शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

करपलं रान देवा, जळलं शिवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:23 IST

अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सलग तीन वर्षांपासून पावसाच्या बदललेल्या प्रक्रियेमुळे जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून खरीप ...

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सलग तीन वर्षांपासून पावसाच्या बदललेल्या प्रक्रियेमुळे जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून खरीप हंगाम नावालाच राहिला आहे. यंदाही तब्बल पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतशिवारातील सर्वच पिकं करपली आहेत. यंदाच्या खरीप हंगामातील एकूण उत्पादनाच्या केवळ ५० टक्केच हंगाम होण्याची शक्यता आहे.

जून महिन्यात पेरण्या करूनदेखील पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी कराव्या लागल्या; मात्र दुबार पेरणी करूनदेखील पुन्हा पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे आता उभ्या शेतातील सर्व पीक जळून खाक होत आहे. सोयाबीन, उडीद, मूग व मक्याच्या पिकांचे पूर्ण नुकसान झाले असून, जेमतेम उत्पादन होण्याचीच शक्यता आहे.

१ लाख हेक्टरवरील कापसालाही फटका

जिल्ह्यात सुमारे ४ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे; मात्र त्यापैकी १ लाख हेक्टर क्षेत्रावरील कापूस वाया जाण्याची शक्यता आहे. एकीकडे बागायती कापसाला कैऱ्या उगविण्यास सुरुवात होत असताना, अनेक तालुक्यांमधील कोरडवाहू क्षेत्रावरील कापसाची वाढ पूर्ण खुंटली आहे. जळगाव, चोपडा, अमळनेर, धरणगाव तालुक्यात सर्वाधिक फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांना हा कापूस उपटून फेकून देण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. अनेक शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्ण वाया जाण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

केळीच्या निसण्याचा प्रक्रियेवरही परिणाम

पावसाअभावी केळीच्या बागांनादेखील फटका बसला आहे. केळीला बागायतदार शेतकऱ्यांकडून जरी ठिबकद्वारे पाणी दिले जात असले तरी घड निसण्याचा प्रक्रियेसाठी पावसाचे पाणी आवश्यक असते; मात्र पावसानेच पाठ फिरविल्यामुळे केळीच्या उत्पादनावरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

इतक्या क्षेत्रावरील पिकांचे होऊ शकते नुकसान

पीक - पेरणी क्षेत्र - नुकसान होण्याची शक्यता (अंदाजे)

कापूस - ४ लाख ९० हजार हेक्टर - १ लाख

सोयाबीन - २५ हजार हेक्टर - १० हजार

उडीद - २६ हजार - १४ हजार

मूग - २२ हजार हेक्टर - १० हजार

सलग तीन वर्षांपासून सोयाबीनला फटका

पेरण्यांच्या वेळेस अनेक भागात सोयाबीनचे पीक उतरलेच नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीला पेरण्या केल्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली. २०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. २०२० मध्येही परतीच्या पावसात सोयाबीनचे नुकसान झाले, तर यावर्षीही पावसाअभावी शेतातच सोयाबीनचे नुकसान होत आहे.

दुष्काळ जाहीर करा

पावसाअभावी जिल्ह्यातील सुमारे २ लाख हेक्टरवरील क्षेत्र धोक्यात आल्याने शेतकऱ्यांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. आसोदा येथील शेतकरी किशोर चौधरी, भादली येथील मिलिंद चौधरी, आव्हाणे येथील ॲड. हर्षल चौधरी यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांचे पथक शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे.