शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

साधू ओळखावा मरणी.., जानवे ग्रामस्थांनी काढली हभप दगडू बोरसे यांची ‘आनंदयात्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 12:26 IST

अलौकीक भाग्य

ठळक मुद्देआठवणींना  उजाळा गावातील लोकांनी वर्गणी करीत हा खर्च करण्याचा निर्णय

चुडामण बोरसे / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27-  वीर ओळखावा रणांगणी , साधू ओळखावा मरणी.. आणि कर्ता ओळखावा कर्मकरणी.. संत नामदेव महाराजांच्या याच संतवचनाचा अनुभव जानवे ता. अमळनेर येथे दगडू बोरसे यांच्या अंत्ययात्रेत अनुभवास आला. गावातील लोकांनी अंत्ययात्रेसाठी वर्गणी गोळा केली आणि फटाके फोडून वाजत- गाजत अंत्ययात्रा नव्हे तर आनंदयात्रा काढत..बहिराम महाराजांच्या या भक्ताला अखेरचा निरोप दिला.    जानवे गावात एवढ्या  प्रचंड प्रमाणात निघालेली ही पहिलीच अंत्ययात्रा होती.. असे अलौकीक भाग्य कमी लोकांच्या नशिबी येत असते.. हभप दगडू शंकर बोरसे (65) यांचे शनिवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे जाणे सर्वांनाच चटका लावून गेले.  गावातील एक चालते- बोलते व्यक्तीमत्व. कुणाच्याही मदतीला धावून जाणारे.. कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो त्यात दगडू बोरसे नाहीत, असे होणार नाही. वयाच्या 20 व्या वषार्पासून ते पंढरपूरची पायी दिंडी करीत आले. अनेक आजारांवर ते  लोकांना औषधी देत असत.. घरी आर्थिक स्थिती जेमतेम..सलूनचा व्यवसाय करीत पण कुणाकडून कधीच अपेक्षा  केली नाही. विठ्ठल मंदिर उभारणीत त्यांचा पुढाकार होता. या निस्वार्थ भावनेमुळे जानवे आणि परिसरात दगा नाना म्हणून त्यांना ओळख मिळाली. गेल्या काही वषार्पूर्वी तत्कालीन सरपंच शिवाजीराव पाटील यांनी गावासाठी प्रवेशद्वार बनविले.  सरपंचांनी दगडू बोरसे यांच्या हस्ते या प्रवेशद्वाराचे लोकार्पण केले होते, या आठवणींना  उजाळा मिळाला.   रविवारी दुपारी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील लोकांनी वर्गणी करीत हा खर्च करण्याचा निर्णय घेतला.. बघता बघता बरीच रक्कम जमा झाली.  अंत्ययात्रेच्यावेळी गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सारा गाव त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाला होता. फटाके फोडून आणि वाजत- गाजत त्यांची अंत्ययात्रा निघाली. ठिकठिकाणी महिलांनी या हरिच्या सेवकाची आरती केली. बहिरम महाराज की जय आणि दगा नाना की जय.. च्या घोषात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ सोमवार 22 पासून गावातील विठ्ठल मंदिराच्या आवारात दहा दिवस कीर्तन सप्ताहाचे आयोजन ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.