शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

चाळीसगावला येणार ज्ञानप्रकाश यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 20:59 IST

लोणावळा स्थित मनशक्ती केंद्रातर्फे दरवर्षी स्वामी विद्यानानंद यांच्या कृतज्ञता स्मरण दिनानिमित्त ज्ञानप्रकाश यात्रेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही यात्रा चाळीसगाव येथे १९ ते २२ दरम्यान येत असून चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमनशक्ती केंद्राचे आयोजन१९ ते २१ असे चार दिवस कार्यक्रमराज्यातील ३५ साधक करणार मार्गदर्शनसकाळ आणि सायंकाळ दोन सत्रात प्रबोधन१५ नागरिक व विद्यार्थ्यांपर्यत पोहचवणार ज्ञानप्रकाशपत्रपरिषदेत दिली माहिती

चाळीसगाव, जि.जळगाव : लोणावळा स्थित मनशक्ती केंद्रातर्फे दरवर्षी स्वामी विद्यानानंद यांच्या कृतज्ञता स्मरण दिनानिमित्त ज्ञानप्रकाश यात्रेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही यात्रा चाळीसगाव येथे १९ ते २२ दरम्यान येत असून चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मार्गदर्शन करण्यासाठी आठ महिला आणि २७ पुरुष साधक उपस्थित राहणार आहे. तालुक्यातील १५ हजार नागरिक, विद्यार्थ्यांपर्यंत यात्रेचा ज्ञानप्रकाश पोहचविण्याचा संकल्प येथील साधकांनी शनिवारी दुपारी घेतलेल्या पत्रपरिषदेत व्यक्त केला.चाळीसगाव परिसरातील ३५ साधकांनी गेली दोन महिने तालुकाभरातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि नागरिकांशी जनजागृतीपर संवाद साधला. यासाठी २२० बैठका घेऊन ज्ञानप्रकाश यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यात्रेचे हे २६ वे वर्ष असून चाळीसगाव येथे दुसऱ्यांदा यात्रेचे आयोजन होत आहे.भडगाव रोडस्थित लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात १९ पासून यात्रेला सुरुवात होईल. दरदिवशी सकाळी साडे नऊ ते साडे दहा आणि सायंकाळी साडे सहा ते रात्री आठ पर्यंत कौटुंबिक सौख्य, ध्यान एक अनुभव, वास्तूशुद्धी कशी कराल?, अभ्यास यशाच्या युक्त्या (स्ट्रॉबोस्कोप टेस्टसहा), ताणमुक्त जीवन, युवाक्रांती, सुजाण पालकत्व आदी विषयांवर राज्यभरातून आलेले अनुभवी साधक प्रबोधन करतील. काही विवेचनांमध्ये प्रात्यक्षिक व चाचणी देखील घेण्यात येणार आहे. प्रवेश विनामुल्य आहे.पत्रपरिषदेला शंतनू पटवे, प्रकाश वाबळे, डॉ. नीलेश देशपांडे, हेमंत कुलकर्णी, राजेश येवले, विनायक देशपांडे उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव