शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

भुसावळ तालुक्यातील कंडारीला तीन वर्षात मिळाले १८ ग्रामसेवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:21 IST

कंडारी ता. भुसावळ येथील ग्रामपंचायतीचा अजब कारभार समोर आला असून अवघ्या तीन वर्षात येथे १८ ग्रामसेवक बदलून गेल्याची बाब समोर आली असून यामुळे गावाचा विकास ठप्प झाल्याचा आरोप केला जात आहे.

ठळक मुद्दे१४ व्या वित्त आयोगाचा निधी अद्याप पडूनकायमस्वरुपी ग्रामसेवक मिळावा यासाठी २५ आॅगस्ट २०१६ रोजी ग्रामस्थांनी मोर्चा होता काढला पाणी टंचाईचे संकट कायम

लोकमत न्यूज नेटवर्कभुसावळ, दि.१८ : गावाच्या विकासासाठी एका ग्रा.पं.मध्ये किमान तीन वर्षासाठी ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात येते. शहराला लागून असलेल्या कंडारी येथील प्रकार मात्र नेमका उलट्या दिशेने होत असल्याचे दिसून येत आहे. या ग्रा.पं.तीला कायमस्वरुपी ग्रामसेवक मिळत नसल्यामुळे तीन वर्षात तब्बल १८ ग्रामसेवकांनी कारभार सांभाळल्याची ऐतिहासिक नोंद पंचायत समितीच्या दप्तरी करण्यात आली आहे.जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही एवढे ग्रामसेवक बदलविण्याची हे एकमेव दूर्मीळ उदाहरण असलेल्या ग्रा.पं.तीमध्ये दोन महिन्यात प्रभारी पदभार सांभाळणारा ग्रामसेवक गावाचा विकास साधणार तरी कसा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.दरम्यान, कायमस्वरुपी ग्रामसेवक मिळावा यासाठी २५ आॅगस्ट २०१६ रोजी ग्रामस्थांनी मोर्चा काढला होता. तरीही जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे अनेक योजनांचे बारा वाजले आहे तर नागरिकांना कायमच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे.२०१५ ला आठ तर २०१६ ला मिळाले सात ग्रामसेवककंडारी या गावाची लोकसंख्या सुमारे १५ हजार आहे. येथे २०१५ पासून कायमस्वरुपी ग्रामसेवक नसल्यामुळे गावाच्या विकासालाच खिळ बसली आहे. २०१५ साली येथे व्ही.आर.लढे, एस.एन.नारखेडे, एल.एस.नहाले, ए.डी.खैरनार, बी.के.पारधी, बी.आर. बारेला, डी.सी.इंगळे व पी.आर.तायडे या आठ ग्रामसेवकांनी प्रभारी पदभार सांभाळला. तर २०१६ साली डी.सी. इंगळे, आर.यु.काठोके, एल.एस. नहाले, आर.ए.चौधरी व डी.आर. बारेला या सात ग्रामसेवकांनी कामकाज पाहिले. तर २०१७ साली ए.डी.खैरनार, एस.एन.नारखेडे या दोन ग्रामसेवकांनी कामकाज पाहिले. २०१८ सालात गेल्या तीन महिन्यापासून पी.टी.झोपे हे कामकाज पाहत आहे. त्यांच्याकडे कुºहे (पानाचे) ग्रामपंचायतीची जबाबदारी असल्यामुळे येथील पदभार काढून घ्यावा, अशी विनंती पत्र त्यांनी गटविकास अधिकारी एस.बी.मावळे यांना दिले आहे.जि.प.प्रशासनाकडून दुर्लक्षगेल्या तीन वर्षात पं.स.कडून जिल्हा परिषदेला कंडारी येथे ग्रामसेवक मिळावा म्हणून प्रस्ताव पाठवला जातो. जि.प.ने मात्र दरवर्षी होणाऱ्या बदली प्रक्रियेमध्ये एकदाही या संदर्भात विचार केला नसल्याचे दिसून येते. दरम्यान, गट विकास अधिकारी मावळे यांच्याशी संपर्क साधला असता २५ मे रोजी येथे कायमस्वरुपी म्हणून बारेला यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहे. महिना उलटला तरीही ते हजर झाले नाही. त्यामुळे ते किती काळ काम करणार हा संशोधनाचा विषय आहे.१४ व्या वित्त आयोगाचा निधी अद्याप पडूनयेथे १४ व्या वित्त आयोगातून एक कोटी आठ लाख रुपये मंजूर आहे. या निधीतून अद्याप केवळ प्रशिक्षण व कचरा कुंडी एवढेच काम झाले आहे तर काही कामांसाठी ग्रामपंचायतीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मागासवर्गीय वस्तीतील पाईप लाईनच्या ई-टेंडरचा प्रश्न प्रलंबित आहे.पाणी टंचाईचे संकट कायमकंडारी हे गाव तापी नदीच्या काठावर आहे. मात्र येथे आतापर्यंत अनेक योजना राबवूनही कायम पाणी टंचाई असल्याच्या तक्रारी आहे. कायमस्वरुपी ग्रामसेवक नसल्यामुळे योजनांचा बोजवारा उडाला आहे.