शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात पावसाने पाच तालुक्यात ओलांडली ५० टक्क्यांची सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:14 IST

अद्यापही ७ मध्यम प्रकल्पात शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा

जळगाव : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत पावसाने तब्बल २३ दिवस उशीराने हजेरी लावूनही पावसाने सलग व जोरदार हजेरी लावत मागील वर्षीची आजपर्यंतची सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत असले तरीही अद्यापही जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के उपयुक्त जलसाठा आहे. या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.५ तालुक्यांनी ओलांडली सरासरीची पन्नाशीमागील वर्षी आजच्या तारखेला जिल्ह्यात सरासरी ३८.९ मिमी पाऊस झाला होता. मात्र यंदा पावसाचे आगमन उशीरा होऊनही जोरदार हजेरी लावल्याने पावसाने ही सरासरी ओलांडली असून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ४७.४ टक्के पाऊस झाला आहे. जामनेर तालुक्यात सर्वाधिक ६५.४ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत केवळ ३० टक्केच पाऊस या तालुक्यात झाला होता. तर एरंडोल ५३.४ टक्के, भुसावळ ५१.२, मुक्ताईनगर ५७.०० टक्के तर पाचोरा तालुक्यात ५०.२ टक्के पाऊस झाला आहे. उर्वरीत सर्व तालुक्यात ३९ टक्क्यांच्यावर पाऊस झाला आहे. जळगाव तालुक्यात ४२.९ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी केवळ ३६.६ टक्के पाऊस झाला होता.एकाच दिवसांत २५ मिमी पाऊसजळगाव तालुक्यात शनिवारी दिवसभर व रात्रीतून २४.९ मिमी पाऊस झाला. तर धरणगावला ३१.१ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी १० मिमी पाऊस एका दिवसांत झाला. मात्र चाळीसगाव, बोदवड तालुका मात्र काल कोरडा होता.मध्यम प्रकल्पांची अवस्था बिकटमात्र दुसरीकडे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांची अवस्था मात्र बिकट आहे. १३ मध्यम प्रकल्पांपैकी ७ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. त्यात बहुळा मध्ये ०.५० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तर अग्नावती, हिवरा, अंजनी, भोकरबारी, बोरी, मन्याड या धरणांमध्ये आजही शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. उर्वरीत प्रकल्पांमध्ये सरासरी १८.७९ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर ९६ लघु प्रकल्पांमध्ये ७.९७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.पावसामुळे पिकांना फायदागेल्या आठवडाभरापासून सलग सुरू असलेल्या पावसामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना फायदाच होणार आहे. मात्र शेतात पाणी तुंबून राहणार नाही, याची काळजी मात्र शेतकऱ्यांनी घ्यावी. अन्यथा पिक पिवळे पडण्याची भिती आहे. त्यामुळे पाणी तुंबणार नाही, याची काळजी घेण्याची गरज असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कपाशी लागवडीला जेमतेम महिना-दीड महिना झाला आहे. तसेच उडीद-मूगही वाढीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे त्यावरील कीड पावसामुळे वाहून जाणार असल्याचे सांगितले.मोठ्या प्रकल्पांमध्ये वाढतोय पाणीसाठाहतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांवर जिल्ह्यातील अनेक शहरांसह गावांचाही पाणीपुरवठा अवलंबून आहे. या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा मे अखेरीस शून्य टक्क्यांवर पोहोचला होता. तर वाघूरमध्ये जेमतेम ९ टक्के पाणीसाठा उरला होता. मात्र या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे या मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे हतनूरमध्यये १९.१४ टक्के, गिरणा १२.८२ टक्के तर वाघूरमध्ये २९.८६ टक्के असा एकूण सरासरी १८.५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट मोठ्या प्रमाणावर दूर झाले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव