शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

एका जनार्दनी शिव हा भजावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:48 IST

वेदशास्त्री गायीला पुराणी वर्णिला । तो शिव पाहिला डोळे भरी ।। तेणे माझ्या मना होय समाधान । आठवितो चरण ...

वेदशास्त्री गायीला पुराणी वर्णिला । तो शिव पाहिला डोळे भरी ।।तेणे माझ्या मना होय समाधान । आठवितो चरण वेळो वेळासकळ इंद्रिया झाली पै विश्रांती । पहाता ती मूर्ती शंकराची ।।एका जनार्दनी शिव हा भजावा । संसार करावा सुखरूप ।।-संत एकनाथ.माघ महिन्यातील शिवरात्र येऊ लागली की घरातील मोठी माणसं शिवलिलामृत काशीखंड आदी ग्रंथांच वाचन सुरू करतात. कुणी ‘ॐ नम: शिवाय’ ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप सुरू करतात, तर कुणी हौशी मंडळी ह्या महाशिवरात्री पर्वणी साधून बारा ज्योतीर्लिंग किंवा पुरातन शिव मंदिरांना आवर्जुन भेट देतात.ह्या पवित्र दिवशी शिव शंकराला रूद्राभिषेक करणे, जप करणे, बेलपत्र वाहणे, उपवास करणे आदी गोष्टी आवर्जुन केल्या जातात. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे ज्ञान, महाशिवरात्रीच्या उपासनेमुळे उपासकाचे निश्चितच कल्याण होते. त्याला ज्ञान प्राप्त होते, त्याला उत्कर्ष, मुक्ती आणि विकासाचा मार्ग सापडतो.शिव उपासनेमुळे माणसाच्या प्रवृत्ती कशा बदलतात, सदाचार, विवेक खऱ्या अर्थाने कसा जागा होतो. ह्याबद्दल शिवलिलामृतमध्ये एक कथा आहे.एक महाशिवरात्रीचा दिवस. एक पारधी शिकारीसाठी जंगलात गेला. जलाशयानजीकच्या वृक्षावर जाऊन बसला. पाणी पिण्यासाठी एखादे सावज आलं, एखादा प्राणी आला की त्याची शिकार करायची हा हेतू. पण... दिवस गेला, सूर्य अस्ताला गेला, तिन्ही सांजा होऊ लागल्या तरी एकही प्राणी त्या जलाशयाकडे आलाही नाही. पण शिकार मिळाली ही नाही. तेवढ्यात काही हरणं पाणी पिण्यासाठी तिथं आली. पारधी आता बाण सोडणार तोच त्या हरणांचा प्रमुख पुढे आला आणि पारध्याला म्हणाला, हे पारध्या तू शिकारी आहेस, शिकार करणे हा तुझा धर्म. तू आम्हाला मारणार हेही खरे आहे; पण त्या आधी आमची एक विनंती ऐक. आम्ही एकदाच आमचं कर्तव्य पूर्ण करून येतो.आमच्या कुटुंबियांना भेटून येतो मग तू आम्हाला मार. खरं तर हातातोंडाशी आलेली शिकार कशी जाऊ द्यायची; पण त्या हरणाच्या प्रमुखाने परत येण्याचं वचन दिलं. तेव्हा पारधी म्हणाला ‘‘ठिक आहे उद्या सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आलं पाहिजे.’’ हरिणाच्या कळपाने ते मान्य केलं आणि कळप तिथून निघून गेला. आता रात्र कशी काढायची या विचारात त्याला दूरवरच्या मंदिरातून घंटानाद ऐकू आला. पाठोपाठ ॐ नम: शिवायचा गजर सुरु होता. पारध्याला नकळत नाममंत्राची गोडी लागली. ज्या वृक्षावर बसला होता त्याची पानं तोडून तो खाली टाकू लागला. तो नेमका बेलाचा वृक्ष होता. ती बेलाची पाने पारध्याच्या हातून नेमकी वृक्षाखालच्या शिवपिंडीवर पडत होती. नकळत त्याच्या हातून ती शिवपूजा घडत होती. तोच ते हरण आले आणि म्हणाले, ‘पारध्या सोड बाण, मी माझं कुटुंबप्रमुखाचं कर्तव्य पूर्ण करून आलोय. मला आता मार..’ इतक्यात एक हरिणी पुढे येऊन म्हणाली, ‘त्याला नको मला मार, मला माझा पत्नी धर्म पाळू दे.’ तेवढ्यात त्याची पाडसं पुढे आली आणि म्हणाली त्या दोघांआधी आम्हाला मार, ते आमचे आई-वडील आहेत. आम्हाला आमचा पुत्र धर्म पाळू दे. त्यांचं रक्षण करू दे.एकापाठोपाठ एक अशी प्रत्येकाचीच दुसऱ्याला वाचवायची व कर्तव्य दक्षतेची चढाओढ पाहिली अन् पारध्याने विचार केला, हे प्राणी आपण धर्म पाळत आहे. त्याची शिकार करून पापाचा धनी का होऊ. पारध्यानं सर्वांनाच जीवदान दिले. यावर भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी हरिणांना मृग नक्षत्र म्हणून अन् पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले. हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा. ‘ॐ नम: शिवाय’.- डॉ. कैलास पाटील, पिंपळेसीम ता. धरणगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव