शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

जळगाव :नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 17:34 IST

: वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावेत.

कुंदन पाटील 

जळगाव : वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावेत. नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात शनिवारी त्यांना पाहणी केली. त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली.

नशीराबाद, बेळी, निमगांव, उमाळे, देव्हारी, चिंचोली परिसरात केळी, लिंबू, पपई आदि पिकांसोबतच झाडे उन्मळून पडली आहे. तसेच दोनशेवर घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. जिल्हाधिकारी अमन मित्तल,  जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, तहसीलदार नामदेव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे,  कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी राऊत, महावितरणचे आवटे, विस्तार अधिकारी पी. बी. अहिरे, स्थानिक लोकप्रतिनिधींसहग्रामसेवक, तलाठी, कृषि सहाय्यक यावेळी उपस्थित होते. 

बेळीला टॅंकरने पाणीपुरवठा

बेळी, निमगांव व नशिराबाद येथे वादळी वाऱ्यामुळे विद्युत पोल व तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुरुस्ती करून विद्युत पुरवठा सुरळीत करावा. तसेच विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत आवश्यकता भासल्यास गावकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी टॅकरने पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करण्याचे निर्देश दिले.  घरांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु झाले आहेत. घरकुलांच्या यादीतील नुकसानग्रस्त घरांना प्राधान्याने घरकुल मंजूर केले जाईल, असे जिल्हाधिकारी मित्तल यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ सुरु झाला आहे.बियाणे, खते व किटकनाशकांबाबत येणाऱ्या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली आहे.    या नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत संपर्क साधता येईल. त्यासाठी ८९८३८३९४६८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर व  ०२५७-२२३९०५४ कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे.

तक्रार निवारण कक्षात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे (८९८३८३९४६८), वरिष्ठ लिपीक संतोष भावसार (८९८३८३९४६८), कृषी सहाय्यक समाधान देवरे(८९८३८३९४६८) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.