शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
2
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
3
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
4
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
5
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
7
'वंदे मातरम्'चे काँग्रेसने तुकडे केले, तुष्टीकरणाचे राजकारण सुरूच : मोदी
8
इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल
9
गोव्यात कसिनोंवरील नाइट ‘जीवघेणा जुगार’; आग लागल्यास माराव्या लागतील मांडवी नदीत उड्या
10
विश्वस्त संस्थांतील विश्वस्त व्यवस्थांचे नियमन करणार, विधेयक सादर, चांगल्या कारभारासाठी तरतूद
11
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
12
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
13
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
14
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
15
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
16
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
17
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
18
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
19
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
20
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव - औरंगाबाद मार्गाचे अखेर डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:00 IST

इच्छादेवी चौक ते अजिंठा चौफुली दरम्यान दुरवस्था कायम

जळगाव : बिकट अवस्था होऊन वांरवार अपघात होणाऱ्या औरंगाबाद रस्त्याचे मंगळवारी डांबरीकरण करण्यात आले. यात अजिंठा चौफुलीपासून बाजार समितीपर्यंत हे डांबरीकरण करण्यात आले. दरम्यान, ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे कायम असून त्यामुळे वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत.शहरातून जाणाºया औरंगाबाद रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यामुळे बाहेर गावाहून येणाºया वाहनधारकांसह औद्योगिक वसाहतीमध्ये जाणाºया उद्योजक, अधिकारी, कामगार यांचेही दररोज हाल होतात. विशेष म्हणजे संध्याकाळी तर वाहनांची गर्दी वाढून वेगही कमी होतो. त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे या रस्त्याच्या दुरस्थीची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती. अखेर त्यास मुहूर्त लागून मंगळवारी अजिंठा चौफुलीपासून ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत एकेरी मार्गाने डांबरीकरण करण्यात आले. या सोबतच त्यापुढील भागात सोमवारी एका बाजूने डांबरीकरण झाल्यानंतर दुसºया बाजूचेही मंगळवारी डांबरीकरण करण्यात आले.इच्छादेवी चौक ते अजिंठा चौफुली दरम्यान हाल कायमनागपूर-मुंबई या राष्टÑीय महामार्गावरील जळगाव शहरातून जाणाºया रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यातच ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. या विरोधात चार दिवसांपापूर्वी शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे ‘नही’च्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दुरूस्तीची मागणी करण्यात आली होती.मात्र या रस्त्याची दुरवस्था कायम आहे. अधिकारी अजून किती अपघातांची प्रतीक्षा करीत आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव