शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
3
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
4
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
5
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
6
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
7
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
8
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
9
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
10
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
11
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
12
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
13
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
14
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
15
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
16
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
17
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
18
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
19
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
20
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

निम्मा पावसाळा उलटत आला तरी जळगाव जिल्ह्यात केवळ ३३ टक्केच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 01:17 IST

चोपडा तालुक्यात केवळ २६ टक्के पाऊस

जळगाव : पावसाळ््याची दोन महिने संपत आली तरी जिल्ह्यात अद्यापपर्यंत केवळ ३३ टक्केच पाऊस झाला असून चोपडा तालुक्यात तर सर्वात कमी म्हणजेच २६.६ टक्केच पाऊस झाल्याने या तालुक्यात चिंता वाढविली आहे. जामनेर तालुक्यात मात्र वरुणराजाने कृपा दृष्टी केली असून तेथे ४६.६ टक्के पाऊस झाला असून तालुक्याची वाटचाल पन्नाशीकडे सुरू आहे. दरम्यान, शुक्रवार व शनिवारी झालेल्या दमदार पावसाने बळीराजा सुखावला असून त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसाच्या झळा सोसत असताना यंदाही निम्म्याहून अधिक जून महिना संपला तरी पाऊस न आल्याने बळीराजा चिंतातूर झाला. त्यानंतर पावसाने हजेरी लावली खरी मात्र मध्यंतरी ओढ दिल्याने सर्वांच्या चिंता वाढल्या.पावसाच्या मोठ्या खंडामुळे निम्मा पावासाळा उलटला तरी पावसाने चाळीशीदेखील गाठलेली नाही. गेल्या वर्षी २७ जुलै रोजी ३८.८ टक्के पाऊस झालेला असताना यंदा याच दिवसापर्यंत ३३.२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी पावसाअभावी पाण्यासाठी जे हाल झाले व पिकांनाही जो फटका बसला त्यापेक्षा यंदा जास्त हाल होण्यासह पिकांनाही अधिक फटका बसतो की काय अशी चिंता बळीराजाला लागली आहे.जामनेर तालुक्यात सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात पावसाने चाळीशी गाठली नसताना जामनेर तालुक्यावर मात्र बळीराजाने कृपादृष्टी दाखविली आहे. २७ जुलै पर्यंत जामनेर तालुक्यात ४६.६ टक्के पाऊस झाला असून त्याखालोखाल एरंडोल तालुक्यात ४१.५ टक्के पाऊस झाला आहे. चोपडा तालुक्यात मात्र केवळ २६.६ टक्केच पाऊस झाला आहे.तालुकानिहाय झालेल्या पावसाची टक्केवारी (कंसात २७ रोजी झालेला पाऊस - मि.मी.मध्ये)जळगाव - २९.७ (३०.३), जामनेर ४६.६ (३२), एरंडोल ४१.५ (१९.५), धरणगाव ३२.८ (२४.९), भुसावळ ३१.९ (३५.३), यावल २७.१ (२६.०), रावेर २९.१ (२१.४), मुक्ताईनगर ३३.५ (२५.३), बोदवड ३१.९ (२०.३), पाचोरा ३९.९ (२३.६), चाळीसगाव ३१.४ (५.१), भडगाव २९.३ (१६.३), अमळनेर ३१.९ (१६.८), पारोळा ३४.२ (९.२), चोपडा २६.६ (३४.७), एकूण ३३.२ (३४०.५)तोंडापूर धरण १०० टक्के भरलेगेल्या २४ तासात तोंडापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढून धरण २७ रोजी सकाळी १०० टक्के भरले. सकाळी हे धरण ओसंडून वाहू लागले होते. गेल्या वर्षी २७ जुलै रोजी धरणात शून्य टक्के साठा होता. यांदा मात्र हे २७ रोजीच १०० टक्के भरल्याने परिसरातील गावांना दिलासा मिळाला आहे.इतर धरण साठ्यात फारसी वाढ नाहीदोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू असला तरी जिल्ह्यातील मोठ्या धरणांमध्ये फारसी वाढ झालेली नाही. यामध्ये गिरणा धरणात २६ रोजी ७.५२ टक्के पाणी साठा होता. तो २७ रोजीही तेवढाच होता. हतनूर धरणात २६ रोजी २२.४३ टक्के पाणीसाठी होता तो २७ रोजी २२.५५ टक्के झाला. वाघूर धरणात २६ रोजी २०.६० टक्के साठा होता तो २७ रोजी २०.९८ टक्के झाला. यामध्ये हतनूर धरण क्षेत्रात मध्यप्रदेशात मोठा पाऊस झाला असला तरी धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आल्याने पाणीसाठी वाढू शकला नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव