शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

‘टायगर अभी जिंदा है...’ म्हणत खडसेंचे फडणविसांवर टीकेचे बाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 18:17 IST

कोरोना संकट काळ दूर झाल्यावर राज्यभरात दौरा करून घडामोडी घडविणार असल्याचा इशारा देत ‘टायगर अभी जिंदा है’ असे सूचक वक्तव्य एकनाथराव खडसे यांनी केले.

ठळक मुद्दे‘मी पुन्हा येणार...’ हे जनतेला आवडलं की नाही, याचा शोध घेणारअहंकार पक्षातही अनेकांना रुचला नाहीआघाडी सरकार सध्या तरी भक्कमभाजपमध्येही आलबेल नसल्याचा सूचक इशाराआता पुस्तक प्रकाशन समारंभ १० रोजी होणार

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : ‘नानासाहेब फडणविसांचे बारभाई कारस्थान’ हे पुस्तक लवकरच येणार असल्याचे सांगून दोन दिवसाअगोदर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यावर शरसंधान साधणारे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी आपल्या वाढदिवसानिमित्ताने ‘मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल’ हे महाराष्ट्रातील जनतेला आवडले की नाही याचा शोध घेणार असल्याचे सांगत फडणविसांवर पुन्हा टीकेचा बाण सोडला आहे.पक्ष व पक्षाबाहेरील कार्यकर्त्यांमध्ये माझ्यावर झालेल्या अन्यायाचा संताप आहे. दर वेळेस ते संताप व्यक्त करतात आणि मी त्यांना शांत करतो. आता त्याचा कधी स्फोट होईल सांगता येणार नाही, असे सांगून कोरोना संकट काळ दूर झाल्यावर राज्यभरात दौरा करून घडामोडी घडविणार असल्याचा इशारा देत ‘टायगर अभी जिंदा है’ असे सूचक वक्तव्य एकनाथराव खडसे यांनी केले.एकनाथराव खडसे यांचा बुधवारी ६८व्या वाढदिवसानिमित्त ‘जनसेवेचा मानबिंदू : एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचे प्रकाशन होते. परंतु माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे पुस्तक प्रकाशन १० सप्टेंबर रोजी होणार आहे, तर खडसेंनी सांगितल्यानुसार पुणे येथील लेखकाचे ‘नाना फसाहेब फडणविसांचे बारभाई कारस्थान’ हे पुस्तक लवकरच येणार असल्याचे सांगून दोन्ही पुस्तकाबाबत त्यांनी उत्सुकता वाढविली.भेटीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांसोबत अनौपचारिक चर्चेत बोलताना खडसे म्हणाले, पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. पक्ष वाढविण्यासाठी आम्ही खस्ता खाल्ल्या. जीवाचे रान केले आणि आता उलटेच झाले. ज्यांना घडविले ते नेते काय झाले आणि आम्हाला आता अक्कल शिकवताय? प्रमोद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, नितीन गडकरी, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार आणि मी अशा आम्ही सर्व नेत्यांनी राज्य पिंजून काढत पक्षाची उभारणी केली, नव्हे तर प्रतिकूल परिस्थितीत सत्ताही आणली होती. अगदी २०१४ मध्ये युती नसतानाही एक हाती सत्ता राज्यात आणली होती. यंदा अनुकूल वातावरण होते. केंद्रात आपलं सरकार होतं, राज्यातही होतं, तरी पक्षाला सत्ता गमवावी लागली. ‘मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार...’ हे राज्यातील जनतेला आवडलं की नाही. याचा आता मी शोध घेणार आहे. तर हा अहंकार पक्षातही अनेकांना रुचला नाहीये, असे बोलत पक्षातही आलबेल नसल्याचा सूचक इशारा त्यांनी केला.राज्यात आमदार फोडून सत्ता शक्य नाही तर आघाडी सरकार सध्या तरी भक्कम आहे, असेही त्यांनी सांगितले.आज दिवसभर मोठ्या संख्येने जिल्ह्यासह विदर्भातील कार्यकर्ते एकनाथराव खडसे यांना शुभेच्छा देण्यास त्यांच्या फार्म हाऊसवर गर्दी केली होती, तर राज्यातील काही प्रमुख नेत्यांनी फोन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. काही कार्यकर्त्यांनी शांतीपाठ व महामृत्युंजय जपही केले.

टॅग्स :PoliticsराजकारणMuktainagarमुक्ताईनगर