शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

करपलं रान देवा, जळलं शिवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:23 IST

अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सलग तीन वर्षांपासून पावसाच्या बदललेल्या प्रक्रियेमुळे जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून खरीप ...

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सलग तीन वर्षांपासून पावसाच्या बदललेल्या प्रक्रियेमुळे जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून खरीप हंगाम नावालाच राहिला आहे. यंदाही तब्बल पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतशिवारातील सर्वच पिकं करपली आहेत. यंदाच्या खरीप हंगामातील एकूण उत्पादनाच्या केवळ ५० टक्केच हंगाम होण्याची शक्यता आहे.

जून महिन्यात पेरण्या करूनदेखील पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी कराव्या लागल्या; मात्र दुबार पेरणी करूनदेखील पुन्हा पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे आता उभ्या शेतातील सर्व पीक जळून खाक होत आहे. सोयाबीन, उडीद, मूग व मक्याच्या पिकांचे पूर्ण नुकसान झाले असून, जेमतेम उत्पादन होण्याचीच शक्यता आहे.

१ लाख हेक्टरवरील कापसालाही फटका

जिल्ह्यात सुमारे ४ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे; मात्र त्यापैकी १ लाख हेक्टर क्षेत्रावरील कापूस वाया जाण्याची शक्यता आहे. एकीकडे बागायती कापसाला कैऱ्या उगविण्यास सुरुवात होत असताना, अनेक तालुक्यांमधील कोरडवाहू क्षेत्रावरील कापसाची वाढ पूर्ण खुंटली आहे. जळगाव, चोपडा, अमळनेर, धरणगाव तालुक्यात सर्वाधिक फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांना हा कापूस उपटून फेकून देण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. अनेक शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्ण वाया जाण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

केळीच्या निसण्याचा प्रक्रियेवरही परिणाम

पावसाअभावी केळीच्या बागांनादेखील फटका बसला आहे. केळीला बागायतदार शेतकऱ्यांकडून जरी ठिबकद्वारे पाणी दिले जात असले तरी घड निसण्याचा प्रक्रियेसाठी पावसाचे पाणी आवश्यक असते; मात्र पावसानेच पाठ फिरविल्यामुळे केळीच्या उत्पादनावरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

इतक्या क्षेत्रावरील पिकांचे होऊ शकते नुकसान

पीक - पेरणी क्षेत्र - नुकसान होण्याची शक्यता (अंदाजे)

कापूस - ४ लाख ९० हजार हेक्टर - १ लाख

सोयाबीन - २५ हजार हेक्टर - १० हजार

उडीद - २६ हजार - १४ हजार

मूग - २२ हजार हेक्टर - १० हजार

सलग तीन वर्षांपासून सोयाबीनला फटका

पेरण्यांच्या वेळेस अनेक भागात सोयाबीनचे पीक उतरलेच नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीला पेरण्या केल्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली. २०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. २०२० मध्येही परतीच्या पावसात सोयाबीनचे नुकसान झाले, तर यावर्षीही पावसाअभावी शेतातच सोयाबीनचे नुकसान होत आहे.

दुष्काळ जाहीर करा

पावसाअभावी जिल्ह्यातील सुमारे २ लाख हेक्टरवरील क्षेत्र धोक्यात आल्याने शेतकऱ्यांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. आसोदा येथील शेतकरी किशोर चौधरी, भादली येथील मिलिंद चौधरी, आव्हाणे येथील ॲड. हर्षल चौधरी यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांचे पथक शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे.