शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

जळगाव कृउबाची कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाविरोधात मंगळवारी विविध शेतकरी व राजकीय संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाविरोधात मंगळवारी विविध शेतकरी व राजकीय संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या बंदला समर्थन म्हणून मंगळवारी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व व्यवहार ठप्प होते. यामुळे बाजार समितीचे तब्बल तीन कोटींची उलाढाल मंगळवारी ठप्प राहिली, तर जळगाव तालुक्यातील आव्हाणे परिसरातील तिन्ही व जळगाव शहरातील दोन अशा पाचही सीसीआयच्या जिनिंग बंद ठेवण्यात आल्या. यामुळे हा बंद जरी शेतकरी हितासाठी पुकारण्यात आला असला तरी याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच बसल्याचे चित्र पहायला मिळाले.

कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने सोमवारीच भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे जाहीर केले होते. मात्र, मंगळवारी सकाळी ग्रामीण भागातील शेतकरी आपला माल घेऊन भाजीपाला मार्केटमध्ये आले होते. मात्र, लिलावच न झाल्याने शेतकरी आपला माल घेऊन परत फिरले. हीच स्थिती धान्य मार्केटमध्येदेखील पहायला मिळाली. याठिकाणीही अनेक शेतकरी आपला माल विक्रीसाठी घेऊन आले. नंतर त्यांनाही आपला माल घरी घेऊन जावा लागला. सध्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, बाजार समिती बंद असल्याने कांद्याची तब्बल ५० ते ७०० लाखांपर्यंतची उलाढाल ‘भारत बंद’मुळे ठप्प राहिली अशी माहिती बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांनी दिली.

सीसीआयचीही खरेदी बंद

कापसाची खरेदीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जळगाव तालुक्यातील आव्हाणे व जळगाव शहरातील मिळून पाच केंद्रांवरील कापूस खरेदीदेखील मंगळवारी बंद ठेवण्यात आली. यामुळे आपला माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मालासकट केंद्राबाहेर एक दिवस थांबावे लागणार आहे. दरम्यान, सीसीआय प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांनी माल खरेदी करण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, जिनर्सने माल खरेदी न करण्याची भूूमिका घेतल्याने ही केंद्र बंद ठेवण्यात आली.

शासकीय खरेदी केंद्र सुरू

भारत बंदमुळे बाजार समिती जरी बंद असली तरी मार्केटिंग फेडरेशनकडून सुरू असलेली मक्याची खरेदी सुरू होती. तसेच भरड धान्य खरेदीदेखील सुरु होती. यासह अनेक खासगी व्यापाऱ्यांनी भारत बंद असतानाही धान्य खरेदी सुरू ठेवल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला माल याठिकाणी विक्री केला. दरम्यान, भाजीपाला मार्केटचे लिलाव न झाल्याने भाजीपाला आणलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आपला माल जळगाव शहरातील विविध भागांत जाऊन विक्री केल्याचे दिसून आले. तसेच मार्केटबाहेरच अनेक शेतकऱ्यांनी माल विक्री केल्याचे आढळून आले.