शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

जामनेरला महिलांचा पं.स.वर हंडामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:28 IST

नवीदाभाडी येथे पाण्याअभावी प्रचंड हाल

जामनेर : तालुक्यातील नवीदाभाडी (वाडी) येथील पाणी टंचाईकडे दुर्लक्ष करण्यासह कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याच्या निषेधार्थ शेकडो महिलांनी जामनेर पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला. पाण्याची समस्या तत्काळ मार्गी लावावी, अशा मागणीचे निवेदन गटविकास आधिकारी अजय जोशी यांना ग्रामस्थांनी दिले.निवेदनात म्हटले आहे की, नवीदाभाडी (वाडी) येथे विशेषत: दलित वस्तीमध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण केली जात असल्याचा आरोप लेखी निवेदनात व तोंडीही करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासह अन्य विकास कामांच्या बाबतीतही हेतूपुरस्सर आमच्याकडे दुर्लक्ष केले जाते यासह अनेक समस्या यावेळी महिलांनी या वेळी मांडल्या.जस-जशी उन्हाची तीव्रता वाढू लागली तशी-तशी तालुक्यातील पाणी समस्येने डोके वर काढले असून अनेक नियमित पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे. तालुक्यात बहुतांश धरणे-तलावांमधून गावांना पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र काही ठिकाणी दहा-ते बारा वर्ष झाली तरी ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे बहुतांश योजनांना अद्यापही मुर्तरूप येऊ शकले नाही. याचाही फटका अनेक गावांना नाहक सहन करावा लागत आहे. असाच प्रकार नवीदाभाडीचाही असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मुबलकपणे पाणी आहे मात्र पाईपलाईन कशी व कोठून टाकावी याविषयी सुद्धा आपसात वाद असल्याचे सांगण्यात येते. यावेळी आलेल्या हंडा मोर्चामधे ग्रामपंचायत सदस्या रूपाली जंजाळे यांच्यासह गावातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Jalgaonजळगाव