शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
4
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
5
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
6
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
7
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
8
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
9
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
10
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
11
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
12
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
13
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
14
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
15
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मंत्र्याचे नाव खडसे यांनी थेट मुख्यमंत्र्याना द्यावे : महसूलमंत्री चंद्रकात पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 20:52 IST

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर झालेल्या कारवाईमागे कोणत्या मंत्र्याचा हात आहे, याची माहिती यांनी थेट मुख्यमंत्र्यांना द्यावी, मात्र पत्रकारांना ही माहिती देणे भाजपाची संस्कृती नाही, असे मत राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देपत्रकारांना माहिती दिल्याबद्दल व्यक्त केले मतखडसे मोठे नेते, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार?मंत्रीमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्र्याचावाकडी प्रकरणाला नाहक दिला जातोय जातीय रंग

जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर झालेल्या कारवाईमागे कोणत्या मंत्र्याचा हात आहे, याची माहिती यांनी थेट मुख्यमंत्र्यांना द्यावी, मात्र पत्रकारांना ही माहिती देणे भाजपाची संस्कृती नाही, असे मत राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.अंजली दमानिया यांच्याकडून आपली बदनामी करणे व आपल्यावर कारवाई होणे यामागे भाजपाच्याच एका मंत्र्याचा हात असल्याचे विधान खडसे यांनी केले होते. त्याबाबत पालकमंत्री पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, खडसे हे मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी अधिक काय बोलणार? पण त्यांनी ‘त्या’ मंत्र्याचे नाव थेट मुख्यमंत्र्यांना सांगावे.मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे, मात्र त्यांचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. आज मुख्यमंत्री विदेशातून परत येतील त्यानंतर दोन दिवसांनी याबाबतचा निर्णय ते जाहीर करतील.सध्या कृषीविभाग आपल्याकडेमी प्रभारी मुख्यमंत्री नसून मंत्रीगटाच्या समितीचा सदस्य आहे. मुख्यमंत्री जास्त दिवस परदेश दौऱ्यावर गेल्याने तातडीने निर्णय घेण्यासाठी कोणावर तरी जबाबदारी सोपवितात. त्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व मी अशा तीन जणांच्या मंत्रीगटाची समिती नियुक्त केली आहे. परंतु, आता सध्या कृषी विभागाचा पूर्ण कारभार आपल्याकडेच असून नवीन मंत्री नियुक्त होईपर्यंत हा कारभार आपल्याकडेच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.वाकडी प्रकरणाला नाहक दिला जातोय जातीय रंगवाकडी येथील विहिरीत पोहताना मुलांना मारहाण करण्यात येवून त्यांची धिंड काढण्यात आली याप्रकरणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या प्रकरणाला नाहक जातीयतेचा रंग दिला जात आहे. प्रत्येक घटनेकडे एकाच दृष्टीकोणातून पाहणे बरोबर नाही. काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहूल गांंधी यांनीही या प्रकरणाचे राजकारण सुरु केले आहे. जे झाले ते अत्यंत चुकीचे आहे. अपूर्ण माहितीच्या आधारे जातीयवाद निर्माण केला जात आहे. ते कृत्य विकृत असून दोषींना शिक्षा झालीच पाहिजे यात दुमत नाही. तसेच पोलीसही त्यांचे काम करीत आहे. योग्य कारवाई सुरु आहे. त्या गावात विनाकरण गर्दी करुन त्या गावाचे नाव खराब करणे योग्य नाही, असेही पालकमंत्री म्हणाले.

टॅग्स :JalgaonजळगावEknath Khadaseएकनाथ खडसे