शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

अमळनेरात बोरी नदीचे पात्र होतेय कचरामय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 19:05 IST

शहर स्वछता अभियानांंतर्गत तीन तारांकित दर्जा मिळवलेल्या पालिकेच्या कार्यक्षेत्रातच बोरी नदीमध्ये कचरा टाकला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.

ठळक मुद्देप्रदूषण ठरतेय तापदायकअमळनेर पालिकेच्या कार्यक्षेत्रातील प्रकारठेकेदाराकडून नियमांचे उल्लंघनपरिसरातील नागरिक संतप्त

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : शहर स्वछता अभियानांंतर्गत तीन तारांकित दर्जा मिळवलेल्या पालिकेच्या कार्यक्षेत्रातच बोरी नदीमध्ये कचरा टाकला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.देशभरात नदी शुद्धीकरण, स्वछता अभियान राबविले जात असताना अमळनेर नगरपरिषदेकडून मात्र मोठ्या प्रमाणात प्रदूषण केले जात आहे. गांधलीपुरा पुलाजवळ बोरी नदीपात्रात शहरातील कचरा टाकण्यात येत आहे. कच-यातील प्लॅस्टिक नदीपात्रात सर्वत्र पसरून त्याचा सिंचनावर परिणाम होत आहे. वाहते पाणी दूषित होऊन त्याचा नदीकाठावरील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.अमळनेर पालिकेने घनकचरा गोळा करण्याचा ठेका दिला आहे. मात्र, ठेकेदार नियमावलीचे पालन करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ठेकेदाराने शहरातून गोळा केलेला कचरा डेपोत टाकून त्याच्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. मात्र, ठेकेदाराकडूनच नदीपात्रात कचरा टाकून शहराचे आरोग्य धोक्यात आणले जात असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. संबंधित ठेकेदारावर अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.आरोग्य विभाग व ठेकेदाराला नदीपात्रातील कचरा ताबडतोब उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच संबंधित ठेकेदाराला नोटीस देण्याचे आरोग्य विभागाला निर्देशित केले आहे.-शोभा बाविस्कर, मुख्याधिकारी, नगरपालिका, अमळनेर

 

टॅग्स :Nagar BhavanनगरभवनAmalnerअमळनेर