शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

एका जनार्दनी शिव हा भजावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:48 IST

वेदशास्त्री गायीला पुराणी वर्णिला । तो शिव पाहिला डोळे भरी ।। तेणे माझ्या मना होय समाधान । आठवितो चरण ...

वेदशास्त्री गायीला पुराणी वर्णिला । तो शिव पाहिला डोळे भरी ।।तेणे माझ्या मना होय समाधान । आठवितो चरण वेळो वेळासकळ इंद्रिया झाली पै विश्रांती । पहाता ती मूर्ती शंकराची ।।एका जनार्दनी शिव हा भजावा । संसार करावा सुखरूप ।।-संत एकनाथ.माघ महिन्यातील शिवरात्र येऊ लागली की घरातील मोठी माणसं शिवलिलामृत काशीखंड आदी ग्रंथांच वाचन सुरू करतात. कुणी ‘ॐ नम: शिवाय’ ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप सुरू करतात, तर कुणी हौशी मंडळी ह्या महाशिवरात्री पर्वणी साधून बारा ज्योतीर्लिंग किंवा पुरातन शिव मंदिरांना आवर्जुन भेट देतात.ह्या पवित्र दिवशी शिव शंकराला रूद्राभिषेक करणे, जप करणे, बेलपत्र वाहणे, उपवास करणे आदी गोष्टी आवर्जुन केल्या जातात. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे ज्ञान, महाशिवरात्रीच्या उपासनेमुळे उपासकाचे निश्चितच कल्याण होते. त्याला ज्ञान प्राप्त होते, त्याला उत्कर्ष, मुक्ती आणि विकासाचा मार्ग सापडतो.शिव उपासनेमुळे माणसाच्या प्रवृत्ती कशा बदलतात, सदाचार, विवेक खऱ्या अर्थाने कसा जागा होतो. ह्याबद्दल शिवलिलामृतमध्ये एक कथा आहे.एक महाशिवरात्रीचा दिवस. एक पारधी शिकारीसाठी जंगलात गेला. जलाशयानजीकच्या वृक्षावर जाऊन बसला. पाणी पिण्यासाठी एखादे सावज आलं, एखादा प्राणी आला की त्याची शिकार करायची हा हेतू. पण... दिवस गेला, सूर्य अस्ताला गेला, तिन्ही सांजा होऊ लागल्या तरी एकही प्राणी त्या जलाशयाकडे आलाही नाही. पण शिकार मिळाली ही नाही. तेवढ्यात काही हरणं पाणी पिण्यासाठी तिथं आली. पारधी आता बाण सोडणार तोच त्या हरणांचा प्रमुख पुढे आला आणि पारध्याला म्हणाला, हे पारध्या तू शिकारी आहेस, शिकार करणे हा तुझा धर्म. तू आम्हाला मारणार हेही खरे आहे; पण त्या आधी आमची एक विनंती ऐक. आम्ही एकदाच आमचं कर्तव्य पूर्ण करून येतो.आमच्या कुटुंबियांना भेटून येतो मग तू आम्हाला मार. खरं तर हातातोंडाशी आलेली शिकार कशी जाऊ द्यायची; पण त्या हरणाच्या प्रमुखाने परत येण्याचं वचन दिलं. तेव्हा पारधी म्हणाला ‘‘ठिक आहे उद्या सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आलं पाहिजे.’’ हरिणाच्या कळपाने ते मान्य केलं आणि कळप तिथून निघून गेला. आता रात्र कशी काढायची या विचारात त्याला दूरवरच्या मंदिरातून घंटानाद ऐकू आला. पाठोपाठ ॐ नम: शिवायचा गजर सुरु होता. पारध्याला नकळत नाममंत्राची गोडी लागली. ज्या वृक्षावर बसला होता त्याची पानं तोडून तो खाली टाकू लागला. तो नेमका बेलाचा वृक्ष होता. ती बेलाची पाने पारध्याच्या हातून नेमकी वृक्षाखालच्या शिवपिंडीवर पडत होती. नकळत त्याच्या हातून ती शिवपूजा घडत होती. तोच ते हरण आले आणि म्हणाले, ‘पारध्या सोड बाण, मी माझं कुटुंबप्रमुखाचं कर्तव्य पूर्ण करून आलोय. मला आता मार..’ इतक्यात एक हरिणी पुढे येऊन म्हणाली, ‘त्याला नको मला मार, मला माझा पत्नी धर्म पाळू दे.’ तेवढ्यात त्याची पाडसं पुढे आली आणि म्हणाली त्या दोघांआधी आम्हाला मार, ते आमचे आई-वडील आहेत. आम्हाला आमचा पुत्र धर्म पाळू दे. त्यांचं रक्षण करू दे.एकापाठोपाठ एक अशी प्रत्येकाचीच दुसऱ्याला वाचवायची व कर्तव्य दक्षतेची चढाओढ पाहिली अन् पारध्याने विचार केला, हे प्राणी आपण धर्म पाळत आहे. त्याची शिकार करून पापाचा धनी का होऊ. पारध्यानं सर्वांनाच जीवदान दिले. यावर भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी हरिणांना मृग नक्षत्र म्हणून अन् पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले. हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा. ‘ॐ नम: शिवाय’.- डॉ. कैलास पाटील, पिंपळेसीम ता. धरणगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव