शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जळगावकर घेतोय दिग्गज खेळाडूंची फिरकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 13:10 IST

आकाश नेवे  जळगाव : ला.ना. शाळेकडून खेळणारा विद्यार्थी ते मुंबईच्या रणजी संघाचा सदस्य आणि एकाच डावात पाच आणि संपूर्ण ...

आकाश नेवे जळगाव : ला.ना. शाळेकडून खेळणारा विद्यार्थी ते मुंबईच्या रणजी संघाचा सदस्य आणि एकाच डावात पाच आणि संपूर्ण सामन्यात ९ गडी बाद करणारा शशांक अत्तरदे याची आता स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. मुंबईच्या संघातून खेळताना त्याने युसुफ पठाण आणि दीपक हुड्डा या अनुभवी खेळाडूंना बाद केले आहे.जैन स्पोर्टस् अकॅडमीचा खेळाडू असलेल्या शशांक अत्तरदे हा मुंबईच्या टाईम्स शिल्ड स्पर्धेत जैन इरिगेशनच्या कार्पोरेट संघाकडून खेळायचा. त्यानंतर त्याने मुंबईच्या ए डिव्हिजन क्रिकेट सामन्यात व्हिक्टरी क्लबकडून खेळायला सुरुवात केली. बॉलिंग आॅल राऊंडर असलेल्या शशांक याने काही काळातच आपल्या खेळाने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडकर्त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्याने उजव्या हाताचा आॅफ स्पिनर असलेल्या शशांक याच्या गोलंदाजीतील अचुकता आणि भेदकता यामुळे त्याला मुंबईच्या संघात स्थान मिळाले. त्याने तीन डिसेंबर २०१९ ला मुंबईकडून रणजी संघात पदार्पण केले. त्या आधी तो विजय हजारे चषकात मुंबईकडून गोवा आणि झारखंड विरोधातील सामन्यात खेळला होता. मुंबईकडून रणजीत बडोदा संघाविरुद्ध खेळताना त्याने दोन्ही डावात प्रत्येकी दोन बळी घेतले. त्यामुळे सहाजिकच त्याला पुढच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.विशेष सामनामुंबईकडून रणजीत बडोदा संघाविरुद्धचा सामना शशांक अत्तरदे याच्यासाठी विशेष ठरला. या सामन्यात मुंबईने कर्नाटकला पराभूत केले असले तरी एकट्या शशांकने मुंबईकडून खिंड लढवली. त्याने पहिल्या डावात पाच बळी घेतले. त्यात अभिमन्यु मिथून आणि श्रेयस गोपाल यांचाही समावेश होता. बडोद्याविरोधात खेळताना त्याने दीपक हुड्डा आणि युसुफ पठाण यांचे बळी घेण्याची कामगिरी केली होती.ला.ना. सार्वजनिक विद्यालयाकडून खेळताना सुरूवातीच्या काळात त्याला क्रीडा शिक्षक दीपक आर्डे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतरच्या काळात जैन स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये अविनाश आवारे, संदीप दहाड, मुश्ताक अली यांनी त्याच्या खेळाला पैलु पाडले. तो जळगाव जिल्हा १६ वर्षाआतील आणि १९ वर्षाआतील संघाचा कर्णधार देखील राहिला आहे.शशांक अत्तरदे याने आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये बाहेती महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले आहे. आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धांमध्ये तो कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कर्णधार देखील होता.क्रिकेट खेळताना नेहमीच कुटुंबाने पाठिंबा दिला. स्पर्धांमुळे बऱ्याचदा शाळेला दांडी मारावी लागत असे, मात्र त्यावेळी आई आणि बाबांनी खेळाला प्रोत्साहन दिले. रणजीतील निवडीबद्दल असे सांगावासे वाटते की, मी मेहनत घेत होतो. मात्र निवडीचे कळाल्यानंतर स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले. मुंबईच्या रणजी संघाकडून खेळणे हे एक स्वप्न होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव