शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

जळगाव मनपात भाजपच्या ऐतिहासिक विजयाची वर्षपूर्ती : वर्षभरानंतरही आव्हाने कायम ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:11 IST

१०० कोटींचा निधी मंजूर ; काही प्रश्न ‘जैसे थे’

जळगाव : गेल्यावर्षी ३ आॅगस्ट रोजीच मनपा निवडणुकीच्या निकालात भाजपचे पहिल्यांदाच ५७ नगरसेवक विजयी झाले होते. भाजपाने मनपात मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाची आज वर्षपूर्ती होत आहे. अजूनही बरीच आव्हाने सत्ताधाऱ्यांसमोर कायम आहेत. ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता असल्याने वर्षभरात शासनाकडून मनपाला १०० कोटी रुपयांचा मंजूर झाला असला तरी त्यातून कामांना मात्र सुरुवात झालेली नाही.वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीच्या प्रचारात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वर्षभरात जळगाव शहराचा चेहरा-मोहरा बदलविण्याचा दावा केला होता. शहराचा चेहरा-मोहरा जरी बदलला नसला तरी मनपाच्या घनकचरा प्रकल्पाच्या ३० कोटींच्या डीपीआरमधून ९ कोटींतून ८५ घंटागाड्या आणून शहरासाठी तब्बल ७५ कोटी रुपयांचा सफाईचा मक्ता देण्यात आला आहे. अजून मक्तेदाराकडून कामाला सुरुवात झालेली नाही. भविष्यात शहराच्या साफ सफाईच्या कामांमध्ये नक्कीच फरक झालेला दिसून येईल. तसेच मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षापुर्वी दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून कामांना सुरुवात झाली आहे. याच निधीतून साडे सात कोटी रुपयांचा एलईडीची योजना मात्र सपशेल फेल ठरली आहे. संबधित कंपनीने योग्य काम न केल्याने सत्ताधाऱ्यांवर हा मक्ता रद्द करण्याची नामुष्की ओढावलेली दिसून आली.खड्डयांचा प्रश्न बिकटशहरातील रस्त्यांची अक्षरश वाट लागली आहे. अमृत योजनेमुळे रस्ते पुर्णपणे खोदण्यात आले असून मनपाकडून केवळ थातुर-मातूर दुरुस्ती करण्यात आली.गेल्या महिन्यात शहरातील उद्योजक अनिल बोरोले यांना या खड्डयांमुळे झालेल्या अपघातात जीव गमवावा लागला होता. खड्डयांचा समस्येबाबत नागरिकांमध्ये सत्ताधारी व मनपा प्रशासनाबद्दल प्रचंड चीड व्यक्त केली जात आहे.१०० कोटींचा निधी जाहीर कामांची मात्र प्रतीक्षागिरीश महाजन म्हणाले होते की, मनपात सत्ता आल्यानंतर शहरासाठी शासनाकडून २०० कोटींचा निधी आणू, त्यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे १६ आॅगस्ट २०१८ रोजी नगरोथ्थान अंतर्गत मनपासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. मात्र, आता हा निधी मंजूर होवून देखील वर्ष झाले. वर्षभरात या निधीतून एकाही कामाला सुरुवात झाली नाही. यातील ४२ कोटी रुपयांचा कामांना शासनाने अंतिम मंजुरी दिली असून, या कामांसाठी लवकरच निविदा काढून कामांना सुरुवात करण्याचा मानस महापौरांनी व्यक्त केला आहे. तसेच या निधीतून ५८ कोटी रुपयांच्या निधीतील कामांना अजून प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे.गाळे, हुडको प्रश्नांची गुंतागुंत कायमजळगावच्या विकासाला अडसर असलेले हुडको कर्जाचा व मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न अजूनही कायम आहे. विशेष म्हणजे ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता असल्याने हे दोन्ही प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. मात्र, दोन्ही ही प्रश्न वर्षभरात अधिकच किचकट होवून गेले आहेत. गाळेधारकांसाठी अधिनियमात बदल करण्याचे आश्वासन सत्ताधारी भाजपाने दिले होते. मात्र, वर्षभरात अधिनियमात जरी बदल केला तरी या बदलाचा जळगावच्या गाळेधारकांसाठी कोणताही फायदा झालेला नसून, आता गाळेधारकांनी सत्ताधाºयांना हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानसभेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तर हुडको प्रकरणी देखील जानेवारी २०१९ मध्ये डिआरएटी मध्ये मनपाची याचिका फेटाळल्यानंतर २६ जून मनपाचे बॅँक खाते सील करण्यात आले होते. मुंबई उच्चन्यायालयाच्या आदेशानंतर दोन बॅँकाचे खाते उघडण्यात आले असले तरी मात्र अ‍ॅक्सीस बॅॅँकेचे खाते महिनाभरापासूनच बंदच आहे.वर्षभरात नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मनापासून प्रयत्न करण्यात आले असून, सफाईचा मक्ता देण्यात आल्याने जळगाव शहर एक स्वच्छ शहर म्हणून घडविण्याचा मानस आहे. शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, त्यातून लवकरच कामांना सुरुवात होणार आहे. पुढील वर्षभरात शहरात आणखीन बराच बदल झालेला पहायला मिळेल.-सीमा भोळे, महापौरनागरिकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचा प्रयत्न आहे. वर्षभरात मोठा निधी शासनाकडून मनपासाठी आणण्यात यश मिळाले आहे. हुडको कर्जफेडीचा प्रश्न लवकरच सुटणार असून, गाळ्यांचाही प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: सकारात्मक आहेत. त्यामुळे वर्षभरात नागरिकांना तक्रारीची संधी राहणार नाही.-सुरेश भोळे, आमदार

टॅग्स :Jalgaonजळगाव