शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

एका जनार्दनी शिव हा भजावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:48 IST

वेदशास्त्री गायीला पुराणी वर्णिला । तो शिव पाहिला डोळे भरी ।। तेणे माझ्या मना होय समाधान । आठवितो चरण ...

वेदशास्त्री गायीला पुराणी वर्णिला । तो शिव पाहिला डोळे भरी ।।तेणे माझ्या मना होय समाधान । आठवितो चरण वेळो वेळासकळ इंद्रिया झाली पै विश्रांती । पहाता ती मूर्ती शंकराची ।।एका जनार्दनी शिव हा भजावा । संसार करावा सुखरूप ।।-संत एकनाथ.माघ महिन्यातील शिवरात्र येऊ लागली की घरातील मोठी माणसं शिवलिलामृत काशीखंड आदी ग्रंथांच वाचन सुरू करतात. कुणी ‘ॐ नम: शिवाय’ ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप सुरू करतात, तर कुणी हौशी मंडळी ह्या महाशिवरात्री पर्वणी साधून बारा ज्योतीर्लिंग किंवा पुरातन शिव मंदिरांना आवर्जुन भेट देतात.ह्या पवित्र दिवशी शिव शंकराला रूद्राभिषेक करणे, जप करणे, बेलपत्र वाहणे, उपवास करणे आदी गोष्टी आवर्जुन केल्या जातात. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे ज्ञान, महाशिवरात्रीच्या उपासनेमुळे उपासकाचे निश्चितच कल्याण होते. त्याला ज्ञान प्राप्त होते, त्याला उत्कर्ष, मुक्ती आणि विकासाचा मार्ग सापडतो.शिव उपासनेमुळे माणसाच्या प्रवृत्ती कशा बदलतात, सदाचार, विवेक खऱ्या अर्थाने कसा जागा होतो. ह्याबद्दल शिवलिलामृतमध्ये एक कथा आहे.एक महाशिवरात्रीचा दिवस. एक पारधी शिकारीसाठी जंगलात गेला. जलाशयानजीकच्या वृक्षावर जाऊन बसला. पाणी पिण्यासाठी एखादे सावज आलं, एखादा प्राणी आला की त्याची शिकार करायची हा हेतू. पण... दिवस गेला, सूर्य अस्ताला गेला, तिन्ही सांजा होऊ लागल्या तरी एकही प्राणी त्या जलाशयाकडे आलाही नाही. पण शिकार मिळाली ही नाही. तेवढ्यात काही हरणं पाणी पिण्यासाठी तिथं आली. पारधी आता बाण सोडणार तोच त्या हरणांचा प्रमुख पुढे आला आणि पारध्याला म्हणाला, हे पारध्या तू शिकारी आहेस, शिकार करणे हा तुझा धर्म. तू आम्हाला मारणार हेही खरे आहे; पण त्या आधी आमची एक विनंती ऐक. आम्ही एकदाच आमचं कर्तव्य पूर्ण करून येतो.आमच्या कुटुंबियांना भेटून येतो मग तू आम्हाला मार. खरं तर हातातोंडाशी आलेली शिकार कशी जाऊ द्यायची; पण त्या हरणाच्या प्रमुखाने परत येण्याचं वचन दिलं. तेव्हा पारधी म्हणाला ‘‘ठिक आहे उद्या सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आलं पाहिजे.’’ हरिणाच्या कळपाने ते मान्य केलं आणि कळप तिथून निघून गेला. आता रात्र कशी काढायची या विचारात त्याला दूरवरच्या मंदिरातून घंटानाद ऐकू आला. पाठोपाठ ॐ नम: शिवायचा गजर सुरु होता. पारध्याला नकळत नाममंत्राची गोडी लागली. ज्या वृक्षावर बसला होता त्याची पानं तोडून तो खाली टाकू लागला. तो नेमका बेलाचा वृक्ष होता. ती बेलाची पाने पारध्याच्या हातून नेमकी वृक्षाखालच्या शिवपिंडीवर पडत होती. नकळत त्याच्या हातून ती शिवपूजा घडत होती. तोच ते हरण आले आणि म्हणाले, ‘पारध्या सोड बाण, मी माझं कुटुंबप्रमुखाचं कर्तव्य पूर्ण करून आलोय. मला आता मार..’ इतक्यात एक हरिणी पुढे येऊन म्हणाली, ‘त्याला नको मला मार, मला माझा पत्नी धर्म पाळू दे.’ तेवढ्यात त्याची पाडसं पुढे आली आणि म्हणाली त्या दोघांआधी आम्हाला मार, ते आमचे आई-वडील आहेत. आम्हाला आमचा पुत्र धर्म पाळू दे. त्यांचं रक्षण करू दे.एकापाठोपाठ एक अशी प्रत्येकाचीच दुसऱ्याला वाचवायची व कर्तव्य दक्षतेची चढाओढ पाहिली अन् पारध्याने विचार केला, हे प्राणी आपण धर्म पाळत आहे. त्याची शिकार करून पापाचा धनी का होऊ. पारध्यानं सर्वांनाच जीवदान दिले. यावर भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी हरिणांना मृग नक्षत्र म्हणून अन् पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले. हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा. ‘ॐ नम: शिवाय’.- डॉ. कैलास पाटील, पिंपळेसीम ता. धरणगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव