शहरं
Join us  
Trending Stories
1
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
2
Shiv Sena MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
3
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
4
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
5
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
6
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
7
Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
8
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
9
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
10
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
11
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
12
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
13
शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
14
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
15
नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?
16
अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
17
सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
18
अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
19
इंडिगोची 'दादागिरी' आता चालणार नाही; सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना दाखवला हिरवा कंदील
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
Daily Top 2Weekly Top 5

जि़प़ शिक्षण विभागालाच अभ्यासाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 12:24 IST

घोळ समोर येत असताना बदल्यांच्या पारदर्शकतेचा गवगवा कशासाठी

आनंद सुरवाडेजळगाव : जिल्हाभरात प्राथमिक शिक्षणाचा कसा बोजवारा उडाला आहे याची असंख्य उदाहरणे गेल्या आठ दिवसातच समोर आलेली आहेत़ अगदी शाळा खोल्यांच्या गंभीर प्रश्नापासून ते थेट वर्गाला शिक्षकच नसल्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे़ शिक्षकांचीच संख्याच कमी आहे, असे सांगत शिक्षण विभाग हात वर करून सर्व जबाबदारी झटकण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास येत आहे़ जामनेर तालुक्यातील ढालगावच्या प्रकरणाने शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराचे वाभाडेच काढले आहे़जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला दोन महिने शिक्षणाधिकारीच नव्हते़ कसेबसा उपशिक्षणाधिकारी डिगंबर देवांग यांनी दोन दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला़ त्यामुळे शाळा सुरू झाल्या त्या शिक्षणाधिकारी नसताना़ अशातच जिल्हा परिषदेत सहा ते आठ वर्षांनी शिक्षक पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली़ त्यानंतर बदली प्रक्रिया पार पडली़ ही प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने झाल्यामुळे अत्यंत पारदर्शकपणे झाल्याचा दावा प्रशासन करते़ मात्र, त्यानंतर समोर येणाऱ्या तक्रारी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा समोर येणारा गंभीर प्रश्न, होणोारे आरोप- प्रत्यारोप, राजकीय लोकप्रतिनिधींचा बदली प्रक्रियेतील सहभाग, आपल्याला या प्रक्रियेत सहभागी करून न घेतल्याचे सांगत नाराज झालेले शिक्षण सभापती हे सर्व प्रकार प्रशासनाचे हे सर्व दावे फोल ठरवते़ नशिराबादच्या शाळेत १३६ हून अधिक विद्यार्थी संख्या असतानाही एका शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांची बदली करण्यात येते़ ढालगाव येथील उर्दू शाळेचे तीन शिक्षक बदलून येथे दोन शिक्षक दिले़ ते रूजू व्हायला तयार नाहीत़ शिक्षक आणि प्रशासनाच्या हेव्या दाव्यांमध्ये विद्यार्थ्यांचे जे भविष्य खराब होत आहे त्यास जबाबदार कोण यात विद्यार्थी पालकांचा काय दोष़़़़ लोकप्रतिनिधींनी या महत्त्वाच्या विषयाकडे अक्ष्यम दुर्लक्ष केलेले आहे़ याची प्रचिती जिल्हा परिषदेतच आली़ पाच पैकी केवळ दोनच सदस्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले, अनेकांनी केवळ बाजूने निसटून जाण्यात धन्यता मानली़ अधिकाऱ्यांना खाली यायला तीन तास लागले़ जर आपण आजच्या विद्यार्थ्यांना उद्याचे भविष्य म्हणत असू, त्यांच्या शिक्षणासाठी वरिष्ठ पातळीवरून मोठ मोठ्या निधीच्या घोषणा केल्या जात असतील, कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे वांरवार नुसते सांगितलेच जात असेल, आणि जर या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणातही राजकीय, प्रशासकीय मंडळी केवळ 'शाळा'च भरवत असतील तर हे भविष्य अंधारात आहे़़़़़ हे सांगायला भविष्यकाराची गरज नाही़

टॅग्स :Jalgaonजळगाव