शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

जळगावचा वहनोत्सव मंगळवारपासून, श्रीरामाच्या उत्सवमूर्तीचे थेट अयोध्येशी नाते!

By अमित महाबळ | Updated: November 13, 2023 18:44 IST

वहनावर श्रीक्षेत्र अयोध्या येथील रामानुज सांप्रदायाचे स्वामी रामानंद यांच्याकडून मिळालेली श्रीरामाची प्रासादिक उत्सवमूर्ती असते.

जळगाव : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचा श्रीराम रथवहनोत्सव मंगळवारपासून सुरू होत असून, यावर्षी १० वहनांना ३० यजमानांच्या घरी पानसुपारी होणार आहे. ज्या ठिकाणी रथ जाऊ शकत नाही, त्या भागात वहन नेले जाते. वहनावर श्रीक्षेत्र अयोध्या येथील रामानुज सांप्रदायाचे स्वामी रामानंद यांच्याकडून मिळालेली श्रीरामाची प्रासादिक उत्सवमूर्ती असते. सोबत संत मुक्ताबाई, स्वामी नरसिंह सरस्वती महाराज (आळंदी) आणि कुंवरस्वामी महाराज (वाघोड) यांच्या पादुका असतात.

वहनोत्सवाचे १५१ वर्षे असून, मंगळवारी (दि.१४) त्याचा शुभारंभ होणार आहे. यामध्ये घोडा (अश्व), हत्ती (ऐरावत), वाघ, सिंह, सरस्वती, चंद्र, सूर्यनारायण, गरुडराज, मारुती, रासक्रीडा आदी १० वहने निघतील. दरवर्षी नवरात्रीपासून वहनांसाठी पानसुपारी (आमंत्रण) स्वीकारली जाते. एका वहनाला सरासरी दोन ते तीन पानसुपारी होतात. वहन जाण्याचा मार्ग, मंदिरापासूनचे अंतर आदी बाबी विचारात घेऊन मंगेश महाराज जोशी व रथोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील हे वहनाचे आमंत्रण निश्चित करत असतात. दरवर्षी सात ते आठ नवीन कुटुंबे अशी असतात की, ती प्रथमच वहनासाठी आमंत्रण देतात. यजमानांच्या घरी गेल्यावर वहनाची पूजा, भजन-भारुड, सोबत आलेल्या मंडळींचा सत्कार आदी कार्यक्रम होतात. काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली जाते.

श्रीरामाचे दोनच रथ, त्यापैकी एक जळगावचा...

देशात सर्वाधिक रथ बालाजीचे आहेत तर श्रीरामाचे दोनच रथ आहेत. जळगावचा श्रीराम रथ कार्तिक प्रबोधिनी एकादशीला निघतो. या तिथीला निघणारा हा रथ देशातील एकमेव आहे. रथाच्या आधीपासून (कार्तिक प्रतिपदा) वहनोत्सवाला सुरुवात होते. प्रत्येक दिवशीच्या वहनावर श्रीरामाची प्रासादिक उत्सवमूर्ती असते. सोबतच्या पालखीमध्ये संत मुक्ताबाई, स्वामी नरसिंह सरस्वती महाराज (आळंदी) आणि कुंवरस्वामी महाराज (वाघोड) यांच्या पादुका असतात. श्रीरामाची उत्सवमूर्ती संत अप्पा महाराजांना वयाच्या १५ व्या वर्षी शके १७८२ मध्ये आशीर्वाद रूपात प्राप्त झाली आहे, अशी माहिती श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती मंगेश महाराज जोशी यांनी दिली.

तिथीचा क्षय झाल्याने एक वहन कमी

यंदा षष्ठी व सप्तमी एकत्र आल्याने तिथीचा क्षय झाला आहे. त्यामुळे षष्ठीला निघणारे शेषनागाचे वहन नसेल. तिथीक्षयामुळे वहनांची संख्या कमी होते, त्याचप्रमाणे प्रतिपदा ते दशमीपर्यंत कोणत्याही तिथीची वृद्धीला झाली, तर वाढीव तिथीच्या दिवशी गजेंद्र मोक्षाचे वहन निघते. 

टॅग्स :Jalgaonजळगाव