शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

जामनेरला महिलांचा पं.स.वर हंडामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:28 IST

नवीदाभाडी येथे पाण्याअभावी प्रचंड हाल

जामनेर : तालुक्यातील नवीदाभाडी (वाडी) येथील पाणी टंचाईकडे दुर्लक्ष करण्यासह कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याच्या निषेधार्थ शेकडो महिलांनी जामनेर पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला. पाण्याची समस्या तत्काळ मार्गी लावावी, अशा मागणीचे निवेदन गटविकास आधिकारी अजय जोशी यांना ग्रामस्थांनी दिले.निवेदनात म्हटले आहे की, नवीदाभाडी (वाडी) येथे विशेषत: दलित वस्तीमध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण केली जात असल्याचा आरोप लेखी निवेदनात व तोंडीही करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासह अन्य विकास कामांच्या बाबतीतही हेतूपुरस्सर आमच्याकडे दुर्लक्ष केले जाते यासह अनेक समस्या यावेळी महिलांनी या वेळी मांडल्या.जस-जशी उन्हाची तीव्रता वाढू लागली तशी-तशी तालुक्यातील पाणी समस्येने डोके वर काढले असून अनेक नियमित पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे. तालुक्यात बहुतांश धरणे-तलावांमधून गावांना पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र काही ठिकाणी दहा-ते बारा वर्ष झाली तरी ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे बहुतांश योजनांना अद्यापही मुर्तरूप येऊ शकले नाही. याचाही फटका अनेक गावांना नाहक सहन करावा लागत आहे. असाच प्रकार नवीदाभाडीचाही असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मुबलकपणे पाणी आहे मात्र पाईपलाईन कशी व कोठून टाकावी याविषयी सुद्धा आपसात वाद असल्याचे सांगण्यात येते. यावेळी आलेल्या हंडा मोर्चामधे ग्रामपंचायत सदस्या रूपाली जंजाळे यांच्यासह गावातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Jalgaonजळगाव