शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

जामनेर आगाराला चार कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 16:18 IST

जामनेर आगारातील तब्बल ८७ बसेसची चाके जागेवरच थांबली आहेत. यातून जामनेर आगाराला चार कोटींचा फटका बसणार आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम८७ बसेस जागेवरच

(सय्यद लियाकत /मोहन सारस्वत)जामनेर, जि.जळगाव : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यभरात संचारबंदी सुरू आहे. परिणामी २२ मार्चपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जामनेर आगारातील तब्बल ८७ बसेसची चाके जागेवरच थांबली आहेत. यातून जामनेर आगाराला चार कोटींचा फटका बसणार आहे. प्रति दिवस सरासरी आठ लाखांचे उत्पन्न बुडत असल्याची माहिती आगारप्रमुख कमलेश धनराळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जामनेर आगारातून जिल्ह्यासह गुजरात, मध्य प्रदेश, मुंबई, पुणे बसेस प्रवाशांच्या सेवेत धावतात. त्यासाठी जवळपास ४४० कर्मचारी कार्यरत आहेत. जामनेर आगार विभागाची दैनदिन आर्थिक उलाढाल आठ ते नऊ लाखांच्या घरात आहे. मार्च महिन्यात केवळ २२ दिवस एस.टी. बसने प्रवाशांना सेवा दिली. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंंतर मात्र आगाराच्या ८७ बसेस जागेवरच थांबून आहेत. देशभर लॉकडाऊन सुरू असल्याने सेवाही ठप्प झाली आहे. आता लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या जवळपास ४५ ते ५० दिवस एस.टी. बसेसची चाके थांबणार आहेत. यातून दिवसाला आठ लाख रुपये या हिशोबाने तब्बल चार कोटी रुपयांवर जामनेर आगाराला पाणी सोडावे लागणार आहे. तसेच एप्रिल २०१९ मध्ये जामनेर आगाराला दोन कोटी ९६ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते व जिल्ह्यात जामनेर आगार उत्पन्नात एक नंबर आले होते. मात्र यावेळी लॉकडाउनचा मोठ्या प्रमाणावर फटका जामनेर आगाराला बसला आहे.७२ वर्षात पहिल्यांदाच थांबली बसेसची चाकेमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेला जवळपास ७२ वर्षांचा कालावधी होत आहे. यामध्ये पहिल्यांदाच कोरोनामुळे बसेसची चाके थांबली आहेत. आंदोलन, संप यामुळे काही दिवस बससेवा विस्कळीत व्हायची. मात्र लॉकडाऊनने या सेवेला सध्या ब्रेक लागला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJamnerजामनेर