शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जळगाव कृउबाची कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाविरोधात मंगळवारी विविध शेतकरी व राजकीय संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाविरोधात मंगळवारी विविध शेतकरी व राजकीय संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या बंदला समर्थन म्हणून मंगळवारी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व व्यवहार ठप्प होते. यामुळे बाजार समितीचे तब्बल तीन कोटींची उलाढाल मंगळवारी ठप्प राहिली, तर जळगाव तालुक्यातील आव्हाणे परिसरातील तिन्ही व जळगाव शहरातील दोन अशा पाचही सीसीआयच्या जिनिंग बंद ठेवण्यात आल्या. यामुळे हा बंद जरी शेतकरी हितासाठी पुकारण्यात आला असला तरी याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच बसल्याचे चित्र पहायला मिळाले.

कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने सोमवारीच भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे जाहीर केले होते. मात्र, मंगळवारी सकाळी ग्रामीण भागातील शेतकरी आपला माल घेऊन भाजीपाला मार्केटमध्ये आले होते. मात्र, लिलावच न झाल्याने शेतकरी आपला माल घेऊन परत फिरले. हीच स्थिती धान्य मार्केटमध्येदेखील पहायला मिळाली. याठिकाणीही अनेक शेतकरी आपला माल विक्रीसाठी घेऊन आले. नंतर त्यांनाही आपला माल घरी घेऊन जावा लागला. सध्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, बाजार समिती बंद असल्याने कांद्याची तब्बल ५० ते ७०० लाखांपर्यंतची उलाढाल ‘भारत बंद’मुळे ठप्प राहिली अशी माहिती बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांनी दिली.

सीसीआयचीही खरेदी बंद

कापसाची खरेदीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जळगाव तालुक्यातील आव्हाणे व जळगाव शहरातील मिळून पाच केंद्रांवरील कापूस खरेदीदेखील मंगळवारी बंद ठेवण्यात आली. यामुळे आपला माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मालासकट केंद्राबाहेर एक दिवस थांबावे लागणार आहे. दरम्यान, सीसीआय प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांनी माल खरेदी करण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, जिनर्सने माल खरेदी न करण्याची भूूमिका घेतल्याने ही केंद्र बंद ठेवण्यात आली.

शासकीय खरेदी केंद्र सुरू

भारत बंदमुळे बाजार समिती जरी बंद असली तरी मार्केटिंग फेडरेशनकडून सुरू असलेली मक्याची खरेदी सुरू होती. तसेच भरड धान्य खरेदीदेखील सुरु होती. यासह अनेक खासगी व्यापाऱ्यांनी भारत बंद असतानाही धान्य खरेदी सुरू ठेवल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला माल याठिकाणी विक्री केला. दरम्यान, भाजीपाला मार्केटचे लिलाव न झाल्याने भाजीपाला आणलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आपला माल जळगाव शहरातील विविध भागांत जाऊन विक्री केल्याचे दिसून आले. तसेच मार्केटबाहेरच अनेक शेतकऱ्यांनी माल विक्री केल्याचे आढळून आले.