शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

जळगावकर घेतोय दिग्गज खेळाडूंची फिरकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 13:10 IST

आकाश नेवे  जळगाव : ला.ना. शाळेकडून खेळणारा विद्यार्थी ते मुंबईच्या रणजी संघाचा सदस्य आणि एकाच डावात पाच आणि संपूर्ण ...

आकाश नेवे जळगाव : ला.ना. शाळेकडून खेळणारा विद्यार्थी ते मुंबईच्या रणजी संघाचा सदस्य आणि एकाच डावात पाच आणि संपूर्ण सामन्यात ९ गडी बाद करणारा शशांक अत्तरदे याची आता स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. मुंबईच्या संघातून खेळताना त्याने युसुफ पठाण आणि दीपक हुड्डा या अनुभवी खेळाडूंना बाद केले आहे.जैन स्पोर्टस् अकॅडमीचा खेळाडू असलेल्या शशांक अत्तरदे हा मुंबईच्या टाईम्स शिल्ड स्पर्धेत जैन इरिगेशनच्या कार्पोरेट संघाकडून खेळायचा. त्यानंतर त्याने मुंबईच्या ए डिव्हिजन क्रिकेट सामन्यात व्हिक्टरी क्लबकडून खेळायला सुरुवात केली. बॉलिंग आॅल राऊंडर असलेल्या शशांक याने काही काळातच आपल्या खेळाने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडकर्त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्याने उजव्या हाताचा आॅफ स्पिनर असलेल्या शशांक याच्या गोलंदाजीतील अचुकता आणि भेदकता यामुळे त्याला मुंबईच्या संघात स्थान मिळाले. त्याने तीन डिसेंबर २०१९ ला मुंबईकडून रणजी संघात पदार्पण केले. त्या आधी तो विजय हजारे चषकात मुंबईकडून गोवा आणि झारखंड विरोधातील सामन्यात खेळला होता. मुंबईकडून रणजीत बडोदा संघाविरुद्ध खेळताना त्याने दोन्ही डावात प्रत्येकी दोन बळी घेतले. त्यामुळे सहाजिकच त्याला पुढच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.विशेष सामनामुंबईकडून रणजीत बडोदा संघाविरुद्धचा सामना शशांक अत्तरदे याच्यासाठी विशेष ठरला. या सामन्यात मुंबईने कर्नाटकला पराभूत केले असले तरी एकट्या शशांकने मुंबईकडून खिंड लढवली. त्याने पहिल्या डावात पाच बळी घेतले. त्यात अभिमन्यु मिथून आणि श्रेयस गोपाल यांचाही समावेश होता. बडोद्याविरोधात खेळताना त्याने दीपक हुड्डा आणि युसुफ पठाण यांचे बळी घेण्याची कामगिरी केली होती.ला.ना. सार्वजनिक विद्यालयाकडून खेळताना सुरूवातीच्या काळात त्याला क्रीडा शिक्षक दीपक आर्डे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतरच्या काळात जैन स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये अविनाश आवारे, संदीप दहाड, मुश्ताक अली यांनी त्याच्या खेळाला पैलु पाडले. तो जळगाव जिल्हा १६ वर्षाआतील आणि १९ वर्षाआतील संघाचा कर्णधार देखील राहिला आहे.शशांक अत्तरदे याने आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये बाहेती महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले आहे. आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धांमध्ये तो कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कर्णधार देखील होता.क्रिकेट खेळताना नेहमीच कुटुंबाने पाठिंबा दिला. स्पर्धांमुळे बऱ्याचदा शाळेला दांडी मारावी लागत असे, मात्र त्यावेळी आई आणि बाबांनी खेळाला प्रोत्साहन दिले. रणजीतील निवडीबद्दल असे सांगावासे वाटते की, मी मेहनत घेत होतो. मात्र निवडीचे कळाल्यानंतर स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले. मुंबईच्या रणजी संघाकडून खेळणे हे एक स्वप्न होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव