शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपाच्या बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या धुरामुळे आव्हाणे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 18:27 IST

मनपाच्या आव्हाणे शिवारातील बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पात अनेकदा कचरा पेट घेण्याचे प्रकार घडतात. या पेट घेणाºया कच-याचा धुरामुळे शनिवारी रात्री आव्हाणे येथे सुरु असलेल्या हरिनाम किर्तन सोहळ्यादरम्यान भाविकांना त्रास झाल्याने किर्तन निर्धारीत वेळेच्या अर्धातास आधी थांबवावे लागले.

ठळक मुद्देभाविकांना त्रास झाल्याने अर्धा तास आधी थांबविले किर्तन शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचेही आरोग्य धोक्यातगेल्या तीन वर्षांपासूनची समस्या

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.१८ -मनपाच्या आव्हाणे शिवारातील बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पात अनेकदा कचरा पेट घेण्याचे प्रकार घडतात. या पेट घेणाºया कच-याचा धुरामुळे शनिवारी रात्री आव्हाणे येथे सुरु असलेल्या हरिनाम किर्तन सोहळ्यादरम्यान भाविकांना त्रास झाल्याने किर्तन निर्धारीत वेळेच्या अर्धातास आधी थांबवावे लागले.

बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पातून निघणाºया धुरामुळे शहरातील खोटेनगर, निमखेडी, प्रा.चंदु अण्णा नगरभागातील रहिवाश्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील आव्हाणे, भोकणी, आव्हाणी या भागातील नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घनकचरात पेटलेल्या कचºयामुळे आव्हाणे परिसरात प्रचंड धुराचे लोड पसरले होते. यामुळे नागरिकांना घराचे दरवाजे बंद करून घ्यावे लागले.

श्वसनाचा त्रास व डोळ्यांमध्ये जळजळआव्हाणे परिसरात दररोज हा कचºयामुळे धुर पसरतो. मात्र, शनिवारी या धुराचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे सायंकाळी घराबाहेर बसलेल्या नागरिकांना श्वास घेताना देखील त्रास होत होता. तसेच अनेकांच्या डोळ्यांमध्ये जळजळ देखील झाली. लहानमुलांना या धुरामुळे अधिक त्रास होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी घरामध्येच थांबणे पसंत केले.

गेल्या तीन वर्षांपासूनची समस्याघनपकचरा प्रकल्पामुळे आव्हाणेकरांना गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे. नियमित पसरणाºया धुरामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. हजारो टन कचरा कुठल्याही प्रक्रियेविना पडून असल्यामुळे प्रचंड दुर्गंधी देखील आव्हाणे परिसरात पसरलेली असते. याबाबत नागरिकांकडूनच बुधवारी मनपा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन दिले जाणार आहे.  

किर्तनात बसणे देखील कठीण झालेगेल्या पाच दिवसांपासून आव्हाणे येथे अखंड हरिनाम कि र्तन सप्ताह सुरु आहे. शनिवारी रात्री किर्तन सुरु असताना वातावरण प्रचंड धुर पसरला असल्यामुळे किर्तनात बसलेल्या भाविकांना श्वास घेताना देखील त्रास होत होता. तसेच किर्तनकार व इतर भजनीमंडळातील सदस्यांना बोलताना त्रास होत होता. त्यामुळे दररोज ११.१५ वाजता संपणारा किर्तनाचा कार्यक्रम १०.४५ वाजताच थांबवून घ्यावा लागला. मात्र, मनपा प्रशासनाविरोधात गावातील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून, या प्रकल्पात कचरा टाकणे थांबविण्याची मागणी केली आहे.