शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

जळगावचा वहनोत्सव मंगळवारपासून, श्रीरामाच्या उत्सवमूर्तीचे थेट अयोध्येशी नाते!

By अमित महाबळ | Updated: November 13, 2023 18:44 IST

वहनावर श्रीक्षेत्र अयोध्या येथील रामानुज सांप्रदायाचे स्वामी रामानंद यांच्याकडून मिळालेली श्रीरामाची प्रासादिक उत्सवमूर्ती असते.

जळगाव : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानचा श्रीराम रथवहनोत्सव मंगळवारपासून सुरू होत असून, यावर्षी १० वहनांना ३० यजमानांच्या घरी पानसुपारी होणार आहे. ज्या ठिकाणी रथ जाऊ शकत नाही, त्या भागात वहन नेले जाते. वहनावर श्रीक्षेत्र अयोध्या येथील रामानुज सांप्रदायाचे स्वामी रामानंद यांच्याकडून मिळालेली श्रीरामाची प्रासादिक उत्सवमूर्ती असते. सोबत संत मुक्ताबाई, स्वामी नरसिंह सरस्वती महाराज (आळंदी) आणि कुंवरस्वामी महाराज (वाघोड) यांच्या पादुका असतात.

वहनोत्सवाचे १५१ वर्षे असून, मंगळवारी (दि.१४) त्याचा शुभारंभ होणार आहे. यामध्ये घोडा (अश्व), हत्ती (ऐरावत), वाघ, सिंह, सरस्वती, चंद्र, सूर्यनारायण, गरुडराज, मारुती, रासक्रीडा आदी १० वहने निघतील. दरवर्षी नवरात्रीपासून वहनांसाठी पानसुपारी (आमंत्रण) स्वीकारली जाते. एका वहनाला सरासरी दोन ते तीन पानसुपारी होतात. वहन जाण्याचा मार्ग, मंदिरापासूनचे अंतर आदी बाबी विचारात घेऊन मंगेश महाराज जोशी व रथोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील हे वहनाचे आमंत्रण निश्चित करत असतात. दरवर्षी सात ते आठ नवीन कुटुंबे अशी असतात की, ती प्रथमच वहनासाठी आमंत्रण देतात. यजमानांच्या घरी गेल्यावर वहनाची पूजा, भजन-भारुड, सोबत आलेल्या मंडळींचा सत्कार आदी कार्यक्रम होतात. काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी केली जाते.

श्रीरामाचे दोनच रथ, त्यापैकी एक जळगावचा...

देशात सर्वाधिक रथ बालाजीचे आहेत तर श्रीरामाचे दोनच रथ आहेत. जळगावचा श्रीराम रथ कार्तिक प्रबोधिनी एकादशीला निघतो. या तिथीला निघणारा हा रथ देशातील एकमेव आहे. रथाच्या आधीपासून (कार्तिक प्रतिपदा) वहनोत्सवाला सुरुवात होते. प्रत्येक दिवशीच्या वहनावर श्रीरामाची प्रासादिक उत्सवमूर्ती असते. सोबतच्या पालखीमध्ये संत मुक्ताबाई, स्वामी नरसिंह सरस्वती महाराज (आळंदी) आणि कुंवरस्वामी महाराज (वाघोड) यांच्या पादुका असतात. श्रीरामाची उत्सवमूर्ती संत अप्पा महाराजांना वयाच्या १५ व्या वर्षी शके १७८२ मध्ये आशीर्वाद रूपात प्राप्त झाली आहे, अशी माहिती श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती मंगेश महाराज जोशी यांनी दिली.

तिथीचा क्षय झाल्याने एक वहन कमी

यंदा षष्ठी व सप्तमी एकत्र आल्याने तिथीचा क्षय झाला आहे. त्यामुळे षष्ठीला निघणारे शेषनागाचे वहन नसेल. तिथीक्षयामुळे वहनांची संख्या कमी होते, त्याचप्रमाणे प्रतिपदा ते दशमीपर्यंत कोणत्याही तिथीची वृद्धीला झाली, तर वाढीव तिथीच्या दिवशी गजेंद्र मोक्षाचे वहन निघते. 

टॅग्स :Jalgaonजळगाव