंग उद्योगाला सुमारे ५० कोटींचा फटका बसला आहे. शेतीपूरक असलेल्या या उद्योगाचे लॉकडाऊन काळातील वीज बील, कर्जाचे व सीसीचे बँकेचे व्याज माफ केल्यास उद्योजकांना हातभार लागेल.-जीवनसिंह बयस, जिनिंग चालक, धरणगाव

टॅग्स :cottonकापूसDharangaonधरणगाव