शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस, बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 12:18 IST

पाण्याचे तळे साचल्याने कसरत

जळगाव : बुधवारी झालेल्या जोरदार पावसानंतर दुसºया दिवशीही, गुरुवारी दुपारी व संध्याकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे बळीराजादेखील सुखावला असून शेती कामाला वेग येणार असल्याचे चित्र आहे. सलग दुसºया दिवशी झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे उकाडादेखील कमी झाला.गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या पावसाने बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. त्यानंतर गुरुवारीदेखील चांगला पाऊस झाला. गुरुवारी सकाळी काही वेळ सूर्यदर्शन झाले. त्यानंतर ढगाळ वातावरण झाले व पुन्हा जोरदार पाऊस होईल, असे चित्र निर्माण झाले. मात्र सकाळी दहा वाजेपासून पुन्हा उन्हाचा चटका वाढला व उकाडाही असह्य झाला. मात्र दुपारी साडेतीन वाजता नभ दाटून आले व पावसाला सुरुवात झाली. त्या वेळी अवघ्या १५ ते २० मिनिटेच हा पाऊस झाला व पुन्हा उघडीप दिली. त्यानंतर मात्र संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. केवळ २० मिनिटे पडलेल्या या पावसाने मात्र मोठा दिलासा दिला. जोरदार पावसाने ठिकठिकाणी तळे साचले.जिल्हा क्रीडा संकूल, नवीपेठ, बी.जे. मार्केट परिसर, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान, जिल्हा रुग्णालयासमोर, बजरंग बोगदा इत्यादी भागात पाणी साचले. ऐन संध्याकाळी बाजारपेठेत आलेल्यांसह घरी परतणारे विद्यार्थी, नोकरदार हेदेखील पावसात सापडले. अनेकांनी दुकान, रुग्णालय परिसर व वाटेत कोठेतरी थांबून पावसापासून बचाव केला. तर अनेकांनी ओले होतच घरी जाण्याचा निर्णय घेतला व पावसाचाही आनंद लुटला.रिपरिपने उकाडा झाला कमीदोन दिवस जोरदार पाऊस झाला तरी जमिनीतील उष्णता बाहेर येऊ लागल्याने उकाडा कायम होता. संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसानंतर साडेसात वाजेपासून पुन्हा रिपरिप पावसाला सुरुवात झाली. ही रिपरिप रात्रीपर्यंत सुरुच होती. या रिपरिपने मात्र वातावरणातील उकाडा कमी होण्यास मदत मिळाली व शहरवासीयांनाही दिलासा मिळाला.बळीराजाला दिलासापावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला दोन दिवस झालेल्या या जोरदार पावसाने दिलासा मिळाला आहे. चांगल्या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र या पावसाने पेरणीला वेग येणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव