शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

जि़प़ शिक्षण विभागालाच अभ्यासाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 12:24 IST

घोळ समोर येत असताना बदल्यांच्या पारदर्शकतेचा गवगवा कशासाठी

आनंद सुरवाडेजळगाव : जिल्हाभरात प्राथमिक शिक्षणाचा कसा बोजवारा उडाला आहे याची असंख्य उदाहरणे गेल्या आठ दिवसातच समोर आलेली आहेत़ अगदी शाळा खोल्यांच्या गंभीर प्रश्नापासून ते थेट वर्गाला शिक्षकच नसल्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे़ शिक्षकांचीच संख्याच कमी आहे, असे सांगत शिक्षण विभाग हात वर करून सर्व जबाबदारी झटकण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास येत आहे़ जामनेर तालुक्यातील ढालगावच्या प्रकरणाने शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराचे वाभाडेच काढले आहे़जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला दोन महिने शिक्षणाधिकारीच नव्हते़ कसेबसा उपशिक्षणाधिकारी डिगंबर देवांग यांनी दोन दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला़ त्यामुळे शाळा सुरू झाल्या त्या शिक्षणाधिकारी नसताना़ अशातच जिल्हा परिषदेत सहा ते आठ वर्षांनी शिक्षक पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली़ त्यानंतर बदली प्रक्रिया पार पडली़ ही प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने झाल्यामुळे अत्यंत पारदर्शकपणे झाल्याचा दावा प्रशासन करते़ मात्र, त्यानंतर समोर येणाऱ्या तक्रारी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा समोर येणारा गंभीर प्रश्न, होणोारे आरोप- प्रत्यारोप, राजकीय लोकप्रतिनिधींचा बदली प्रक्रियेतील सहभाग, आपल्याला या प्रक्रियेत सहभागी करून न घेतल्याचे सांगत नाराज झालेले शिक्षण सभापती हे सर्व प्रकार प्रशासनाचे हे सर्व दावे फोल ठरवते़ नशिराबादच्या शाळेत १३६ हून अधिक विद्यार्थी संख्या असतानाही एका शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांची बदली करण्यात येते़ ढालगाव येथील उर्दू शाळेचे तीन शिक्षक बदलून येथे दोन शिक्षक दिले़ ते रूजू व्हायला तयार नाहीत़ शिक्षक आणि प्रशासनाच्या हेव्या दाव्यांमध्ये विद्यार्थ्यांचे जे भविष्य खराब होत आहे त्यास जबाबदार कोण यात विद्यार्थी पालकांचा काय दोष़़़़ लोकप्रतिनिधींनी या महत्त्वाच्या विषयाकडे अक्ष्यम दुर्लक्ष केलेले आहे़ याची प्रचिती जिल्हा परिषदेतच आली़ पाच पैकी केवळ दोनच सदस्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले, अनेकांनी केवळ बाजूने निसटून जाण्यात धन्यता मानली़ अधिकाऱ्यांना खाली यायला तीन तास लागले़ जर आपण आजच्या विद्यार्थ्यांना उद्याचे भविष्य म्हणत असू, त्यांच्या शिक्षणासाठी वरिष्ठ पातळीवरून मोठ मोठ्या निधीच्या घोषणा केल्या जात असतील, कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे वांरवार नुसते सांगितलेच जात असेल, आणि जर या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणातही राजकीय, प्रशासकीय मंडळी केवळ 'शाळा'च भरवत असतील तर हे भविष्य अंधारात आहे़़़़़ हे सांगायला भविष्यकाराची गरज नाही़

टॅग्स :Jalgaonजळगाव