शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
5
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
6
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
7
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
8
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
9
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
10
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
11
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
12
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
13
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
14
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
15
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
16
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
17
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
18
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
19
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
20
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

जळगावला डाळ उत्पादनात ७५ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:39 IST

निर्यात ठप्प : मजूर नसल्याने उत्पादनावर परिणाम; कच्च्या मालाचीही जाणवते टंचाई

विजयकुमार सैतवाल ।लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : लॉकडाउनच्या काळात कृषी क्षेत्राशी निगडित उद्योग, कारखाने सुरू असले तरी यातील दालमिल उद्योगाच्या उत्पादनावर परिणाम होऊन डाळींचे उत्पादन ७५ टक्के घटले आहे. हमाल, मजुरांची संख्या कमी झाल्याने उत्पादनात घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सोबतच डाळीची निर्यातदेखील १५ दिवसांपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे डाळ उद्योगावर मोठा परिणाम झाला असून कच्चा मालही मिळणे अवघड होत आहे.कोरोनाने जागतिक बाजारपेठेला चांगलेच वेढले आहे. भारतातून होणारी डाळींची निर्यातदेखील सध्या थांबली आहे. देशाच्या एकूण डाळींच्या उत्पादनात जळगावचा मोठा वाटा आहे. सध्यादेखील जळगावात ६० ते ६५ दालमिल असून, त्यामधून तयार झालेल्या डाळी येथून निर्यात होतात.दालमिलचे उत्पादन २५ टक्क्यांवरलॉकडाउनच्या काळात सर्व उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश असले तरी यातून कृषी क्षेत्राशी निगडीत उद्योग, व्यवसाय सुरू ठेवण्याला सूट आहे. असे असले तरी दालमिलवर लॉकडाउनचा मोठा परिणाम झाला आहे. दालमिल सुरू ठेवल्या तरी या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची संख्या कमी असल्याने तसेच माल चढ-उतार करण्यासाठी लागणारे हमाल बांधवदेखील नसल्याने दालमिलचे उत्पादन घटले आहे. साधारण १५० ते २०० टन डाळ दररोज तयार होते. सध्या मात्र डाळींच्या उत्पादनात ७५ टक्के घट झाली आहे.जळगावातील दालमिलमध्ये जळगावसह आजूबाजूच्या जिल्ह्यांतून तसेच मराठवाडा व विदर्भातून कच्चा माल येत असतो. सध्या जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत, मात्र कृषी मालाची वाहतूक करण्यास सूट असली तरी वाहनधारक येण्यास तयार नाहीत. जेवढा कच्चा माल येतो तो उतरविण्यासाठीदेखील मजूर नसल्याने कच्च्या मालाची चणचण भासत आहे. जळगावातून दररोज अमेरिका, कॅनडा, युरोप, आॅस्ट्रेलिया यासह वेगवेगळ्या देशात निर्यात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून विविध देशांमधील मालाच्या आयात-निर्यातीवर परिणाम होऊ लागला. काही दिवसांपासून तर डाळींची निर्यात पूर्णपणे थांबली आहे.डाळींची निर्यात थांबली असली तरी सध्या जेवढे उत्पादन होते त्याची जळगावसह औरंगाबाद, नगर, पुणे जिल्ह्यातच वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे कच्च्या मालाची चणचण असली व डाळींचे उत्पादन घटले असले तरी डाळींचे भाव स्थिर आहेत.दालमिलचे उत्पादन २५ टक्क्यांवर आले आहे. त्यात कच्च्या मालाची चणचण असून १५ दिवसांपासून डाळीची निर्यातदेखील थांबली आहे.- प्रेम कोगटा, अध्यक्ष,जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.