शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जळगावचा वहनोत्सव मंगळवारपासून, श्रीरामाच्या उत्सवमूर्तीचे थेट अयोध्येशी नाते!

By अमित महाबळ | Updated: November 13, 2023 18:44 IST

वहनावर श्रीक्षेत्र अयोध्या येथील रामानुज सांप्रदायाचे स्वामी रामानंद यांच्याकडून मिळालेली श्रीरामाची प्रासादिक उत्सवमूर्ती असते.

जळगाव : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचा श्रीराम रथवहनोत्सव मंगळवारपासून सुरू होत असून, यावर्षी १० वहनांना ३० यजमानांच्या घरी पानसुपारी होणार आहे. ज्या ठिकाणी रथ जाऊ शकत नाही, त्या भागात वहन नेले जाते. वहनावर श्रीक्षेत्र अयोध्या येथील रामानुज सांप्रदायाचे स्वामी रामानंद यांच्याकडून मिळालेली श्रीरामाची प्रासादिक उत्सवमूर्ती असते. सोबत संत मुक्ताबाई, स्वामी नरसिंह सरस्वती महाराज (आळंदी) आणि कुंवरस्वामी महाराज (वाघोड) यांच्या पादुका असतात.

वहनोत्सवाचे १५१ वर्षे असून, मंगळवारी (दि.१४) त्याचा शुभारंभ होणार आहे. यामध्ये घोडा (अश्व), हत्ती (ऐरावत), वाघ, सिंह, सरस्वती, चंद्र, सूर्यनारायण, गरुडराज, मारुती, रासक्रीडा आदी १० वहने निघतील. दरवर्षी नवरात्रीपासून वहनांसाठी पानसुपारी (आमंत्रण) स्वीकारली जाते. एका वहनाला सरासरी दोन ते तीन पानसुपारी होतात. वहन जाण्याचा मार्ग, मंदिरापासूनचे अंतर आदी बाबी विचारात घेऊन मंगेश महाराज जोशी व रथोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील हे वहनाचे आमंत्रण निश्चित करत असतात. दरवर्षी सात ते आठ नवीन कुटुंबे अशी असतात की, ती प्रथमच वहनासाठी आमंत्रण देतात. यजमानांच्या घरी गेल्यावर वहनाची पूजा, भजन-भारुड, सोबत आलेल्या मंडळींचा सत्कार आदी कार्यक्रम होतात. काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली जाते.

श्रीरामाचे दोनच रथ, त्यापैकी एक जळगावचा...

देशात सर्वाधिक रथ बालाजीचे आहेत तर श्रीरामाचे दोनच रथ आहेत. जळगावचा श्रीराम रथ कार्तिक प्रबोधिनी एकादशीला निघतो. या तिथीला निघणारा हा रथ देशातील एकमेव आहे. रथाच्या आधीपासून (कार्तिक प्रतिपदा) वहनोत्सवाला सुरुवात होते. प्रत्येक दिवशीच्या वहनावर श्रीरामाची प्रासादिक उत्सवमूर्ती असते. सोबतच्या पालखीमध्ये संत मुक्ताबाई, स्वामी नरसिंह सरस्वती महाराज (आळंदी) आणि कुंवरस्वामी महाराज (वाघोड) यांच्या पादुका असतात. श्रीरामाची उत्सवमूर्ती संत अप्पा महाराजांना वयाच्या १५ व्या वर्षी शके १७८२ मध्ये आशीर्वाद रूपात प्राप्त झाली आहे, अशी माहिती श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती मंगेश महाराज जोशी यांनी दिली.

तिथीचा क्षय झाल्याने एक वहन कमी

यंदा षष्ठी व सप्तमी एकत्र आल्याने तिथीचा क्षय झाला आहे. त्यामुळे षष्ठीला निघणारे शेषनागाचे वहन नसेल. तिथीक्षयामुळे वहनांची संख्या कमी होते, त्याचप्रमाणे प्रतिपदा ते दशमीपर्यंत कोणत्याही तिथीची वृद्धीला झाली, तर वाढीव तिथीच्या दिवशी गजेंद्र मोक्षाचे वहन निघते. 

टॅग्स :Jalgaonजळगाव