शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

जळगाव मनपात भाजपच्या ऐतिहासिक विजयाची वर्षपूर्ती : वर्षभरानंतरही आव्हाने कायम ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:11 IST

१०० कोटींचा निधी मंजूर ; काही प्रश्न ‘जैसे थे’

जळगाव : गेल्यावर्षी ३ आॅगस्ट रोजीच मनपा निवडणुकीच्या निकालात भाजपचे पहिल्यांदाच ५७ नगरसेवक विजयी झाले होते. भाजपाने मनपात मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाची आज वर्षपूर्ती होत आहे. अजूनही बरीच आव्हाने सत्ताधाऱ्यांसमोर कायम आहेत. ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता असल्याने वर्षभरात शासनाकडून मनपाला १०० कोटी रुपयांचा मंजूर झाला असला तरी त्यातून कामांना मात्र सुरुवात झालेली नाही.वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीच्या प्रचारात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वर्षभरात जळगाव शहराचा चेहरा-मोहरा बदलविण्याचा दावा केला होता. शहराचा चेहरा-मोहरा जरी बदलला नसला तरी मनपाच्या घनकचरा प्रकल्पाच्या ३० कोटींच्या डीपीआरमधून ९ कोटींतून ८५ घंटागाड्या आणून शहरासाठी तब्बल ७५ कोटी रुपयांचा सफाईचा मक्ता देण्यात आला आहे. अजून मक्तेदाराकडून कामाला सुरुवात झालेली नाही. भविष्यात शहराच्या साफ सफाईच्या कामांमध्ये नक्कीच फरक झालेला दिसून येईल. तसेच मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षापुर्वी दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून कामांना सुरुवात झाली आहे. याच निधीतून साडे सात कोटी रुपयांचा एलईडीची योजना मात्र सपशेल फेल ठरली आहे. संबधित कंपनीने योग्य काम न केल्याने सत्ताधाऱ्यांवर हा मक्ता रद्द करण्याची नामुष्की ओढावलेली दिसून आली.खड्डयांचा प्रश्न बिकटशहरातील रस्त्यांची अक्षरश वाट लागली आहे. अमृत योजनेमुळे रस्ते पुर्णपणे खोदण्यात आले असून मनपाकडून केवळ थातुर-मातूर दुरुस्ती करण्यात आली.गेल्या महिन्यात शहरातील उद्योजक अनिल बोरोले यांना या खड्डयांमुळे झालेल्या अपघातात जीव गमवावा लागला होता. खड्डयांचा समस्येबाबत नागरिकांमध्ये सत्ताधारी व मनपा प्रशासनाबद्दल प्रचंड चीड व्यक्त केली जात आहे.१०० कोटींचा निधी जाहीर कामांची मात्र प्रतीक्षागिरीश महाजन म्हणाले होते की, मनपात सत्ता आल्यानंतर शहरासाठी शासनाकडून २०० कोटींचा निधी आणू, त्यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे १६ आॅगस्ट २०१८ रोजी नगरोथ्थान अंतर्गत मनपासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. मात्र, आता हा निधी मंजूर होवून देखील वर्ष झाले. वर्षभरात या निधीतून एकाही कामाला सुरुवात झाली नाही. यातील ४२ कोटी रुपयांचा कामांना शासनाने अंतिम मंजुरी दिली असून, या कामांसाठी लवकरच निविदा काढून कामांना सुरुवात करण्याचा मानस महापौरांनी व्यक्त केला आहे. तसेच या निधीतून ५८ कोटी रुपयांच्या निधीतील कामांना अजून प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे.गाळे, हुडको प्रश्नांची गुंतागुंत कायमजळगावच्या विकासाला अडसर असलेले हुडको कर्जाचा व मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न अजूनही कायम आहे. विशेष म्हणजे ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता असल्याने हे दोन्ही प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. मात्र, दोन्ही ही प्रश्न वर्षभरात अधिकच किचकट होवून गेले आहेत. गाळेधारकांसाठी अधिनियमात बदल करण्याचे आश्वासन सत्ताधारी भाजपाने दिले होते. मात्र, वर्षभरात अधिनियमात जरी बदल केला तरी या बदलाचा जळगावच्या गाळेधारकांसाठी कोणताही फायदा झालेला नसून, आता गाळेधारकांनी सत्ताधाºयांना हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानसभेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तर हुडको प्रकरणी देखील जानेवारी २०१९ मध्ये डिआरएटी मध्ये मनपाची याचिका फेटाळल्यानंतर २६ जून मनपाचे बॅँक खाते सील करण्यात आले होते. मुंबई उच्चन्यायालयाच्या आदेशानंतर दोन बॅँकाचे खाते उघडण्यात आले असले तरी मात्र अ‍ॅक्सीस बॅॅँकेचे खाते महिनाभरापासूनच बंदच आहे.वर्षभरात नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मनापासून प्रयत्न करण्यात आले असून, सफाईचा मक्ता देण्यात आल्याने जळगाव शहर एक स्वच्छ शहर म्हणून घडविण्याचा मानस आहे. शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, त्यातून लवकरच कामांना सुरुवात होणार आहे. पुढील वर्षभरात शहरात आणखीन बराच बदल झालेला पहायला मिळेल.-सीमा भोळे, महापौरनागरिकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचा प्रयत्न आहे. वर्षभरात मोठा निधी शासनाकडून मनपासाठी आणण्यात यश मिळाले आहे. हुडको कर्जफेडीचा प्रश्न लवकरच सुटणार असून, गाळ्यांचाही प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: सकारात्मक आहेत. त्यामुळे वर्षभरात नागरिकांना तक्रारीची संधी राहणार नाही.-सुरेश भोळे, आमदार

टॅग्स :Jalgaonजळगाव