शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

जामनेरला राष्ट्रवादीचे पालिकेसमोर कचरा फेको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 15:05 IST

जामनेर : शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगातून गोळा करून आणलेला कचरा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी नगरपालिका कार्यालयासमोर आणून फेकला. ...

जामनेर : शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगातून गोळा करून आणलेला कचरा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी नगरपालिका कार्यालयासमोर आणून फेकला. डेंग्यूची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पालिकेने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सात दिवसात कचऱ्याची विल्हेवाट लागली नाही तर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरात डेंगू सदृश्य रुग्णाची संख्या वाढत आहे.पालिकेकडून कचरा उचलण्यात दिरंगाई होत आहे. गटारी स्वच्छ केल्या जात नाही, परिणामी डासांची संख्या वाढत आहे. पालिकेने फवारणी करण्याची मागणी होत आहे.निवेदनात म्हटले आहे की, लोकांनी निवडून दिलेले नगराध्यक्ष व नगरसेवकांना नागरिकांच्या आरोग्याचा विसर पडलेला आहे. सर्वच वार्डांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छतेचा पुरस्कार मिळालेली पालिका हीच का, असा प्रश्न निर्माण होतो.यावेळी शहराध्यक्ष पप्पू पाटील, माधव चव्हाण, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील,संदीप हिवाळे, सागर पाटील, अनीस पठाण, कृष्णा माळी, मोहन चौधरी, इम्रान शेख, जुबेर शेख,जमील शेख, प्रभू झाल्टे, विशाल पाटील, भूषण पांढरे सह कार्यकर्ते उपस्थित होते.शहरातील नागरिकांची कचऱ्याबाबत कोणतीही तक्रार नाही. कचरा गोळा करून पालिका कार्यालयात आणणे हा राष्ट्रवादीचा राजकीय स्टंट आहे.-अनिस शेख, उपनगराध्यक्ष, जामनेर पालिकाकोरोनासारख्या संकट काळात नगराध्यक्ष, नगरसेवक घराबाहेर पडले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा नाही. मुख्याधिकारी यांनी नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शहर स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.-पप्पू पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष, जामनेर 

 

टॅग्स :PoliticsराजकारणJamnerजामनेर