शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

जळगाव कृउबाची कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाविरोधात मंगळवारी विविध शेतकरी व राजकीय संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाविरोधात मंगळवारी विविध शेतकरी व राजकीय संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या बंदला समर्थन म्हणून मंगळवारी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व व्यवहार ठप्प होते. यामुळे बाजार समितीचे तब्बल तीन कोटींची उलाढाल मंगळवारी ठप्प राहिली, तर जळगाव तालुक्यातील आव्हाणे परिसरातील तिन्ही व जळगाव शहरातील दोन अशा पाचही सीसीआयच्या जिनिंग बंद ठेवण्यात आल्या. यामुळे हा बंद जरी शेतकरी हितासाठी पुकारण्यात आला असला तरी याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच बसल्याचे चित्र पहायला मिळाले.

कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने सोमवारीच भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे जाहीर केले होते. मात्र, मंगळवारी सकाळी ग्रामीण भागातील शेतकरी आपला माल घेऊन भाजीपाला मार्केटमध्ये आले होते. मात्र, लिलावच न झाल्याने शेतकरी आपला माल घेऊन परत फिरले. हीच स्थिती धान्य मार्केटमध्येदेखील पहायला मिळाली. याठिकाणीही अनेक शेतकरी आपला माल विक्रीसाठी घेऊन आले. नंतर त्यांनाही आपला माल घरी घेऊन जावा लागला. सध्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, बाजार समिती बंद असल्याने कांद्याची तब्बल ५० ते ७०० लाखांपर्यंतची उलाढाल ‘भारत बंद’मुळे ठप्प राहिली अशी माहिती बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांनी दिली.

सीसीआयचीही खरेदी बंद

कापसाची खरेदीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जळगाव तालुक्यातील आव्हाणे व जळगाव शहरातील मिळून पाच केंद्रांवरील कापूस खरेदीदेखील मंगळवारी बंद ठेवण्यात आली. यामुळे आपला माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मालासकट केंद्राबाहेर एक दिवस थांबावे लागणार आहे. दरम्यान, सीसीआय प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांनी माल खरेदी करण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, जिनर्सने माल खरेदी न करण्याची भूूमिका घेतल्याने ही केंद्र बंद ठेवण्यात आली.

शासकीय खरेदी केंद्र सुरू

भारत बंदमुळे बाजार समिती जरी बंद असली तरी मार्केटिंग फेडरेशनकडून सुरू असलेली मक्याची खरेदी सुरू होती. तसेच भरड धान्य खरेदीदेखील सुरु होती. यासह अनेक खासगी व्यापाऱ्यांनी भारत बंद असतानाही धान्य खरेदी सुरू ठेवल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला माल याठिकाणी विक्री केला. दरम्यान, भाजीपाला मार्केटचे लिलाव न झाल्याने भाजीपाला आणलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आपला माल जळगाव शहरातील विविध भागांत जाऊन विक्री केल्याचे दिसून आले. तसेच मार्केटबाहेरच अनेक शेतकऱ्यांनी माल विक्री केल्याचे आढळून आले.