शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात यंदा टंचाई आराखड्यात टँकर संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 11:52 IST

२१३ कोटींचा प्रस्ताव : २९१ गावांना ३५६ योजना प्रस्तावित

जळगाव : यंदा झालेल्या अतिवृष्टी व सरासरीपेक्षा दीडपट पावसामुळे पाणीपातळीत वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात टँकरच्या संख्येत घट होणार आहे. दरम्यान जि.प.ने २०१९-२० साठी २१२ कोटी ६८ लाखांचा प्राथमिक टंचाई आराखडा तयार केला आहे.दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हापरिषदेकडून संभाव्य टंचाईवरील उपाययोजनांचा आराखडा मागविला जातो. त्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूरी देऊन टंचाई विभागाच्या नियंत्रणाखाली या आराखड्याची अंमलबजावणी केली जात असते. यंदा पावसाळाच खूप लांबल्याने व निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे आराखड्याचे काम थोडे लांबणीवर पडले आहे.२९१ गावांचा ३५६ उपाययोजनांचा आराखडाजि.प.कडून संभाव्य पाणीटंचाई आरखडा तयार करण्यात येत असून तो अंतीम टप्प्यात आले. सुमारे २१२ कोटी ६८ लाखांचा हा टंचाई आराखडा असून त्यात २९१ गावांचा समावेश असून त्यात टंचाई निर्मुलनासाठी सुमारे ३५६ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असल्याचे समजते.टँकरच्या संख्येत होणार घटमागील वर्षी तीव्र पाणीटंचाई असल्याने जिल्ह्यात गत १५ वर्षातील तीव्र दुष्काळ होता. त्यामुळे तब्बल २२१ टँकर द्वारे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर पावसाळ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सरासरीच्या १४० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले, विहीरींना पाणी अजूनही कायम आहे. फेब्रुवारीपर्यंत त्यामुळे पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी शक्यता असल्याने यंदा टँकरच्या संख्येत कपात होण्याचा अंदाज आहे.चाºयाची मात्र टंचाई जाणवण्याची भिती... यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात चारा टंचाईची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. कृषी विभागाला मागील वर्षी डीपीडीसीतून ६० लाख रूपये चारा बियाणांसाठी दिले होते. त्यातून धरणांच्या आटलेल्या पाणीसाठ्यामुळे गाळाच्या जमिनीवर तसेच शेतकºयांनी शेतात चाºयाची लागवड केली होती. सुमारे २ हजार हेक्टरवर चारा लागवड केल्याने चाराटंचाईवर मात करता आली होती. त्यामुळे गुरूवारी झालेल्या ‘आत्मा’च्या बैठकीत यंदा नियोजनमधून १ लाख २० हजारांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मंजूर झाल्यास ४ हजार हेक्टरवर चारा लागवड शक्य होऊन चाराटंचाईच्या समस्येवर मात करता येईल.

टॅग्स :Jalgaonजळगाव