शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जळगाव मनपाच्या बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या धुरामुळे आव्हाणे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 18:27 IST

मनपाच्या आव्हाणे शिवारातील बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पात अनेकदा कचरा पेट घेण्याचे प्रकार घडतात. या पेट घेणाºया कच-याचा धुरामुळे शनिवारी रात्री आव्हाणे येथे सुरु असलेल्या हरिनाम किर्तन सोहळ्यादरम्यान भाविकांना त्रास झाल्याने किर्तन निर्धारीत वेळेच्या अर्धातास आधी थांबवावे लागले.

ठळक मुद्देभाविकांना त्रास झाल्याने अर्धा तास आधी थांबविले किर्तन शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचेही आरोग्य धोक्यातगेल्या तीन वर्षांपासूनची समस्या

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.१८ -मनपाच्या आव्हाणे शिवारातील बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पात अनेकदा कचरा पेट घेण्याचे प्रकार घडतात. या पेट घेणाºया कच-याचा धुरामुळे शनिवारी रात्री आव्हाणे येथे सुरु असलेल्या हरिनाम किर्तन सोहळ्यादरम्यान भाविकांना त्रास झाल्याने किर्तन निर्धारीत वेळेच्या अर्धातास आधी थांबवावे लागले.

बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पातून निघणाºया धुरामुळे शहरातील खोटेनगर, निमखेडी, प्रा.चंदु अण्णा नगरभागातील रहिवाश्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील आव्हाणे, भोकणी, आव्हाणी या भागातील नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घनकचरात पेटलेल्या कचºयामुळे आव्हाणे परिसरात प्रचंड धुराचे लोड पसरले होते. यामुळे नागरिकांना घराचे दरवाजे बंद करून घ्यावे लागले.

श्वसनाचा त्रास व डोळ्यांमध्ये जळजळआव्हाणे परिसरात दररोज हा कचºयामुळे धुर पसरतो. मात्र, शनिवारी या धुराचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे सायंकाळी घराबाहेर बसलेल्या नागरिकांना श्वास घेताना देखील त्रास होत होता. तसेच अनेकांच्या डोळ्यांमध्ये जळजळ देखील झाली. लहानमुलांना या धुरामुळे अधिक त्रास होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी घरामध्येच थांबणे पसंत केले.

गेल्या तीन वर्षांपासूनची समस्याघनपकचरा प्रकल्पामुळे आव्हाणेकरांना गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे. नियमित पसरणाºया धुरामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. हजारो टन कचरा कुठल्याही प्रक्रियेविना पडून असल्यामुळे प्रचंड दुर्गंधी देखील आव्हाणे परिसरात पसरलेली असते. याबाबत नागरिकांकडूनच बुधवारी मनपा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन दिले जाणार आहे.  

किर्तनात बसणे देखील कठीण झालेगेल्या पाच दिवसांपासून आव्हाणे येथे अखंड हरिनाम कि र्तन सप्ताह सुरु आहे. शनिवारी रात्री किर्तन सुरु असताना वातावरण प्रचंड धुर पसरला असल्यामुळे किर्तनात बसलेल्या भाविकांना श्वास घेताना देखील त्रास होत होता. तसेच किर्तनकार व इतर भजनीमंडळातील सदस्यांना बोलताना त्रास होत होता. त्यामुळे दररोज ११.१५ वाजता संपणारा किर्तनाचा कार्यक्रम १०.४५ वाजताच थांबवून घ्यावा लागला. मात्र, मनपा प्रशासनाविरोधात गावातील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून, या प्रकल्पात कचरा टाकणे थांबविण्याची मागणी केली आहे.