शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

करगाव बोगद्याची स्थिती ‘जैसे थे'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : शहरातील करगाव रस्त्याला लागणाऱ्या दोन बोगद्यांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून राहण्याची परिस्थिती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : शहरातील करगाव रस्त्याला लागणाऱ्या दोन बोगद्यांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून राहण्याची परिस्थिती ‘जैसे थे’ कायम आहे. गेल्या काही वर्षांपासून या समस्येकडे अनेक नागरिकांनी तक्रारी देऊनसुध्दा या समस्येवर तोडगा आतापर्यंत निघालेला नाही. शहराच्या दोन्ही भागांना जोडणाऱ्या धुळे पुलाव्यतिरिक्त पर्यायी मार्ग नाही. यामुळे या बोगद्यांमध्ये पाणी साचले की, शहरवासीयांची मोठी अडचण निर्माण होते.

या परिसरात अनेक घरांचा विस्तार वाढला आहे. मंगल कार्यालय, कॉलेज, शाळा, क्लासेस यामुळे नागरिकांची, विद्यार्थ्यांची कायम जा-ये सुरू असते.

शहराच्या दोन्ही भागांना जोडणाऱ्या धुळे पुलाव्यतिरिक्त पर्यायी मार्ग नाही. याची भविष्यात मोठी अडचण निर्माण होऊ शकते. या समस्येसाठी लोकप्रतिनिधींनी पोकळ आश्वासने दिली आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अण्णा विसपुते यांनी वेळोवेळी आंदोलने केली होती. मात्र तरीसुद्धा प्रशासनाला जाग आलेली नाही. झोपलेल्या प्रशासनासाठी पुढे या परिसरातील नागरिक मोठे आंदोलन उभारणार आहे, असे परिसरातील नागरिकांनी घेतलेल्या बैठकीत निश्चित केले.

बजेटमध्ये तरतूद केली होती. मात्र कोरोना काळाची परिस्थिती असल्याने सरकारने निधी दिलेला नाही. माझी आमदारांना विनंती आहे, त्यांनी याचा पाठपुरावा करावा व राज्य शासनाने याची दखल घ्यावी.

-खासदार उन्मेष पाटील

सात वर्षापासून वेळोवेळी आम्ही आंदोलन केली. निवेदने दिली. त्यावेळी असलेले आमदार उन्मेश पाटील यांच्याकडे व्यथा मांडली. त्यांनी आश्वासनदेखील दिले होते. मात्र अद्यापदेखील काम झालेले नाही.

-अण्णा विसपुते, तालुकाप्रमुख, मनसे, चाळीसगाव

पावसाळ्यात बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असते. त्यामुळे रेल्वे रुळावरून ये-जा करावी लागते. यामध्ये कुणाचा जीवदेखील जाऊ शकतो. तर याला कोण जबाबदार असेल?

-वाल्मीक पाटील, रहिवासी, चाळीसगाव