शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

जळगाव : मनातील इच्छा पूर्ण करणारा ‘नवसाचा गणपती’

By अमित महाबळ | Updated: September 5, 2022 16:38 IST

शहरात अनेक गणपती मंदिरे प्रसिद्ध असून, प्रत्येकाची स्थापनेमागील गोष्ट वेगळी आहे.

जळगाव : शहरात अनेक गणपती मंदिरे प्रसिद्ध असून, प्रत्येकाची स्थापनेमागील गोष्ट वेगळी आहे. गणेश कॉलनी परिसरात असलेल्या कृषी कॉलनीतील ‘नवसाचा गणपती’ हा मनातील इच्छा, आकांक्षा पूर्ण करणारा गणपती म्हणून भाविकांमध्ये ओळखला जातो. या मंदिरातील गणेश मूर्ती शोभना गंधे यांनी दिली आहे.

नवसाचा मंदिर गणपती ट्रस्टच्या अध्यक्षा सरस्वती पाटील यांनी मंदिराविषयी माहिती दिली. पिंप्राळा येथे गंधे यांचे गणपती मंदिर होते. काही कारणाने त्यांना मंदिराचे स्थलांतर करावे लागणार होते. त्यामुळे गणपतीची मूर्ती कोणाला द्यायची याच्या शोधात गंधे कुटुंबीय होते. काही जणांनी देणगी देऊन ही मूर्ती घेऊन जाण्याची इच्छा दर्शवली होती. मात्र, मूर्ती जळगावबाहेर देऊ नये, असा दृष्टांत शोभना गंधे यांना झाला. त्यानंतर त्यांनी नांदेडकर यांच्याशी संपर्क साधला. नांदेडकर यांनी कृषी कॉलनीचे चेअरमन टी. एस. पाटील यांना मंदिरासाठी गणेश मूर्ती स्वीकारण्यास इच्छुक आहात का, अशी विचारणा केली. त्यांनी संमती दिल्यावर शोभना गंधे यांनी १९९६ मध्ये पाटील यांच्याकडे मूर्ती सुपूर्द केली. मात्र, पुढील दोन वर्षे काही कारणाने मंदिर होऊ शकले नाही. १९९८ मध्ये मंदिर उभे राहून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्रसन्न व चैतन्यमय वातावरणात हे मंदिर आहे. नवसाला पावणारा, मनातील इच्छा, आकांशा पूर्ण करणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे.

मूर्ती उचलणे झाले होते अशक्यमूर्ती आणल्यावर ती शेडमध्ये ठेवली होती. तेथून मंदिरातील चौथऱ्यावर ठेवायची होती. त्यासाठी आठ ते दहा जण आले होते. परंतु त्यांना ही मूर्ती उचलणे शक्य झाले नाही. टी. एस. पाटील यांनी मूर्तीकार राणा यांच्याकडील कारागीरांना बोलावून आणले. पाच जणांनी मिळून ही मूर्ती उचलली, अशी आठवण सरस्वती पाटील यांनी सांगितली. मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पाच ते सहा वर्षांपासून गणेशोत्सवात मंदिराच्या प्रांगणात गणपती बसवला जातो. त्यामध्ये तरुणांचा सक्रीय सहभाग असतो, असेही त्यांनी सांगितले.

गंधे यांनी या अटीवर दिली मूर्तीस्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय गंधे यांना गणपतीचा दृष्टांत झाला होता. त्यांनी पिंप्राळा येथील जागेत गणपतीचे मंदिर स्थापन केले. या ठिकाणी दर अंगारकी व चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी व्हायची. कालांतराने काही कारणाने मंदिराच्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा शोभना दत्तात्रय गंधे यांनी मंदिरातील मूर्ती कृषी कॉलनीतील रहिवाशांना मंदिरासाठी म्हणून दिली. गंधे यांच्या गणपती मंदिराचे नाव ‘नवसाचा गणपती’ असे होते. तेच कायम ठेवावे, अशी अट टाकण्यात आली होती. त्यामुळे हे नाव पुढेही कायम राहिले, अशी माहिती योगेश्वर गंधे यांनी दिली.

टॅग्स :ganpatiगणपतीJalgaonजळगाव