शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

जळगाव जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची शक्यता धूसूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:36 IST

मंत्रिमंडळ विस्तार विलंब भाजपच्या पथ्यावर

जळगाव : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची ३ रोजी निवड होत आहे. यासाठी राज्याप्रमाणेच महाआघाडीचा प्रयोग केला जाण्याची शक्यता आहे. असे असले तरी आकड्याचे गणित पाहता महाआघाडीची शक्यता धूसूर असल्याचे म्हटले जात आहे.दरम्यान, काँग्रेसचे निरीक्षक माजी आमदार अनिल आहेर (नांदगाव, नाशिक) हे गुरुवारी सायंकाळी जळगावात येत आहेत. त्यांच्या उपस्थिीत पदाधिकाऱ्यांची चर्चा होणार आहे. यानंतर पुढील नियोजन केले जाणार असल्याची माहिती मिळाली.राजकीय खेळी पण..जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या़ मात्र, निवडीचा कार्यक्रम स्थगित होणे व पुन्हा मुदतवाढ मिळणे हे सत्ताधाऱ्यांच्या पथ्थ्यावर आहे़ यामुळे इच्छुकांचा हिरमोड होऊन राजकीय खेळ्या मंदावल्या आहे़ आता बदल अशक्य या भूमिकेतून सदस्यही राजकीय गणितांपेक्षा मंजूरीच्या कामांच्या वर्कआॅर्डर काढण्याच्या धावपळीत असल्याचे चित्र आहे़राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडील प्रत्येकी एक सदस्य अपात्र आहेत. त्यामुळे सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांना बहुमतासाठी ३३ ही संख्या गाठता येणे शक्य नाही, अशी स्थिती आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने महाविकास आघाडीची आशा धूसर तर भाजप एक हाती बहुमत मिळवू शकते, अशी स्थिती आहे. २ सदस्य अपात्र झाल्याने ६७ ची संख्या ६५ झाली आहे. त्यामुळे बहुमतासाठी ३३ सदस्य हवे आहेत. ही संख्या भाजपाजवळ आहे, तरीही काँग्रेसला सोबत घेऊन ते एक पद देतील. अध्यक्षपदासाठी पक्ष पातळीवरून कोणते नाव येते यावर बरेच काही अवलंबून आहे. पल्लवी सावकारे यांच्या नावासाठी बरेच सदस्य आग्रही आहेत. मधू काटे हे उपाध्यक्ष पदासाठी आग्रही आहेत. त्यांना संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे, काँग्रेसला महाविकास आघाडी होणार नाही हे गणित माहीत असल्याने ते कमी कष्टाने मिळणारे एक सभापतीपद सोडतील असे वाटत नाही, ते भाजपसोबतच राहतील असा अंदाज आहे, एकनाथराव खडसे यांना मानणारा गट फुटणे आता जवळपास अशक्यच वाटते कारण त्यांची भूमिका अस्पष्ट आहे. शिवाय केवळ आठच दिवस हाती असल्याने काही मोठा राजकीय भूकंप होण्याची स्थिती नाही,संख्यांचे गणितच जमत नसल्याने महाविकास आघाडीतील पक्षांची पक्की मानसिकता असल्याने पुढाकार कोणी घेणार नाही व भाजप अगदी सहज अध्यक्ष निवडीची परीक्षा पास होईल, अशी शक्यता आहे. शिवाय भाजपमध्येही काही आलबेल आहे , असे नाही. अंतर्गत मतभेद समोर येऊ शकतात, अशी बोलले जात आहे.संख्या जुळण्यासासाठी दोन्ही काँग्रेसला करावी लागणार कसरतजर पालकमंत्र्यांची नियुक्ती आधी झाली असती तर गेली अधिक फरक पडला असता. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराला होणारा विलंब हा भाजपच्या पथ्यावर पडेल, आता तीनही पक्षांच्या आमदारांची ही खरी कसोटी असेल. त्यांनी आता काही केलं नाही तर सदस्यांमध्ये नाराजी पसरेल, अशी एक शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्ताराला होणारा विलंब भाजपच्या पथ्यवार पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव