शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

हवा डोक्यात जावू न देता राजकारणात भान ठेवा - रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 22:03 IST

‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स आॅफ खान्देश’चे प्रकाशन

जळगाव : राजकारणाचे मर्म जो ओळखतो तोच यात यशस्वी होतो आणि हे मर्म आम्ही ओळखल्याने सध्या आमची हवा आहे. त्यातूनच भाजपमध्ये मेगा भरती सुरू आहे. मात्र यशाची हवा डोक्यात गेली आणि जमिनीवरच्या माणसाची साथ सोडली तर राजकारणी कोठे जाऊन पडतील, हे सांगता येत नाही, असे परखड मत केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जळगावात व्यक्त केले. राजकारणात यशस्वी होण्यासाठी भान ठेवूनच राजकारण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स आॅफ खान्देश’ या कॉफी टेबल बुकचा प्रकाशन सोहळा मंगळवारी जळगावातील हॉटेल कमल पॅराडाईज येथे रंगला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीने स्वत:चे विशेष स्थान निर्माण केलेल्या खान्देशातील कर्तृत्ववान नेत्यांचा सन्मान करण्यात आला.व्यासपीठावर दानवे यांच्यासह पर्यटनमंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री अमरिशभाई पटेल, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, जळगावच्या महापौर सीमा भोळे, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील उपस्थित होते.‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वालनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, जाहिरात विभागाचे उप महाव्यवस्थापक (दक्षिण महाराष्टÑ व गोवा) अलोक श्रीवास्तव, जळगाव आवृत्तीचे सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले.राजकारणात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाहीराजकारणात यशस्वी होण्यासाठी रंग, उंची, शिक्षणाची आवश्यकता नाही तर समाजात दररोज आपला योग्य चेहरा बनविणे गरजेचे आहे. हा योग्य चेहरा आपल्या रोजच्या चांगल्या वागण्यातूनच निर्माण होतो. यासाठी खडतर मार्गक्रमण करावे लागते आणि जो हुशार असतो तो हे मार्गक्रमण सतत सुरुच ठेवतो व तोच राजकारणात यशस्वी होतो, असेही रावसाहेब दानवे यांनी सांगितले. राजकारणात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसल्याचे सांगत त्यांनी भाजपच्या यशामध्ये सर्वांचे कष्ट असल्याचे सांगितले.आपल्या २० मिनिटांच्या भाषणात दानवे यांनी नेहमीच्या शैलीत चौफेर फटकेबाजी करीत हास्याचे कारंजे उडवित टाळ्या मिळविल्या. अरुणभाई गुजराथी म्हणाले, उद्योगात जशी तेजी- मंदी असते तशीच राजकारणातही असते. मात्र सध्याची तेजी- मंदी आहे, ती आपण आधी कधीच पाहिली नाही. राजकारणात पद नव्हे तर पत महत्वाची असल्याचे ते म्हणाले. अतिशय देखणा कार्यक्रम पाहून त्यांनी ‘लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला’ या गाण्याच्या ओळीही ऐकविल्या. त्यावेळी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. चित्रपटांनी राजकीय मंडळींची चुकीची प्रतिमा निर्माण केल्याची टीका पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनी केली.

 

 

टॅग्स :LokmatलोकमतJalgaonजळगाव