शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
3
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
4
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
5
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
6
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
7
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
8
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
9
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
10
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
11
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
12
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
13
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
14
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
15
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
16
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
17
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
18
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
19
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
20
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”

निम्मा पावसाळा उलटत आला तरी जळगाव जिल्ह्यात केवळ ३३ टक्केच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 01:17 IST

चोपडा तालुक्यात केवळ २६ टक्के पाऊस

जळगाव : पावसाळ््याची दोन महिने संपत आली तरी जिल्ह्यात अद्यापपर्यंत केवळ ३३ टक्केच पाऊस झाला असून चोपडा तालुक्यात तर सर्वात कमी म्हणजेच २६.६ टक्केच पाऊस झाल्याने या तालुक्यात चिंता वाढविली आहे. जामनेर तालुक्यात मात्र वरुणराजाने कृपा दृष्टी केली असून तेथे ४६.६ टक्के पाऊस झाला असून तालुक्याची वाटचाल पन्नाशीकडे सुरू आहे. दरम्यान, शुक्रवार व शनिवारी झालेल्या दमदार पावसाने बळीराजा सुखावला असून त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसाच्या झळा सोसत असताना यंदाही निम्म्याहून अधिक जून महिना संपला तरी पाऊस न आल्याने बळीराजा चिंतातूर झाला. त्यानंतर पावसाने हजेरी लावली खरी मात्र मध्यंतरी ओढ दिल्याने सर्वांच्या चिंता वाढल्या.पावसाच्या मोठ्या खंडामुळे निम्मा पावासाळा उलटला तरी पावसाने चाळीशीदेखील गाठलेली नाही. गेल्या वर्षी २७ जुलै रोजी ३८.८ टक्के पाऊस झालेला असताना यंदा याच दिवसापर्यंत ३३.२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी पावसाअभावी पाण्यासाठी जे हाल झाले व पिकांनाही जो फटका बसला त्यापेक्षा यंदा जास्त हाल होण्यासह पिकांनाही अधिक फटका बसतो की काय अशी चिंता बळीराजाला लागली आहे.जामनेर तालुक्यात सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात पावसाने चाळीशी गाठली नसताना जामनेर तालुक्यावर मात्र बळीराजाने कृपादृष्टी दाखविली आहे. २७ जुलै पर्यंत जामनेर तालुक्यात ४६.६ टक्के पाऊस झाला असून त्याखालोखाल एरंडोल तालुक्यात ४१.५ टक्के पाऊस झाला आहे. चोपडा तालुक्यात मात्र केवळ २६.६ टक्केच पाऊस झाला आहे.तालुकानिहाय झालेल्या पावसाची टक्केवारी (कंसात २७ रोजी झालेला पाऊस - मि.मी.मध्ये)जळगाव - २९.७ (३०.३), जामनेर ४६.६ (३२), एरंडोल ४१.५ (१९.५), धरणगाव ३२.८ (२४.९), भुसावळ ३१.९ (३५.३), यावल २७.१ (२६.०), रावेर २९.१ (२१.४), मुक्ताईनगर ३३.५ (२५.३), बोदवड ३१.९ (२०.३), पाचोरा ३९.९ (२३.६), चाळीसगाव ३१.४ (५.१), भडगाव २९.३ (१६.३), अमळनेर ३१.९ (१६.८), पारोळा ३४.२ (९.२), चोपडा २६.६ (३४.७), एकूण ३३.२ (३४०.५)तोंडापूर धरण १०० टक्के भरलेगेल्या २४ तासात तोंडापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढून धरण २७ रोजी सकाळी १०० टक्के भरले. सकाळी हे धरण ओसंडून वाहू लागले होते. गेल्या वर्षी २७ जुलै रोजी धरणात शून्य टक्के साठा होता. यांदा मात्र हे २७ रोजीच १०० टक्के भरल्याने परिसरातील गावांना दिलासा मिळाला आहे.इतर धरण साठ्यात फारसी वाढ नाहीदोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू असला तरी जिल्ह्यातील मोठ्या धरणांमध्ये फारसी वाढ झालेली नाही. यामध्ये गिरणा धरणात २६ रोजी ७.५२ टक्के पाणी साठा होता. तो २७ रोजीही तेवढाच होता. हतनूर धरणात २६ रोजी २२.४३ टक्के पाणीसाठी होता तो २७ रोजी २२.५५ टक्के झाला. वाघूर धरणात २६ रोजी २०.६० टक्के साठा होता तो २७ रोजी २०.९८ टक्के झाला. यामध्ये हतनूर धरण क्षेत्रात मध्यप्रदेशात मोठा पाऊस झाला असला तरी धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आल्याने पाणीसाठी वाढू शकला नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव