शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

हवा डोक्यात जावू न देता राजकारणात भान ठेवा - रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 22:03 IST

‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स आॅफ खान्देश’चे प्रकाशन

जळगाव : राजकारणाचे मर्म जो ओळखतो तोच यात यशस्वी होतो आणि हे मर्म आम्ही ओळखल्याने सध्या आमची हवा आहे. त्यातूनच भाजपमध्ये मेगा भरती सुरू आहे. मात्र यशाची हवा डोक्यात गेली आणि जमिनीवरच्या माणसाची साथ सोडली तर राजकारणी कोठे जाऊन पडतील, हे सांगता येत नाही, असे परखड मत केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जळगावात व्यक्त केले. राजकारणात यशस्वी होण्यासाठी भान ठेवूनच राजकारण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स आॅफ खान्देश’ या कॉफी टेबल बुकचा प्रकाशन सोहळा मंगळवारी जळगावातील हॉटेल कमल पॅराडाईज येथे रंगला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीने स्वत:चे विशेष स्थान निर्माण केलेल्या खान्देशातील कर्तृत्ववान नेत्यांचा सन्मान करण्यात आला.व्यासपीठावर दानवे यांच्यासह पर्यटनमंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री अमरिशभाई पटेल, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, जळगावच्या महापौर सीमा भोळे, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील उपस्थित होते.‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वालनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, जाहिरात विभागाचे उप महाव्यवस्थापक (दक्षिण महाराष्टÑ व गोवा) अलोक श्रीवास्तव, जळगाव आवृत्तीचे सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले.राजकारणात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाहीराजकारणात यशस्वी होण्यासाठी रंग, उंची, शिक्षणाची आवश्यकता नाही तर समाजात दररोज आपला योग्य चेहरा बनविणे गरजेचे आहे. हा योग्य चेहरा आपल्या रोजच्या चांगल्या वागण्यातूनच निर्माण होतो. यासाठी खडतर मार्गक्रमण करावे लागते आणि जो हुशार असतो तो हे मार्गक्रमण सतत सुरुच ठेवतो व तोच राजकारणात यशस्वी होतो, असेही रावसाहेब दानवे यांनी सांगितले. राजकारणात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसल्याचे सांगत त्यांनी भाजपच्या यशामध्ये सर्वांचे कष्ट असल्याचे सांगितले.आपल्या २० मिनिटांच्या भाषणात दानवे यांनी नेहमीच्या शैलीत चौफेर फटकेबाजी करीत हास्याचे कारंजे उडवित टाळ्या मिळविल्या. अरुणभाई गुजराथी म्हणाले, उद्योगात जशी तेजी- मंदी असते तशीच राजकारणातही असते. मात्र सध्याची तेजी- मंदी आहे, ती आपण आधी कधीच पाहिली नाही. राजकारणात पद नव्हे तर पत महत्वाची असल्याचे ते म्हणाले. अतिशय देखणा कार्यक्रम पाहून त्यांनी ‘लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला’ या गाण्याच्या ओळीही ऐकविल्या. त्यावेळी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. चित्रपटांनी राजकीय मंडळींची चुकीची प्रतिमा निर्माण केल्याची टीका पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनी केली.

 

 

टॅग्स :LokmatलोकमतJalgaonजळगाव