शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

कस्तुरबा आणि शेळीचे दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 13:14 IST

मार्च १९१८ साल. साबरमती येथे गांधीजी खूप आजारी होते. कस्तुरबा त्यांची काळजी वहात होती. तिचा चेहरा गरीब गाईसारखा दिसत होता. तिच्यातल्या हळुवारपणामुळे गांधीजी भारावून गेले. यामुळे त्यांना तमाम बाबतीत दिलासा मिळत होता. सैनिक भरतीचे काम सुरू होते. या काळात त्यांचा आहार साधा होता. एकदा बरे वाटत नव्हते. दुसरा दिवस सणाचा ...

मार्च १९१८ साल. साबरमती येथे गांधीजी खूप आजारी होते. कस्तुरबा त्यांची काळजी वहात होती. तिचा चेहरा गरीब गाईसारखा दिसत होता. तिच्यातल्या हळुवारपणामुळे गांधीजी भारावून गेले. यामुळे त्यांना तमाम बाबतीत दिलासा मिळत होता. सैनिक भरतीचे काम सुरू होते. या काळात त्यांचा आहार साधा होता. एकदा बरे वाटत नव्हते. दुसरा दिवस सणाचा होता. गांधीजींनी सांगून ठेवले होते की ते जेवणार नाहीत. कस्तुरबाने आग्रह धरलाअसे कसे? एवढा सणाचा दिवस आणि उपवास कसा बरे करता येईल? आज तर गोरगरिबांच्या घरीही आनंद असतो. काही तरी खायला हवे. तुमच्या आवडीची लापशी केली आहे. थोडी मुगाची उसळ घ्या. थोडे खा.’कस्तुरबाच्या आग्रहामुळे गांधीजी जेवायला बसले. अन्नाला अन्नपूर्णेच्या हातची चव होती. ते पोटभर जेवले. कस्तुरबाच्या हातची लापशी. मुगाच्या उसळीला खमंग फोडणी होती. गांधीजींना गाजरे आवडायची. जेवण आटोपले. तास लोटला नाही तोच गांधीजींना त्रास सुरू झाला. तिने विश्रांतीचा आग्रह केला. गांधीजी काही मानले नाहीत. त्यांना कामांचा डोंगर उपसायचा होता. रात्री नडियादला जायचे होते. साबरमती स्टेशनवर ते पायी चालत निघाले. ते सव्वा मैलांचे अंतर होते. त्यांचे दुखणे वाढत चालले होते. अखेर आश्रमात परतावे लागले. पाण्याचे प्रयोग सुरू झाले. कस्तुरबा तर दमून गेली. आजार थांबायचे काही नाव घेईना. दूध घेणे फार गरजेचे होते. गांधीजींचा तर ठाम नकार होता. डॉक्टर दलाल विचारत होते-‘तुम्ही दुधाचे सेवन का बरे करत नाही?’‘गाई-म्हशींवर फुंकरीची प्रक्रिया होते. यामुळे मला दूध नकोय. तो माणसाचा आहार होऊ शकत नाही. मी दुधाचा त्याग केला आहे.’गांधीजींचे हे उत्तर कस्तुरबाला माहीत होते. येथवर तर ते पाठही झाले होते. ती गांधीजींच्या खाटेशेजारीच तर उभी होती. ती म्हणाली,‘हे तुमचे ठरले आहे, हे खरे आहे. अगदी असेच ठरवले असेल तर शेळीचे दूध घेता येईल.’डॉक्टरांनी हे ऐकले. ते खूप खूश झाले. आनंदून म्हणाले,‘मग तर माझे काम झाले. शेळीचे दूध घेतले तरी चालेल.’ गांधीजी हसले. हसत म्हणाले,‘कस्तुर आहेच आमची डॉक्टरीण.’गांधीजी खूश झाले. कस्तुरबा लाजली. डॉक्टर हसले. आनंदाच्या लहरी उसळल्या. (क्रमश:)- प्रा.विश्वास पाटील

टॅग्स :Jalgaonजळगाव