शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: पुढारी दोन प्रकारचे, खरे आणि खोटे बोलणारे! भालचंद्र नेमाडे यांचं विधान

By सुनील पाटील | Updated: January 17, 2024 00:11 IST

Jalgaon News: समाजात दोन प्रकारचे पुढारी असतात, एक खरे बोलणारे आणि दुसरे खोटे बोलणारे. लेखकदेखील पुढारीच असून, तो खरे बोलणारा आहे. असे स्पष्ट मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले.

- सुनील पाटीलजळगाव - समाजात दोन प्रकारचे पुढारी असतात, एक खरे बोलणारे आणि दुसरे खोटे बोलणारे. लेखकदेखील पुढारीच असून, तो खरे बोलणारा आहे. लेखकांनी आपण जसे आहोत तसेच वागलं पाहिजे, व्यक्त झाले पाहिजे. तुमच्यासारखं दुसरं कोणीच नसतो. लपवले तर पुढारी किंवा समूहाचा नायक होऊ शकत नाही, असे स्पष्ट मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले.

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट यांच्यावतीने मंगळवारी जैन हिल्स येथे साहित्य-कला पुरस्कार २०२३ चे वितरण करण्यात आले. कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री सतीश आळेकर (पुणे), सर्वोत्कृष्ट लेखिका कवयित्री बहिणाबाई पुरस्कार सुमती लांडे (श्रीरामपूर), सर्वोत्कृष्ट कवी बालकवी ठोमरे पुरस्कार अशोक कोतवाल (जळगाव) व सर्वोत्कृष्ट गद्य लेखन ना.धों.महानोर पुरस्कार सीताराम सावंत (इटकी, ता.सांगोला, जि.सातारा) यांना प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व एक लाखाचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते. आळेकर यांना दोन लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला. डॉ.भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याच्या व्यासपीठावर जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, दलिचंद जैन, ज्योती जैन, नीशा जैन व पुरस्कारार्थी होते.

एकांतात सार्वजनिक शोधले तर विरोध करण्याचे सामर्थ्यप्रत्येक लेखकाजवळ नवीन साहित्य असले पाहिजे. काहींना कथा काय अन् कादंबरी काय, सुरुवात कशी करावी अन् शेवट कसा करावा हेदेखील कळत नाही. आपल्याजवळ असं असावे की त्यातून तुमचं व्यक्तिमत्त्व घडवू शकले तरच तुम्ही पुढे जाल. सार्वजनिक एकांत महत्त्वाचे मूल्य आहे. एकांतात सार्वजनिक शोधले पाहिजे. त्यात नक्कीच मार्ग सापडतो. विरोध करण्याचे सामर्थ्य येते. साहित्यिकांनी न दिसणारे सत्य शोधले पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष भेटी आवश्यक असतात. रामायणही वेगवेगळे असल्याचे डॉ.नेमाडे म्हणाले.

लिखाणात लोकशाही टिकावीपुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. आजचा पुरस्कार बळ देणारा आहे. लोकशाही कशी टिकेल यासाठी दबाव निर्माण करणारे लिखाण असावे, असे मत सीताराम सावंत यांनी व्यक्त केले तर पद्मश्री सतीश आळेकर यांनी आज समाजातील परिस्थिती पाहिली तर जग वांझोटे असल्याचा भास होतो. १९९७ पासून ना.धों.महानोर यांच्याशी परिचय आहे. ज्या चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिली त्याच चित्रपटाचे आपण कथा लिहिल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव