शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जळगाव मनपा निवडणूक : आयाराम- गयारामांचा फरक नाही - सुरेशदादा जैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 12:55 IST

जनता योग्य निर्णय घेईल

ठळक मुद्देसर्व जागांसाठी सक्षम उमेदवार तयार

जळगाव : राजकारणात आयाराम गयाराम हा प्रकार सुरुच असतो. याचा मात्र आम्हाला काही फरक नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी महापौर ललित कोल्हे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत दिली. आमच्याजवळ सर्व जागांसाठी प्रबळ उमेदवार असून जनताच योग्य निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.मनसेच्या सर्व १२ नगरसेवकांसह महापौर ललित कोल्हे यांनी १० दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच गत मनपा निवडणुकीनंतर खान्देश विकास आघाडीस पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत सुरेशदादांसोबत राहून निवडणूक लढविण्याचे त्यांनी जाहीर केले आणि लगेचच आपला निर्णय फिरवून भाजपात रविवारी सायंकाळी आपल्या ५ नगरसेवकांसह प्रवेश केला.या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी रात्री त्यांची भेट घेतली असता ‘लोकमत’ शी बोलताना त्यांनी सांगितले की, राजकारणात अशा घडामोडी घडतच असतात. याबाबत आपल्याला आश्चर्य नाही. आम्ही सक्षम असून जनताच काय ते ठरवेल. आमच्या सोबत जनता नेहमी राहीली आहे व आताही राहील याचा विश्वास असल्याचेही सुरेशदादांनी सांगितले.रात्री उशिरा पर्यंत कार्यकर्त्यांची गर्दीसुरेशदादा जैन यांच्या शिवाजी नगरातील निवासस्थानी इच्छुक उमेदवार तसेच कार्यकर्ते यांची प्रचंड गर्दी होती. राजकीय घडामोडीची या ठिकाणीही चर्चा होती. मात्र जे आता सोबत नाही, ते गेल्या निवडणुकीतही विरोधात होते. त्यामुळे काहीच फरक पडणार नाही, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.युती झाली तर ठिकयुती होणार की नाही, याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र आम्हाला अजूनही अधिकृत काही निरोप नाही. त्यामुळे याबाबत आताच अधिक बोलणे योग्य ठरणार नाही. परंतु युती झाली तरी ठिक व नाही झाली तरी काही चिंता नाही. आमच्याजवळ सर्व ७५ जागांवर चांगले उमेदवार आहेत, असेही सुरेशदादा जैन यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव