शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जळगावातून जितेंद्र पाटीलने पहिल्यांदा उघडले रणजी संघाचे दार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 12:13 IST

डावखुरा मध्यमगती गोलंदाज दुखापतीतून सावरत पुनरागमनाच्या प्रय}ात

ठळक मुद्देजितेंद्रपाठोपाठ आता जळगावच्या जगदीश झोपेला रणजी सामन्याची संधी जितेंद्रने महाराष्ट्रासाठी 2010-11 च्या दोन रणजी सामन्यात 39 धावा केल्या

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27 - पाचोरा येथील जितेंद्र अरुण पाटील हा जळगाव जिल्ह्यातील पहिला रणजी क्रिकेटपटू असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने रणजी स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन सामन्यात प्रतिनिधित्व करण्यासोबतच आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे.  भुसावळ येथे मध्य रेल्वेच्या सेवेत असलेला हा 28 वर्षीय खेळाडू सध्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर असला तरी आपण आता  पुनरागमनाच्या प्रय}ात आहोत असे त्याने लोकमतशी बोलताना सांगितले.28 वर्षीय जितेंद्रपाठोपाठ आता जळगावच्या जगदीश झोपेला रणजी सामन्याची संधी मिळाली आहे.

उजव्या हाताने फलंदाजी व डावखूरा मध्यमगती गोलंदाज असलेल्या जितेंद्रने महाराष्ट्रासाठी 2010-11 च्या दोन रणजी सामन्यात 39 धावा केल्या असून गोलंदाजीत 254 धावात 7 बळी मिळवले आहेत. यात उत्तर प्रदेशविरुध्द तीन आणि दिल्लीविरुध्दच्या चार बळींचा समावेश आहे. दिल्लीविरुध्दचे 113 धावातील चार बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी राहिली आहे.

जितेंद्रला 2010-11 मध्ये प्रत्यक्ष प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले असले तरी 2006-07मध्येही अवघ्या 17 वर्षे वयात त्याची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड झाली होती.

आयपीएलच्या 2009 च्या सत्रात रॉयल च?लेंजर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुध्द त्याला संधी दिली होती. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा खेळली गेली होती. यानिमित्ताने अनिल कुंबळे, राहुल द्रविड, विराट कोहली, मार्क बौचर, नेथन ब्रेकन, केदार जाधव, जेकस् कॅलिस, ख्रिस गेल अशा नामवंत खेळाडूंसोबत राहण्याची संधी त्याला मिळाली होती.

2009 मध्ये अभिनव मुकुंद व,भुवनेश्वर कुमार यांच्यासोबत त्याची प्रतिष्ठेच्या बोर्डर- गावस्कर शिष्यवृत्तीसाठीसुध्दा निवड झाली होती. मात्र नंतर दुखापतींनी त्याच्या बहरणा:या कारकिर्दीला ब्रेक लावला परंतु आपण आता त्यातून बाहेर आलो असून पुनरागमनाच्या प्रय}ात असल्याचे त्याने सांगितले.