शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर तालुक्यात दीड वर्षात ८० अपघातात ५० जणांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 19:29 IST

गेल्या दोन वर्षापासून मुक्ताईनगर-जामनेर-पहूर-जळगाव ते औरंगाबादकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग, जामनेर-फत्तेपूर-देऊळगाव या रस्त्यांचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे गेल्या दीड वर्षात तालुक्यात ८० अपघातात ५० जणांचा बळी गेला असून शंभरावर व्यक्ती जखमी झाल्या आहेत.

ठळक मुद्दे खराब रस्त्यांनी केले हैराणखड्ड्यांमुळे अपघातात वाढ

सय्यद लियाकतजामनेर, जि.जळगाव : तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून मुक्ताईनगर-जामनेर-पहूर-जळगाव ते औरंगाबादकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग, जामनेर-फत्तेपूर-देऊळगाव या रस्त्यांचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे गेल्या दीड वर्षात तालुक्यात ८० अपघातात ५० जणांचा बळी गेला असून शंभरावर व्यक्ती जखमी झाल्या आहेत. याला फक्त खोदलेले रस्ते वो रस्त्यावर पडलेले खड्डे, ठेकेदार, प्रशासन हे जबाबदार आहे.सध्या जामनेरहून बोदवडला जाणारा रस्ता खोदून ठेवल्याने दुचाकी व प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांना, एसटी बसला त्रासदायक ठरत आहे. अशीच स्थिती जामनेर पहूर रस्त्याची आहे. जामनेर येथून पहूर मार्ग औरंगाबाद, पुणे, शेंदुर्णी, पाचोरा जाणाºया एसटी व खाजगी बसेसची संख्या जास्त आहे. अत्यंत खराब रस्त्यामुळे काही एसटी बस खासगी ट्रॅव्हल्स यामार्गएवजी दुसºया मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. जळगाव येथून जामनेर येताना नेरी व पहूरपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी अयोग्य ठरत असल्याने जळगाव-जामनेर-पहूर-जळगाव-शेंदुर्णी-जळगाव हा प्रवास मोठा त्रासदायक ठरत आहे. एक ते दीड तासाच्या प्रवासाला यामुळे दोन तास वेळ लागत आहे. परिणामी जामनेर येथून जळगाव जाण्यासाठी वाहनधारक कुºहा, नशिराबाद या मार्गाचा वापर करीत आहेत. गेल्या दोन ते अडीच वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाच्या कामांची घोषणा केली होती. काम सुरू होण्यास विलंब लागला सुरू झालेले काम मुदतीत पूर्ण होऊ शकले नाही.फत्तेपूर देवळगाव रस्त्याचेही तेच हाल?जामनेर-फत्तेपूर-देऊळगाव-धामणगाव या रस्त्याच्या रुंदीकरणाचे व दुरुस्तीचे काम गेल्या वषार्पासून सुरू आहे. दुरुस्तीच्या नावाखाली ठेकेदाराने जागोजागी रस्ता खोदून ठेवला आहे. तालुक्यातील हा महत्त्वाचा रस्ता असून बुलढाणा जिल्ह्याला जोडणारा असल्याने २४ तास वाहतूक सुरू असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांचे दुर्लक्षामुळे तेही काम संथ गतीने सुरू आहे.दीड वर्षात ८० अपघात ५० जणांचा बळीतालुक्यात गेल्या दीड वर्षापासून रस्त्यांचे काम संथ गतीने सुरू आहे. यामुळे आतापर्यंत ८० अपघातात ५० जणांचा बळी व १०० च्या अधिक वर जण जखमी झाले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली आहे. यात सर्वात जास्त अपघात हे जामनेर ते पहूर रस्त्यावर झाले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातJamnerजामनेर