शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

पंचनाम्यात विहीरच बदलली, विरोधकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 06:22 IST

विहीरीत पोहले, एवढ्याशा शुल्लक कारणावरून वाकडी (ता. जामनेर) येथील मातंग समाजातील दोन अल्पवयीन मुलांची नग्न धिंड काढण्यात आल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पंचनामा करताना पोलिसांनी घटनेतील विहिरीच बदलविल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

जळगाव  - विहीरीत पोहले, एवढ्याशा शुल्लक कारणावरून वाकडी (ता. जामनेर) येथील मातंग समाजातील दोन अल्पवयीन मुलांची नग्न धिंड काढण्यात आल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पंचनामा करताना पोलिसांनी घटनेतील विहिरीच बदलविल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.विहीरीत पोहल्याच्या कारणावरुन संबंधित विहिरीचा मालक ईश्वर जोशी व नोकर प्रल्हाद लोहार यांनी मातंग समाजातील दोन अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण करत त्यांची गावातून नग्न धिंड काढली. रविवारी घडलेल्या या आमानुष घटनेचा व्हिडिओ गुरुवारी सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची वाच्यता फुटली. या घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.पुरोगामी महाराष्टÑात घडलेल्या या घटनेबद्दल अनेकांनी संताप व्यक्त करत सरकारला धारेवर धरले. तक्रार मागे घ्यावी म्हणून या घटनेतील पीडितांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. या प्रकरणाची सुनावणी जलद न्यायालयात होणे आवश्यक असून त्यामुळे जनतेत योग्य संदेश जाईल, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.दरम्यान, शुक्रवारी अनेक संघटनांचे पदाधिकारी वाकडी गावाला भेट देऊन वस्तूस्थिती जाणून घेतली. तपास यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांकडून दबाव येत असून पंचनाम्यात पोलिसांनी घटनेतील विहिरीच बदलविल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलाआहे.सत्तार व ग्रामस्थांमध्ये वादघटनेची माहिती जाणून घेण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे एक पथक शुक्रवारी वाकडी येथे आले होते. या घटनेला राजकीय स्वरुप दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे काही वेळ सत्तार व गावकºयांमध्ये वाद- विवाद झाला. यानंतर आमदार सत्तार यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची भेट घेऊन, घटनेचा तपास निष्पक्षपणे करावा, अशी मागणी केली. यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री व जामनेर मतदार संघाचे आमदार गिरीश महाजन यांनीही या गावाला भेट देऊन विहिरीची पाहणी केली.प्रसारमाध्यमांवर रोष : वाकडी येथे कोणताही जातीय संघर्ष, तणाव नसतांना प्रसार माध्यमांनी अतिरंजीत वृत्त दिल्याचा आरोप वाकडीच्या ग्रामस्थांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर केला. त्यावेळी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व ग्रामस्थांमध्ये काही क्षण वाद झाला.वाकडीत घडलेली घटना दुर्देवी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पोलिसांनी गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई केली असून, कुणाचीही गय केली जाणार नाही; मात्र या घटनेचे कुणी राजकारण करू नये. वाकडी गावात सर्व जाती-धर्माचे लोकसंख्याने राहतात. शांततेचा भंग होईल, असा प्रयत्न कुणी करू नये.-गिरीश महाजन, जलसंपदा मंत्रीगोरगरीब, दलित, मागासवर्गीयांवर दबावाचे राजकारण करून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. वाकडीच्या घटनेत पीडितांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही.- अब्दुल सत्तार, आमदार, सिल्लोड

टॅग्स :newsबातम्याJalgaonजळगाव