शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कस्तुरबा आणि शेळीचे दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 13:14 IST

मार्च १९१८ साल. साबरमती येथे गांधीजी खूप आजारी होते. कस्तुरबा त्यांची काळजी वहात होती. तिचा चेहरा गरीब गाईसारखा दिसत होता. तिच्यातल्या हळुवारपणामुळे गांधीजी भारावून गेले. यामुळे त्यांना तमाम बाबतीत दिलासा मिळत होता. सैनिक भरतीचे काम सुरू होते. या काळात त्यांचा आहार साधा होता. एकदा बरे वाटत नव्हते. दुसरा दिवस सणाचा ...

मार्च १९१८ साल. साबरमती येथे गांधीजी खूप आजारी होते. कस्तुरबा त्यांची काळजी वहात होती. तिचा चेहरा गरीब गाईसारखा दिसत होता. तिच्यातल्या हळुवारपणामुळे गांधीजी भारावून गेले. यामुळे त्यांना तमाम बाबतीत दिलासा मिळत होता. सैनिक भरतीचे काम सुरू होते. या काळात त्यांचा आहार साधा होता. एकदा बरे वाटत नव्हते. दुसरा दिवस सणाचा होता. गांधीजींनी सांगून ठेवले होते की ते जेवणार नाहीत. कस्तुरबाने आग्रह धरलाअसे कसे? एवढा सणाचा दिवस आणि उपवास कसा बरे करता येईल? आज तर गोरगरिबांच्या घरीही आनंद असतो. काही तरी खायला हवे. तुमच्या आवडीची लापशी केली आहे. थोडी मुगाची उसळ घ्या. थोडे खा.’कस्तुरबाच्या आग्रहामुळे गांधीजी जेवायला बसले. अन्नाला अन्नपूर्णेच्या हातची चव होती. ते पोटभर जेवले. कस्तुरबाच्या हातची लापशी. मुगाच्या उसळीला खमंग फोडणी होती. गांधीजींना गाजरे आवडायची. जेवण आटोपले. तास लोटला नाही तोच गांधीजींना त्रास सुरू झाला. तिने विश्रांतीचा आग्रह केला. गांधीजी काही मानले नाहीत. त्यांना कामांचा डोंगर उपसायचा होता. रात्री नडियादला जायचे होते. साबरमती स्टेशनवर ते पायी चालत निघाले. ते सव्वा मैलांचे अंतर होते. त्यांचे दुखणे वाढत चालले होते. अखेर आश्रमात परतावे लागले. पाण्याचे प्रयोग सुरू झाले. कस्तुरबा तर दमून गेली. आजार थांबायचे काही नाव घेईना. दूध घेणे फार गरजेचे होते. गांधीजींचा तर ठाम नकार होता. डॉक्टर दलाल विचारत होते-‘तुम्ही दुधाचे सेवन का बरे करत नाही?’‘गाई-म्हशींवर फुंकरीची प्रक्रिया होते. यामुळे मला दूध नकोय. तो माणसाचा आहार होऊ शकत नाही. मी दुधाचा त्याग केला आहे.’गांधीजींचे हे उत्तर कस्तुरबाला माहीत होते. येथवर तर ते पाठही झाले होते. ती गांधीजींच्या खाटेशेजारीच तर उभी होती. ती म्हणाली,‘हे तुमचे ठरले आहे, हे खरे आहे. अगदी असेच ठरवले असेल तर शेळीचे दूध घेता येईल.’डॉक्टरांनी हे ऐकले. ते खूप खूश झाले. आनंदून म्हणाले,‘मग तर माझे काम झाले. शेळीचे दूध घेतले तरी चालेल.’ गांधीजी हसले. हसत म्हणाले,‘कस्तुर आहेच आमची डॉक्टरीण.’गांधीजी खूश झाले. कस्तुरबा लाजली. डॉक्टर हसले. आनंदाच्या लहरी उसळल्या. (क्रमश:)- प्रा.विश्वास पाटील

टॅग्स :Jalgaonजळगाव