शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

जामनेरला चाऱ्याअभावी दुग्ध व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 17:46 IST

परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे चाºयाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देअति पावसामुळे पिके कुजलीचारा सडलापशुपालक हवालदिल

लियाकत सय्यदजामनेर, जि.जळगाव : तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे चाºयाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय संकटात सापडला असून पशुपालकांची चिंता वाढली आहे.तालुक्यात काठेवाडी समाजाचे होळ हवेली हे गाव सर्वात जास्त दूध उत्पादन करणारे गाव म्हणून प्रसिद्ध आहे व त्यांचा एकमेव व्यवसाय दुग्ध आहे. गावात जवळपास १५०० गुरे आहेत. आॅक्टोबर महिन्यात सततच्या पावसामुळे येथे भीषण चाराटंचाई निर्माण झाली असून, दुग्ध व्यवसाय संकटात सापडला आहे. परतीच्या पावसामुळे तालुक्यात संपूर्ण चारा सडला आहे. या निकृष्ट चाºयामुळे दुधात प्रचंड घट झाली आहे. यामुळे हा व्यवसाय करणेदेखील परवडत नसल्याचे पशुपालक सांगतात. मका, बाजरी, सोयाबीन आदी पिकापासून गुरांना मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होत होता. यामुळेच येथील शेतकरी हे पीक घेत होते. मात्र यंदा संपूर्ण पीक कुजून गेले असून, उत्पन्न बुडाले आहे. त्यात त्यापासून मिळणारा चाराही सडला आहे. मका, बाजरी सरमट यांची कुट्टी करून यामध्ये भुईमुगाचा पाला मिसळून हा कसदार पुरवठा गुरांना करण्यात येत होता. मात्र यंदा सडका चारा गुरांना खाऊ घालणेदेखील धोक्याचे झाले आहे. कोरडा व हिरवा असा दोन्ही प्रकारचा कसदार चारा असेल तर दुधाचे प्रमाणदेखील वाढते चारा कसा आहे यावरच दुग्ध व्यवसाय अवलंबून असतो. यामुळे निम्म्यावर दूध उत्पादन येऊन ठेपले आहे. याउलट पशुखाद्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ७० किलो सरकी ढेप पोत्याची किंमत १८०० रुपये, तर ३० रुपये किलो असल्याचे पशुपालकांनी सांगितले. मात्र उदरनिर्वाहासाठी असलेला दुग्ध व्यवसायदेखील चाºयाअभावी अडचणीत असल्यामुळे येथील पशुपालक संकटात सापडला आहेत.रब्बी हंगामही लांबणार?खरीप हंगामातील उत्पन्नावरच रब्बी हंगाम अवलंबून असतो. मात्र खरिपाचे गणित बिघडल्याने रब्बी हंगाम लांबणीवर आहे. बºयाच ठिकाणी शेतकरी वर्ग शेतात कापूस पीक उपटून रब्बीची लागवड करण्याच्या तयारीत दिसत आहे. त्यामुळे रब्बीच्या पेरणीला डिसेंबर अखेरपर्यंत वेळ लागू शकतो.यावलमधून चाºयाची आवकतालुक्यात परतीच्या पावसामुळे चारादेखील सडका झाला आहे. पशुपालक हे यावल तालुक्यातील यावल, बामणोद, वड्री व या भागातील परिसरातून चारा आणत आहेत.चाºयाअभावी दुधात प्रचंड घट झाली आहे. याउलट पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. ओला दुष्काळ असला तरी जास्त पाण्यामुळे चारा सडला आहे. कोरडा चारा येथे कुठे शिल्लक नाही. नाईलाज गुरांसाठी यावल तालुक्यामधून चारा आणावा लागत आहे.-बिजल लाखा, दुग्ध व्यवसायिक, होळ हवेली, ता.जामनेर

टॅग्स :FarmerशेतकरीJamnerजामनेर