शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Jalgaon: पुढारी दोन प्रकारचे, खरे आणि खोटे बोलणारे! भालचंद्र नेमाडे यांचं विधान

By सुनील पाटील | Updated: January 17, 2024 00:11 IST

Jalgaon News: समाजात दोन प्रकारचे पुढारी असतात, एक खरे बोलणारे आणि दुसरे खोटे बोलणारे. लेखकदेखील पुढारीच असून, तो खरे बोलणारा आहे. असे स्पष्ट मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले.

- सुनील पाटीलजळगाव - समाजात दोन प्रकारचे पुढारी असतात, एक खरे बोलणारे आणि दुसरे खोटे बोलणारे. लेखकदेखील पुढारीच असून, तो खरे बोलणारा आहे. लेखकांनी आपण जसे आहोत तसेच वागलं पाहिजे, व्यक्त झाले पाहिजे. तुमच्यासारखं दुसरं कोणीच नसतो. लपवले तर पुढारी किंवा समूहाचा नायक होऊ शकत नाही, असे स्पष्ट मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले.

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट यांच्यावतीने मंगळवारी जैन हिल्स येथे साहित्य-कला पुरस्कार २०२३ चे वितरण करण्यात आले. कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री सतीश आळेकर (पुणे), सर्वोत्कृष्ट लेखिका कवयित्री बहिणाबाई पुरस्कार सुमती लांडे (श्रीरामपूर), सर्वोत्कृष्ट कवी बालकवी ठोमरे पुरस्कार अशोक कोतवाल (जळगाव) व सर्वोत्कृष्ट गद्य लेखन ना.धों.महानोर पुरस्कार सीताराम सावंत (इटकी, ता.सांगोला, जि.सातारा) यांना प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व एक लाखाचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते. आळेकर यांना दोन लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला. डॉ.भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याच्या व्यासपीठावर जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, दलिचंद जैन, ज्योती जैन, नीशा जैन व पुरस्कारार्थी होते.

एकांतात सार्वजनिक शोधले तर विरोध करण्याचे सामर्थ्यप्रत्येक लेखकाजवळ नवीन साहित्य असले पाहिजे. काहींना कथा काय अन् कादंबरी काय, सुरुवात कशी करावी अन् शेवट कसा करावा हेदेखील कळत नाही. आपल्याजवळ असं असावे की त्यातून तुमचं व्यक्तिमत्त्व घडवू शकले तरच तुम्ही पुढे जाल. सार्वजनिक एकांत महत्त्वाचे मूल्य आहे. एकांतात सार्वजनिक शोधले पाहिजे. त्यात नक्कीच मार्ग सापडतो. विरोध करण्याचे सामर्थ्य येते. साहित्यिकांनी न दिसणारे सत्य शोधले पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष भेटी आवश्यक असतात. रामायणही वेगवेगळे असल्याचे डॉ.नेमाडे म्हणाले.

लिखाणात लोकशाही टिकावीपुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. आजचा पुरस्कार बळ देणारा आहे. लोकशाही कशी टिकेल यासाठी दबाव निर्माण करणारे लिखाण असावे, असे मत सीताराम सावंत यांनी व्यक्त केले तर पद्मश्री सतीश आळेकर यांनी आज समाजातील परिस्थिती पाहिली तर जग वांझोटे असल्याचा भास होतो. १९९७ पासून ना.धों.महानोर यांच्याशी परिचय आहे. ज्या चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिली त्याच चित्रपटाचे आपण कथा लिहिल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव