शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

जळगाव मनपा निवडणूक : भाजपाच्या भूलथापांना जनता अजिबात बळी पडणार नाही - गुलाबराव देवकर यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 12:32 IST

केंद्रात व राज्यात सत्ता असताना शहराचा विकास का केला नाही?

ठळक मुद्देमाघार घेण्यासाठी दबावही आणला राष्टÑवादीच्या २४-२५ उमेदवारांची स्थिती चांगली

जळगाव : गेल्या पाच वर्षांपासून मनपावर शिवसेनेची (खाविआची) तर चार वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असतानाही हे नेते शहराच्या गंभीर समस्या मार्गी लावू शकले नाहीत. आता निवडणुकीत मात्र जलसंपदामंत्री गिरीश महाजन सत्ता द्या, २०० कोटींचा निधी आणतो म्हणून आश्वासन देत आहेत. मात्र जनता या भूलथापांना बळी पडणार नाही, असे मत राष्टÑवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ‘लोकमत’ने जाणून घेतली असता ते बोलत होते. राष्टÑवादीची भूमिका त्यांच्याच शब्दात...प्रश ्न: प्रचारासाठी अवघे सात दिवस शिल्लक आहेत, आपले प्रचाराचे नियोजन कसे आहे?देवकर : गेल्या चार-पाच दिवसांपासून रॅली काढल्या. १९ प्रभागांपैकी १२-१३ प्रभागांमध्ये रॅली झाल्या आहेत. त्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाऊस सुरू आहे. शहरात गल्लीबोळात चिखल झाला आहे. नागरिक स्वत:हून आमच्याकडे सत्ताधाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत. आम्ही लोकांना आवाहन करतोय. निवडून दिले तर शहराची परिस्थिती बदलू, विकास करू. उद्यान, भुयारी गटारी, आदी कामे तातडीने मार्गी लावू. आम्हालाही एक संधी देऊन बघा, असे आवाहन करीत आहोत.प्रश ्न: मतदारांपुढे नक्की कोणता मुद्दा तुम्ही मांडत आहात?देवकर : मी पालकमंत्री असताना ३० कोटींचे बंदिस्त नाट्यगृह शहराची गरज लक्षात घेऊन मंजूर केले. लांडोरखोरी उद्यानाच्या कामाला मंजुरी दिली. मनपाच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वाघूर धरणातून डाऊन स्कीमसाठी निधी उपलब्ध करून दिला. अक्सानगरात ५५ लाखांचे रस्ते, गटारींचे काम केले. मनपात सत्ता नसताना हे केले. तर याउलट भाजपाची राज्यात व केंद्रातही सत्ता असताना ते महामार्गाच्या समांतर रस्त्यांचा विषय मार्गी लावू शकलेले नाही. जलसंपदामंत्री महाजन मात्र आम्हाला मनपाची सत्ता द्या, मग शहर विकासासाठी २०० कोटींचा निधी आणू, असे आश्वासन देत आहेत. आताही केंद्रात व राज्यात त्यांचीच सत्ता आहे. मग का शहराचा विकास केला नाही? जनतेने विश्वास कसा ठेवायचा?प्रश्न : प्रचाराला थोडाच अवघी उरला आहे. नेत्यांच्या सभा कधी होणार?देवकर : विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील तसेच महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ दोन दिवसांच्या जिल्हा दौºयावर आले आहेत. चित्रा वाघ दोन दिवस शहरात फिरून कॉर्नर बैठका घेणार आहेत. वळसे पाटील यांच्या उपस्थितीत पदाधिकाºयांची बैठक होऊन १ तारखेपर्यंतच्या कामाचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, छगन भुजबळ, नवाब मलिक आदींच्या सभांची मागणीही केली असून त्या सभाही घेतल्या जातील.प्रश्न : काँग्रेस व सपाशी आघाडीसाठी अनेक बैठका झाल्या. मग आघाडीत बिघाडी का झाली?देवकर : मनपा निवडणुकीत समविचारी पक्षांना सोबत घेऊन आम्ही आघाडी करण्याचा प्रयत्न केला. निवडून येण्याच्या क्षमतेवर उमेदवारी देऊ, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. काही प्रभागात आघाडी झाली, मात्र काही ठिकाणी एकमत न झाल्याने मैत्रीपूर्ण लढत होत आहे.प्रश्न : तुम्ही एकटेच प्रचाराची धुरा सांभाळताना दिसत आहात?देवकर : मी नगरसेवक व नगराध्यक्ष म्हणूनही काम केलेले असल्याने शहराचा कानाकोपरा माहिती आहे. पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणणे आपली जबाबदारी समजून मी काम करीत आहे. त्यात किती यश मिळेल ते भविष्यात कळेल. मात्र कोण सोबत येते, येत नाही? त्याची काळजी करीत नाही.राष्टÑवादीच्या २४-२५ उमेदवारांची स्थिती चांगलीपक्षाच्या २४-२५ उमेदवारांची स्थिती चांगली आहे. आता नेत्यांच्या सभाही घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे वातावरण आणखी अनुकूल होईल. त्यानंतरच किती जागा येतील? याचा अचूक अंदाज सांगता येईल.गतवेळेपेक्षा राष्टÑवादीचे उमेदवार कमी का?सत्ता असली की फरक पडतो. तेव्हा आमची सत्ता असल्याने वातावरण चांगले होते. निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवारही होते. मात्र भाजपाने आमचे अनेक चांगले उमेदवार प्रलोभने दाखवून पळविले. इतकेच नव्हे तर राष्टÑवादीकडून अर्ज भरलेल्या उमेदवारांवर माघार घेण्यासाठी दबावही आणला गेला.तुमच्या ७ नगरसेवकांनी पक्षांतर केले, रोखले का नाही?राष्टÑवादीच्या विद्यमान नगरसेवकांनी वळसे पाटील यांच्यासमोर शपथ घेऊन पक्षासोबतच राहण्याचे लेखी आश्वासनही दिले होते. मात्र नंतर ते बदलले.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव