शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपाच्या बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या धुरामुळे आव्हाणे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 18:27 IST

मनपाच्या आव्हाणे शिवारातील बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पात अनेकदा कचरा पेट घेण्याचे प्रकार घडतात. या पेट घेणाºया कच-याचा धुरामुळे शनिवारी रात्री आव्हाणे येथे सुरु असलेल्या हरिनाम किर्तन सोहळ्यादरम्यान भाविकांना त्रास झाल्याने किर्तन निर्धारीत वेळेच्या अर्धातास आधी थांबवावे लागले.

ठळक मुद्देभाविकांना त्रास झाल्याने अर्धा तास आधी थांबविले किर्तन शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचेही आरोग्य धोक्यातगेल्या तीन वर्षांपासूनची समस्या

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.१८ -मनपाच्या आव्हाणे शिवारातील बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पात अनेकदा कचरा पेट घेण्याचे प्रकार घडतात. या पेट घेणाºया कच-याचा धुरामुळे शनिवारी रात्री आव्हाणे येथे सुरु असलेल्या हरिनाम किर्तन सोहळ्यादरम्यान भाविकांना त्रास झाल्याने किर्तन निर्धारीत वेळेच्या अर्धातास आधी थांबवावे लागले.

बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पातून निघणाºया धुरामुळे शहरातील खोटेनगर, निमखेडी, प्रा.चंदु अण्णा नगरभागातील रहिवाश्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील आव्हाणे, भोकणी, आव्हाणी या भागातील नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घनकचरात पेटलेल्या कचºयामुळे आव्हाणे परिसरात प्रचंड धुराचे लोड पसरले होते. यामुळे नागरिकांना घराचे दरवाजे बंद करून घ्यावे लागले.

श्वसनाचा त्रास व डोळ्यांमध्ये जळजळआव्हाणे परिसरात दररोज हा कचºयामुळे धुर पसरतो. मात्र, शनिवारी या धुराचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे सायंकाळी घराबाहेर बसलेल्या नागरिकांना श्वास घेताना देखील त्रास होत होता. तसेच अनेकांच्या डोळ्यांमध्ये जळजळ देखील झाली. लहानमुलांना या धुरामुळे अधिक त्रास होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी घरामध्येच थांबणे पसंत केले.

गेल्या तीन वर्षांपासूनची समस्याघनपकचरा प्रकल्पामुळे आव्हाणेकरांना गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे. नियमित पसरणाºया धुरामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. हजारो टन कचरा कुठल्याही प्रक्रियेविना पडून असल्यामुळे प्रचंड दुर्गंधी देखील आव्हाणे परिसरात पसरलेली असते. याबाबत नागरिकांकडूनच बुधवारी मनपा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन दिले जाणार आहे.  

किर्तनात बसणे देखील कठीण झालेगेल्या पाच दिवसांपासून आव्हाणे येथे अखंड हरिनाम कि र्तन सप्ताह सुरु आहे. शनिवारी रात्री किर्तन सुरु असताना वातावरण प्रचंड धुर पसरला असल्यामुळे किर्तनात बसलेल्या भाविकांना श्वास घेताना देखील त्रास होत होता. तसेच किर्तनकार व इतर भजनीमंडळातील सदस्यांना बोलताना त्रास होत होता. त्यामुळे दररोज ११.१५ वाजता संपणारा किर्तनाचा कार्यक्रम १०.४५ वाजताच थांबवून घ्यावा लागला. मात्र, मनपा प्रशासनाविरोधात गावातील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून, या प्रकल्पात कचरा टाकणे थांबविण्याची मागणी केली आहे.