शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

जळगावला डाळ उत्पादनात ७५ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:39 IST

निर्यात ठप्प : मजूर नसल्याने उत्पादनावर परिणाम; कच्च्या मालाचीही जाणवते टंचाई

विजयकुमार सैतवाल ।लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : लॉकडाउनच्या काळात कृषी क्षेत्राशी निगडित उद्योग, कारखाने सुरू असले तरी यातील दालमिल उद्योगाच्या उत्पादनावर परिणाम होऊन डाळींचे उत्पादन ७५ टक्के घटले आहे. हमाल, मजुरांची संख्या कमी झाल्याने उत्पादनात घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सोबतच डाळीची निर्यातदेखील १५ दिवसांपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे डाळ उद्योगावर मोठा परिणाम झाला असून कच्चा मालही मिळणे अवघड होत आहे.कोरोनाने जागतिक बाजारपेठेला चांगलेच वेढले आहे. भारतातून होणारी डाळींची निर्यातदेखील सध्या थांबली आहे. देशाच्या एकूण डाळींच्या उत्पादनात जळगावचा मोठा वाटा आहे. सध्यादेखील जळगावात ६० ते ६५ दालमिल असून, त्यामधून तयार झालेल्या डाळी येथून निर्यात होतात.दालमिलचे उत्पादन २५ टक्क्यांवरलॉकडाउनच्या काळात सर्व उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश असले तरी यातून कृषी क्षेत्राशी निगडीत उद्योग, व्यवसाय सुरू ठेवण्याला सूट आहे. असे असले तरी दालमिलवर लॉकडाउनचा मोठा परिणाम झाला आहे. दालमिल सुरू ठेवल्या तरी या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची संख्या कमी असल्याने तसेच माल चढ-उतार करण्यासाठी लागणारे हमाल बांधवदेखील नसल्याने दालमिलचे उत्पादन घटले आहे. साधारण १५० ते २०० टन डाळ दररोज तयार होते. सध्या मात्र डाळींच्या उत्पादनात ७५ टक्के घट झाली आहे.जळगावातील दालमिलमध्ये जळगावसह आजूबाजूच्या जिल्ह्यांतून तसेच मराठवाडा व विदर्भातून कच्चा माल येत असतो. सध्या जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत, मात्र कृषी मालाची वाहतूक करण्यास सूट असली तरी वाहनधारक येण्यास तयार नाहीत. जेवढा कच्चा माल येतो तो उतरविण्यासाठीदेखील मजूर नसल्याने कच्च्या मालाची चणचण भासत आहे. जळगावातून दररोज अमेरिका, कॅनडा, युरोप, आॅस्ट्रेलिया यासह वेगवेगळ्या देशात निर्यात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून विविध देशांमधील मालाच्या आयात-निर्यातीवर परिणाम होऊ लागला. काही दिवसांपासून तर डाळींची निर्यात पूर्णपणे थांबली आहे.डाळींची निर्यात थांबली असली तरी सध्या जेवढे उत्पादन होते त्याची जळगावसह औरंगाबाद, नगर, पुणे जिल्ह्यातच वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे कच्च्या मालाची चणचण असली व डाळींचे उत्पादन घटले असले तरी डाळींचे भाव स्थिर आहेत.दालमिलचे उत्पादन २५ टक्क्यांवर आले आहे. त्यात कच्च्या मालाची चणचण असून १५ दिवसांपासून डाळीची निर्यातदेखील थांबली आहे.- प्रेम कोगटा, अध्यक्ष,जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.